नव्या युगाची नवी आव्हाने कशी परतवून लावावी?

Spread the love

प्रस्तुत ब्लॉगमध्ये नव्या युगाची नवी आव्हाने कशी परतवून लावावी? याविषयी माहिती देणारा आहे. 2023 नंतरचे जीवन जर तुम्हाला Next Level चे जगायचे असेल तर Next Level ची तयारी करण्यासाठी तयार व्हावं लागेल. त्यासाठी नवीन मुलतत्वे आत्मसात करून ती जीवनात अंमलात आणावी लागतील.

तीच नवीन मूलतत्वे आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

जग रोज झपाट्याने बदलत आहे, जगात होणारे  हे बदल स्वीकारण्याची व पचवण्याची ताकद आज जगातील मोजक्या लोकांमध्ये दिसते, बाकी लोकांचे काय?

तुम्हांला जर मोजक्या लोकांमध्ये सामील व्हायचे असेल तर नवीन माईंडसेट, नवीन स्किलसेट व नवीन टूलसेट (Mindset, Skillset, and Toolset) यांची आवश्यकता भासणार आहे.

एका वर्कशॉप / कार्यशाळेत शिव खेरा सर म्हणाले होते की, आजचा युवक हा, महाविद्यालय व विद्यापीठातून ३, ४ किंवा ५ वर्षांनी आपल्या पदवी सोबत जे ज्ञान आणि कौशल्य (Knowledge and Skills) आत्मसात करून बाहेर पडतो, तेंव्हा ते सर्व ज्ञान आणि कौशल्य पुढच्या काही दिवसातच मार्केटमध्ये काळबाह्य होते.

जग ज्या वेगाने बदलत आहे, त्या वेगाने महाविद्यालये व विद्यापीठांचा अभ्यासक्रम न बदलता ३ वर्षे, ५ वर्षे अशा फरकाने थोडाथोडका बदलतो व शासनाचे शिक्षणाचे धोरण ज्या वेगाने बदलायला पाहिजे त्या वेगाने तर सोडाच, तर ते २०-३० वर्षांनी सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात बदलताना दिसत नाही.

असेच जर होत राहिले तर, जगात होणाऱ्या रोजच्या बदलाला आजची युवा पिढी, नव्या युगाची नवी आव्हाने कशी परतवून लावू शकेल? हा आजचा यक्ष प्रश्न, विद्यार्थी, युवक, युवती, पालक, शिक्षक, समाज अशा सर्वच घटकांपुढे उभा आहे.

याचा परिणाम समाजात निर्माण होणारी सुशिक्षित बेकारी, गुन्हेगारी, व्यसनग्रस्थी अशी अनेक आव्हाने समाजाला भोगावी लागतात.

दिशाहीन धावणाऱ्या युवा पिढीला योग्य दिशा मिळेल काय?

स्वतःला सक्षम बनवून हा युवक आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या किंबहुना राष्ट्राच्या उभारणीत हातभार लावू शकेल काय?

या प्रश्नांवर काही उपाय सापडतील काय? असा विचार करून मी काही उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर मला या शोध मोहिमेतून २ तत्वे हाती लागलीत.

आज तुमच्या समोर नोकरी, व्यवसाय, शिक्षण, करिअर, नाती, आरोग्य, फायनान्स इ. अशी कोणतीही आव्हाने निर्माण झालीत, तर त्या आव्हानांवर कशी मात करायची याची उत्तरे आजच्या ब्लॉग मधून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

ही तत्वे तुम्ही तुमच्या जीवनात आत्मसात करून अंमलात आणली तर जीवनातील कोणतेही आव्हान पेलताना तुम्ही नेहमी खंबीर राहणार, कधीच खचून जाणार नाही, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो.

आज तुम्ही जे शिक्षण घेत आहात ते घ्या, तुम्ही जी कोणती नोकरी आणि व्यवसाय करीत आहात ते करा, परंतु हे सर्व करीत असताना खालील २ तत्वे आत्मसात करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनातून Next Level चा आनंद प्राप्त करू शकाल.

चला तर मग ती २ तत्वे कोणती आहेत, ती समजून घेऊया!

१) स्वतःमध्ये गुंतवणूक करा:- (Invest in Yourself)

“Formal education will make you living, but self-education will make your fortune”. 

by- Jim Rohn

या गुंतवणूकीला वैयक्तिक विकास गुंतवणूक (Personal Development Investment) असे म्हणतात.

आज आपले पूर्ण लक्ष (Focus) फक्त शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील तसेच खाजगी कोचिंग सेंटर मध्ये मिळणाऱ्या औपचारिक शिक्षण (Formal Education) वरच आहे. हे शिक्षण तुम्हाला पाहिजे ती प्रमाणपत्रे (Certificates) देईल आणि सुशिक्षित बनवेल, परंतु ते तुम्हाला रोजगारक्षम (Employable), व्यावसायभिमुख (Professionals), मौल्यवान (Valuable) बनवेलच याची खात्री तुम्हाला वाटते काय?

तुम्ही या औपचारिक शिक्षण (Formal Education) यावर जेव्हढा वेळ (Time), पैसा (Money), आणि ऊर्जा (Energy) लावता त्यापैकी स्वतःच्या किंवा तुमच्या मुलांच्या स्व-विकास (Self-Development) यावर किती वेळ, पैसा आणि ऊर्जा लावता?

याचे उत्तर काय आहे? तर काहीच नाही किंवा फारच थोडे, होय ना?

त्यामुळे आजची पिढी हुशार (Intelligent) तर बनणार, १०० टक्क्यापैकी ९९ टक्के, किंवा १०० टक्के एव्हढे गुण मिळवून परीक्षा पास करणार, परंतु हे गुण म्हणजेच सर्वकाही आहे असे नाही.

यापलीकडे जाऊन मुलांच्या स्व-विकास (Self-Development) यावर काम करावे लागेल.

कारण, फक्त पदवी घेऊन बाहेर पडणारी मुकी पिढी कोणाच्याच कामाची राहणार नाही, ना स्वतःच्या, ना समाजाच्या!

स्व-विकास (Self-Development) हे जीवन जगताना लागणाऱ्या अतिशय महत्वपूर्ण गुणांची भर घालत असते.

जसे की,

सहकार्याची भावना (Cooperation), समन्वयाची भूमिका (Coordination), सकारात्मक वृत्ती (Positive Attitude), विकासात्मक मनोवृत्ती (Progressive Mindset), नेतृत्व गुण (लीडरशिप Skills), धाडस (Courage), संवाद साधण्याचे कौशल्य (Communication Skills), इ.

सोबतच जीवनाकडे, समाजाकडे, राष्ट्राकडे व जगाकडे बघण्याचा विशाल दृष्टीकोन हे स्व-विकास (Self-Development) शिक्षण देत असते.

तुम्ही म्हणाल की हे  स्व-विकास शिक्षण Self-Development Development Education कुठे मिळते? तर यासाठीसुद्धा बरेच पर्याय आज उपलब्ध झाले आहेत जसे की, वेगवेगळ्या कार्यशाळा (Workshops), ऑनलाईन वेबिनार्स (Webinars), ऑनलाईन / ऑफलाईन कोर्सेस, स्व-विकासावर आधारित पुस्तके (Self-Development books) हे सर्व आज उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी थोडासा वेगळा वेळ, थोडासा पैसा आणि आपला इगो बाजूला ठेवून कोणत्याही वयात शिकण्याची मनाची तयारी ठेवावी लागेल.

असे म्हटले जाते की जे लोक मानेच्या खालच्या भागावर (पोटासाठी) खर्च (मेहनत) करतात ते तडजोडीचे, गुलामीचे जीवन जगतात आणि जे लोक मानेच्या वरच्या भागावर (मेंदूवर) खर्च (मेहनत) करतात ते खरे स्वातंत्र्याचे जीवन (Freedom of Life) जगतात.

तुम्हाला एक सत्य सांगतो, जगातील सर्वात श्रीमंत असलेले लोक जसे की वॉरन बफेट (Warren Buffett) व बिल गेट्स (Bill Gates) हे एका दिवसात एका पुस्तकाची ५०० पाने वाचतात. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की स्व-विकास किती महत्वाचे आहे.

2) योग्य मार्गदर्शकाची निवड करा. (Choose Your Right Mentor)

सामान्य माणूस असं समजत असतो की, मला सर्वच समजते व सर्वच माहित आहे, कोणाला काय विचारायची गरज आहे?

जगातलं सगळं ज्ञान तुम्हाला आहे, हे ठिक आहे, परंतु नुसते ज्ञान किंवा माहिती असून त्याचा फायदा काय? जर त्यावर कृतीच होणारी नसेल तर!

तुम्ही म्हणाल मार्गदर्शक नेमके काय करतात? तर, ते पुढील १२ प्रमुख मूल्ये आपल्या शिष्याच्या जीवनात अंतर्भूत करीत असतात.

१) आपल्याकडे असलेल्या कोणत्या माहितीचे कृतीत रूपांतर करायचे आहे, हे तुमचे मार्गदर्शक सांगत असतात.

२)  मार्गदर्शक हे दिशादर्शक असतात. तुम्ही योग्य दिशेने जात आहात की नाही याची जाणीव करून देतात.

३)  मार्गदर्शक तुमच्या चुका होण्याआधीच त्या चुका कशा टाळायच्या हे शिकवत असतात आणि योग्य मार्गावर आणून उभे करतात.

४)  तुमच्यातील क्षमता आणि कमतरता यांचे मोजमाप कसे करायचे हे शिकवतात.

५) चुकीची विचारधारा संपवून, नवीन सकारात्मक दृष्टीकोन कसा निर्माण करावा याचे मार्गदर्शन करीत असतात.

६) जीवनातील सर्व क्षेत्रात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात.

७) तुमच्या व्यक्तिमत्वनुसार खास तुमच्यासाठी कोणत्या युक्त्या उपयुक्त आहेत हे स्पष्ट करून दाखवतात.

८) तुम्ही कायम संसाधनात्मक मानसिकतेत (Resourceful Mindset) मध्ये कसे राहायचे हे शिकवतात.

९) मार्गदर्शक कधी कठोर होऊन, काही नियमांचे तुम्हांला पालन करायला लावतात, ज्यातून चांगले परिणाम तुमच्या जीवनात येणारे असतात.

१०) जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. जीवनाचा उद्देश, व्हीजन, व मिशन काय आहे हे समजून सांगतात व तसे जगायला लावतात.

११) मार्गदर्शक हे बागेतील माळ्यासारखे असतात, तुमच्या जीवनाच्या बागेत नको असलेले नकारात्मक तण, खुरटी व काटेरी झुडपे तसेच नको असलेल्या फांद्या चाटून टाकतात व व्यक्तिमत्वाला योग्य आकार देण्याचा प्रयत्न करतात.

१२) तुमच्या चुकीच्या सवयीच्या ठिकाणी बरोबर सवयीचे रोपण करीत असतात.

जगात ज्या काही महान व्यक्ती, संस्था होऊन गेल्या आहेत, त्यांचे कोणी ना कोणी मार्गदर्शक होते, हेच तुम्हाला दिसेल.

जसे की,

अंजनी पुत्र हनुमान यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक मिशन यशस्वीरीत्या पूर्ण केले, कारण त्यांच्यात त्या अंगभूत क्षमता जागृत करून देण्यासाठी आणि तसा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी गुरु जामुवंत मार्गदर्शक म्हणून पाठीशी होते.

निष्णात धनुर्धर अर्जुन घडले कारण त्यांना गुरु द्रोणाचार्य हे मार्गदर्शक म्हणून लाभले.

कुरुक्षेत्रावरील युद्ध आपण जिंकू शकणार नाही अशी मनोधारणा तयार करणारे अर्जुन, परत पूर्ण ताकदीने युद्ध जिंकून दाखवले कारण त्यांच्या पाठीशी मार्गदर्शक श्रीकृष्ण होते.

जग जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा सिकंदर द ग्रेट घडला कारण त्याला ॲरिस्टॉटल सारखे मार्गदर्शक लाभले.

दासीपुत्र चंदू हे भारत वर्षातील एक महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य म्हणून नावारूपाला आले कारण त्यांना चाणक्य सारखे गुरू लाभले.

 राजकीय व्यवस्था नीतीच्या मार्गाने सुद्धा करता येऊ शकते आणि तसे करून दाखवणारे शिवबा घडले, कारण त्यांच्या पाठीशी गुरुमाता जिजाऊ यांची शिकवण होती.

युवकांच्या मनातील ताईत, तेजस्वी विवेकानंद भारत देशाला लाभले, कारण त्यांना गुरु परमहंस भेटले.

काही लोकांना एक प्रश्न पडू शकतो, ते असेही म्हणतील की ते सर्व शिष्य घडले, कारण त्यांना त्या लेवल चे गुरु/मार्गदर्शक लाभले, तसे गुरु आज कुठे सापडतात?

यालाही एक उत्तर आहे, आजही त्याच लेवल चे गुरु लाभतात, ज्या लेवल चे आपण शिष्य आहोत. 😊

जगातील प्राचीन महान काव्यातील महान पात्र असोत किंवा इतिहासातील महान योद्धे असोत किंवा आधुनिक काळातील जागतिक विक्रम (World Record) आपल्या नावावर नोंदवाणारे खेळाडू, संशोधक, शास्त्रज्ञ, उद्योजक असोत, त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी मार्गदर्शक जरूर असल्याचे सापडेल.

यापुढेही कोणी महान बनण्याचा विचार करत असेल तर मार्गदर्शकाशिवाय ते शक्य होणार नाही.

म्हणून जेव्हढ्या लवकर तुमच्या जीवनात मार्गदर्शक आणता येईल तेव्हढे फायद्याचेच ठरणार आहे.

मार्गदर्शकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य केवळ तुमच्याच हाती आहे.

सारांश:-

तुमच्याकडे तुमचे मार्गदर्शकच नसतील तर, जीवनात तुम्ही काहीही करत बसाल, जीवनात महत्वाचे काय आहे आणि काय नाही याचा अंदाजच लागणार नाही.

आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्यातून Next Level ला आपले जीवन न्यायचे असेल तर आज ना उद्या तुम्हाला Next Level चे लर्निंग घ्यावे तर लागणारच आहे, मग उशीर का म्हणून करायचा? Your time start now असे स्वतःशी करार करावा लागणार आहे. प्रस्तुत ब्लॉगमध्ये नव्या युगाची नवी आव्हाने कशी परतवून लावावी? या विषयी सविस्तर माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी आशा बाळगतो .

तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद!!🙏🙏

हा ब्लॉग तुमच्या आवडत्या लोकांना / विद्यार्थ्यांना / मित्रांना नक्की शेअर करा, काय सांगता येईल त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात तुमचा हा छोटासा प्रयास महत्वाचा ठरेल .

आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?

आणखी वाचा: जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? What’s the secret that only five percent of people in the world succeed?

आणखी वाचा: यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?

आणखी वाचा: माणूस आपल्या उपजत कौशल्य आणि कल्पनांवर काम का करत नाही? Why are people not working on our talent and ideas?

आणखी वाचा: आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. No one can stop you from succeeding in life if you do your own research.

आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?

आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?


Spread the love

58 thoughts on “नव्या युगाची नवी आव्हाने कशी परतवून लावावी?”

  1. Nice Article written by prof. Kumre sir. It is the need of time a mentor guru is necessary for all ages becz today’s vibrant, volatile every one run a rat race don’t know where to stop, no proper direction ultimately he or she rich his destination but find his life vaccum.

    Reply
  2. नमस्कार सर
    माझे वडील मला नेहमी सांगतात की फक्त पुस्तकी किडा होऊन उपयोग नाही तर व्यावहारिक ज्ञान देखील असलं पाहिजे
    आजचा हा ब्लॉग वाचून ज्ञानात खूप भर पडली नवीन गोष्टी शिकायला भेटल्या
    एका मार्गदर्शकाचे काय महत्त्व असतं हे या ब्लॉगमधून मला शिकायला भेटलं खर तर आचार्य चाणक्य नसते तर चंद्रगुप्त मौर्य या सारखा निर्माण झालाच नसता.
    मला अजून एक गोष्ट यातून शिकायला भेटली की आपण स्वतःवर गुंतवणूक केली पाहिजे
    आपल्यात कौशल्य असेल तर आपण या जगात उपाशी राहणार नाही हे खरे
    आज आपण खूप यशस्वी लोकांना ओळखतो आणि आपण अजून थोडा विचार केला तर ते लोक एवढे यशस्वी का आहेत
    तर त्यांच्यात ते त्या प्रकारचे कौशल्य होते आणि त्यांनी त्यावर काम केलं म्हणून ते आज एवढे यशस्वी आहे
    कि संपूर्ण जग आज त्यांना ओळखते खरतर सरांनी येथे खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे की
    मानेच्या खालच्या भागाच्या जोरावर जे लोक मेहनत करतात ते गुलामीचे जीवन जगतात आणि मानेच्या वरच्या भागाच्या जोरावर जे मेहनत करतात ते खरे स्वातंत्र्याचे जीवन जगतात ते लोक खरी जीवनात जास्त यशस्वी दिसतात
    या लेखातून आम्हाला सर्वांना खूप गोष्टी शिकायला भेटल्या या जीवनात यशाच्या शिखरावर कसं पोहोचायचं यासाठी काय करावं लागेल याचे उत्तर आपल्याला या लेखामधून या ब्लॉगच्या माध्यमातून भेटतय
    आजच्या यशस्वी लोकांचे निरीक्षण केले तर त्यांच्यात काय आहे त्यांनी काय केले हे या ब्लॉगमधून आपल्याला समजते म्हणून फक्त सर्टिफिकेट गोळा करून उपयोग नाही तर स्व विकासावर भर दिला पाहिजे
    आणि दुसरे तत्त्व म्हणजे योग्य मार्गदर्शकाची निवड करणे .मार्गदर्शक जीवनात खूप महत्त्वाचा आहे मार्गदर्शक असेल तर आपण रस्ता चुकनार नाही मार्गदर्शक असेल तर आपण ध्येयापर्यंत लवकर पोहोचू मार्गदर्शकाचे खूप सारे फायदे हे आपल्याला या लेखाच्या माध्यमातून शिकायला मिळतं.
    एका मार्गदर्शकाचे महत्व जगात अनन्यसाधारण आहे
    सारांश रुपात सांगायचे झाले तर स्व-विकासावर भर आणि योग्य मार्गदर्शक आपल्याला जीवनात सर्वोत्तम व्यक्ती बनवतात
    आज यातून खूप काही शिकायला भेटलं
    खूप खूप आभारी आहे सर.
    धन्यवाद!!!

    Reply
    • हे learning तुमच्या मित्रांपर्यंत पोहचवा. तुझ्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद, मंगलेश 😊

      Reply
  3. I learned two very very IMP. Things in this blog are given below :
    1) Firstly YOU are very important in your own Life. Life isn’t about finding yourself, Life is about CREATING yourself.
    I think ,
    “A Meaningful Life is not about being Rich,
    being popular,
    being Highly educated or being perfect..!
    It’s about being REAL, being HUMBLE, being able to share ourselves & touch the Life of others.”
    For that firstly you have to invest in yourself, work on your own self Image, your happiness.

    And self investment starts with SELF – BELIEF.
    You First have to believe that you are worthy of all good things in order to Start Receiving.
    Because everyone has the right to live the Best Life.
    So Never Limit Yourself,
    We live in a limitless world with endless possibilities.
    According to me there are 8 ways to invest yourself and they are :
    I) Trust your Instincts
    II) Follow your Happiness
    ( do what makes you happy.)
    III) Say YES to new Learning,Experiences
    IV) Be a visionary.
    V) Dream the dreams
    VI) See Greater for yourself.
    VII) Fully believe in Yourself & your GOALS
    VIII) Let your Actions speak for You.

    2) आपल्या जीवनात एक मार्गदर्शक खूपच इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो.
    आपल्या शिष्याचे आयुष्य आतून-बाहेरून बदलण्याची ताकद Mentor कडे असते.
    या शिवाय आपला शिष्य एक सुजाण नागरिक कसा बनवू शकेल,
    भविष्यात एक यशस्वी प्रभावशाली व्यक्तिमत्त्व बनेल यासाठी आपले Mentor /Trainer नेहमीच प्रयत्न करत असतात.
    आपल्या शिष्याच्या चुका होण्याआधीच त्या टाळत असतात व योग्य मार्गदर्शन करत असतात.
    ( अगदी पावलोपावली,आयुष्याच्या कठीण सुख दुःखाच्या वेळप्रसंगी सुद्धा)
    जसे की आपण GYM जॉईन केल्यानंतर ट्रेनर आपल्याकडून प्रॉपर डायट and proper Exercise/ Meditation करून घेतात अगदी तसेच!
    विचार करा आपल्या जीवनात जर मार्गदर्शक / ट्रेनर नसतील तर आपले जीवन कसे असेल?
    अगदीच एखाद्या रस्ता भरकटलेल्या वाटसरू प्रमाणेच
    जन्मल्या पासून ते अगदी बोलायला, चालायला येईपर्यंत आपली आई आपली मार्गदर्शक,गुरु असते जी आपल्या ला या सगळ्या गोष्टी शिकवते, आपल्या वर चांगले संस्कार करते.
    नंतर शाळेत प्रवेश घेतल्यानंतर आपले शिक्षक सुद्धा आपले मार्ग दर्शक /ट्रेनर च असतात जे आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी ओळखायला शिकवतात, आपल्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देतात अशा अनेक गोष्टी ते शिकवत असतात.
    आपले जीवन एका Mentor /Trainer शिवाय अगदीच अपूर्ण आहे असे मला वाटते, त्यांच्या शिवाय आपण आपले आयुष्य Imagine च करू शकत नाही.
    So म्हणूनच आपल्या जीवनात ट्रेनर/मार्गदर्शक मेंटोर खूपच महत्त्वाचे असतात.

    I have no words to express my gratitude for our Kumare Sir because you’re doing very Great and excellent work for students.
    Keep writing such type of blogs and
    Keep inspiring us!
    💯👍☺

    Reply
  4. Thank u sir for this blog,ya blog chi kharch sarvanna khup garaj hoti ,aaj chya ya competition chya jagat ,lok khup busy zalee avdhe ki,te svatavr laksh ch dych sodle ethe konich self development cha v4 sudha karat nahi,aani ya compitition chya nadat te svatala robot banvle,tyanna fakt bajuchya parsion peksha me ks shrimant honar yach v4 yeto,aani to fakt shikshan ghet asto,but kadhi amlaat anat nahi ,ani tya shikshnach fayda ,samajala tr nahi but tyala pn nahi hot,karan aaj ch yuth books madhe dok ghalun baslay,to svatala odhknyach try sudha nahi karat nusta ekade tikade padat ahee,aaj chya yuth madhe activeness nahi,kontehi skills nahi fakt,ky te shikat asto.ani parents sudha tyanchya skills vr laksh det nahi.karan tyanna fakt bajuchya mulapeksha jast marks have astat,jo shikshan aapan gheto jr ,tya shikshnach fayda samajala hot nasel tr…tya shikshnach kahi arth nasto he mla ya blog madhun samjhl,thank u sooo much sir..🙏

    Reply
  5. खूपच उत्कृष्ट ब्लॉग आहे सर
    आजच्या काळात जग झपाट्याने पुढे जात आहे आणि त्या जगासोबत पुढे जायचे असेल तर स्वतःमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत हे या ब्लॉगमधून कळते. आम्ही आज जे शिक्षण घेतो ते आम्हाला डिग्री मिळवून देण्यासाठी काही येत आणि आम्ही शिक्षीत आहोत यांच्या वर शिक्कामोर्तब करते. पण सध्याच्या काळात फक्त डिग्री नाहीतर advance skills ला महत्त्व दिले जाते. त्या advance skills ज्यांच्या जवळ आहेत त्या व्यक्तीला नोकरी , व्यवसाय आणि बर्याच संधी उपलब्ध आहेत आणि ज्याच्या कडे ह्या skills नाहीत ते बेरोजगार म्हणून फिरत आहेत. पण तुमच्या मार्गदर्शनामुळे आमच्या इतर skills develop व्हायला मदत होत आहे.
    ह्या ब्लॉग मध्ये next level जीवन जगण्यासाठी जी दोन तत्त्वे सांगितली त्याचे पालन केल्यास कोणतीही व्यक्ती नक्कीच next level जीवन जगू शकेल.
    १. स्वतःमध्ये गुंतवणूक करा (Invest in Yourself)
    आपण नेहमी अश्या गोष्टींवर आपले पैसे खर्च करतो ज्याचा फारसा उपयोग आपल्याला होत नाही. पण त्या उलट जर आपण आपल्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी वर वेळ आणि पैसा खर्च केला तर आपल्याला जीवनात positive changes करता येतील. योग्य पुस्तके आणि विविध webinar ज्यामुळे आपला mindset develop होण्यासाठी मदत होते अश्या ठिकाणी वेळ देणे गरजेचे आहे. तुमचे ब्लॉग आणि वेबिनार हे mindset development साठी खूप मदत करतात.
    २. योग्य मार्गदर्शकाची निवड करा (Choose Your Right Mentor)
    आयुष्यात मार्गदर्शन असणे खूप गरजेचे आहे जे तुमच्या चांगल्या गोष्टी साठी कौतुक करतीलच पण वेळ प्रसंगी तुमची कानउघडणी देखील करतील. सर तुम्ही नेहमीच आम्हाला चांगल्या गोष्टी साठी encourage करता ज्यामुळे मला चांगल्या सवयी लागत‌ आहेत. तुमचे mentor नेहमीच तुमच्या चुका वेळे आधी लक्षात आणून देतात आणि तुमची यशाच्या दिशेने वाटचाल अधिक वेगाने करतात.

    ही दोन्ही तत्वे मी नेहमी follow करेल .
    Thank you so much Sir for mind blowing blog . Keep inspiring us.😊

    Reply
  6. सर आजचा हा ब्लॉग खुप प्रभावशाली आहे नव्या युगाची नवी आव्हाने कशी परतवून लावावी? हे आज या ब्लॉग मधून शिकायला मिळाल आहे सर तुम्ही संगितले की २०२२ नंतरचे जीवन जर तुम्हाला Next Level चे जगायचे असेल तर Next Level त्यासाठी नवीन मुलतत्वे आत्मसात करुन घ्यावी लागतील आणि ती 2 मुलतत्वे म्हणजे
    1:-स्वतःमध्ये गुंतवणूक करा(Invest in Yourself ) नुसतच शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षण घेऊन आपल्याला चांगला जॉब मिळू शकतो पण Self-Development यावरचे जर आपण का आपण शिक्षण घेतले तर आपण चांगले आयुष्या जगू शकतो
    सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे आपण स्व-विकास (Self-Development) हे जीवन जगताना लागणाऱ्या अतिशय महत्वपूर्ण गुणांची भर घालत असते.
    जसे की,
    सहकार्याची भावना (Cooperation), समन्वयाची भूमिका (Coordination), सकारात्मक वृत्ती (Positive Attitude), विकासात्मक मनोवृत्ती (Progressive Mindset),
    नेतृत्व गुण (लीडरशिप Skills),
    धाडस (Courage),
    संवाद साधण्याचे कौशल्य (Communication Skills), इ.
    सोबतच जीवनाकडे, समाजाकडे, राष्ट्राकडे व जगाकडे बघण्याचा विशाल दृष्टीकोन हे स्व-विकास (Self-Development) शिक्षण देत असते.
    सर मला गुलामीचे नाही तर स्वातंत्राचे जीवन जगायचे आहे म्हणून मी मानेच्या वरच्या भागावर ( मेंदूवर ) खर्च ( मेहनत ) करेल .
    आणि सर तुम्ही सांगितलेल दुसर मुल्य म्हणजे योग्य मार्गदर्शक तर ते योग्य मार्गदर्शक मी तुम्हाला निवडल आहे सर तुम्ही बरोबर संगितल की जीवनात जर कोनी मार्गदर्शक नसेल तर आम्ही जीवनात काहीही करत बसू ,भटकत बसू जीवनात महत्वाचे काय आहे आणि काय नाही याचा अंदाज लागणार नाही म्हणून जीवनात मार्गदर्शक हे खुप महत्वाचे आहेत
    Thank you so much sir आणि आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा.

    Reply
    • तुझं understanding खूप छान आहे, तुझा learning speed असाच develop कर, यश तुझ्या अगदी समोर आहे. थँक you Yashashsree.

      Reply
  7. खूप छान ब्लॉग लिहला आहे सर,
    नव्या युगाच्या नव्या आव्हानांना कसे सामोरे जायचे,हे खूप चांगल्या पद्धतीने आमच्या पर्यंत पोहचवले.जीवनामध्ये self development करन खूप गरजेचं झालं आहे कारण जरी आपण कितीही शिकलेलो असलो, खूप knowledge असल पण ते use कस करायच तेच जर माहीत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही म्हणून प्रथम आपल्या मधील self development करायला सुरुवात करा.
    या ब्लॉग मध्ये 2 महत्वाची तत्त्वे सांगितली आहेत ती पुढील प्रमाणे – 1. स्वतःमध्ये गुंतवणूक करन खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि पैसा खरच करावा लागेल परंतु self development शिवाय पर्याय नाही,नाहीतर एक सामान्य जीवन जगावं लागेल.
    2. जीवनामध्ये योग्य दिशा,मार्गदर्शन करण्यासाठी ऐका मार्गदर्शकाची निवड करन खूप गरजेचं आहे. कारण mentor हा प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करत असतो ,तो आपल्याला योग्य वेळी योग्य सल्ला देतो, चूक बरोबर काय ते सांगत असतो.
    अप्रतिम ब्लॉग लीहल्यामुळे ,आमच्या पर्यंत नवीन विचार पोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर……

    Reply
    • खरंच ही दोन्ही तत्वे खूप परिणामकरक आहेत, आणि तू अगदी अचूकपणे learn केलंस. प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद आरती.

      Reply
  8. अप्रतिम ब्लॉग आहे, खरंच ब्लॉग वाचून झाल्यानंतर यश ही आपल्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे असं वाटत आहे . कारण यामधे तुम्ही सांगितलेली दोन तत्वे सबंध जीवनाची दिशा बदलतात हे एक लाख टक्के बरोबर आहे . मानवी जीवनाच्या विकासाची व्याख्या करत असतानाच अशी केली जाते की समोरच्या परस्थितूनुसर जो बदलतो ज्यांच्यामध्ये बदलाव होतो खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचा विकास होत असतो. त्यामुळे परस्थिनुसर बदलण्याची अपाली तयारी असली पाहिजे. मग ही तयारी येते कुठून? अशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी कुठलं औषध आहे ? असे प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. या प्रश्नाची अगदी साजेशी आणि गरजेची , गुणकारी उत्तरे आपण सांगितलेल्या दोन तत्वामधून शिकायला मिळाले.
    या bullet train सारख्या अतीशय वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये आपला टिकाव लागण्यासाठी तुम्ही सांगितलेलं पहिलं तत्व ( स्वतःमध्ये गुंतवणूक करा:- (Invest in Yourself) खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे कारण बाहेरची परस्थिती कितीही वादळी वाऱ्याची असली तरी जर आपल्या मनाचं छत्र मजबुत असेल तर असे वादळ पुढं येऊन झुकतात. कुठलही काम करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्या मनाने त्या कामाला accept केलं पाहिजे आणि मनाला ते accept करण्यासाठी आपल्या आपल्यामध्ये invest करण अत्यंत महत्वाचं आहे . जर झाडाचे roots पक्के असतील तर ते झाड कितीही मोठं वादळ आलं तरी त्याला काहीच फरक पडत नाही त्या जीवघेण्या वादळात सुद्धा ते झाड आनंदात नृत्य करत असते कारण त्याचे मुळाच तेवढे पक्के झालेले आहेत . मग आपल्या जीवनाचे roots पक्के करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या Self Development करावी लागेल . आपला दृष्टीकोन सकारात्मक बनवलं पाहिजे , Negative feeding ला तात्काळ delete केलं पाहिजे ह्या सर्वांसाठी स्व विकासाची गरज आहे हे तुम्ही अगदी पटवून सांगितलंत . Self Development करण्यासाठी चे स्त्रोत सुद्धा तुम्ही आम्हाला सांगून आमच्या जीवनाला एक सकारात्मक वळण दिलीत आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट साठी हा लाईफ changing platform तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला त.
    जीवन प्रवासामध्ये एक योग्य मार्ग दाखविण्यासाठी , आपल्याला यशाच्या पायरी पर्यंत हात धरून घेऊन जाण्यासाठी , आपण भरकटत चाललेला रस्त्याची जाणीव करून देण्यासाठी एक योग्य मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. Mentor मुळे एक काम पुर्ण होण्यासाठी जेवढा time lagto तेच काम निम्म्या वेळेत पूर्ण करण्याची ताकद असते म्हणुन Mentor असणे खूप गरजेचे आहे . सर तुम्हीं सांगितलेल्या या दोन तत्वामुळे माईंड blow झालेले आहे . खरंच खूप महत्वाचे विचार तुम्ही आमच्यासोबत शेअर केलात आणि एक योग्य , Hand Holding करणारे coach / Mentor म्हणून तुमच्यासारखे Great person आम्हाला एक उत्तम मार्गदर्शक म्हणुन लाभले आहेत या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. Heartly thanks for your great work .

    Reply
    • अप्रतिम प्रतिक्रिया वाटली, तुझं learning खरच तुला यशस्वी करणारे आहे, हे असेच सातत्याने तू केलेस तर एक दिवस तू पूर्णत्वाचे जीवन जगायला नक्की प्राप्त होईल. धन्यवाद देविदास ☺️

      Reply
  9. आयुष्यात मार्गदर्शक खूप महत्त्वाचा आहे . या स्पर्धेच्य युगात प्रत्येक वेक्ति धावत आहे , वेवस्तीत नियोजन न करता फक्त धावत आहेत, फक्त धावणे हे आपलं कर्तव्य समजून तो जो रस्ता समोर दिसतोय त्या रस्त्या ने धावत आहे तो रस्ता चुकीचा आहे की बरोबर याची त्याला खात्री नाही तो रस्ता आयुष्याच्या कुठल्या वळणाला जाऊन संपतो याची त्याला खात्री नाही . आपण ज्या रस्त्या वर चाललो आहे तो बरोबर आहे की चुकीचा याची खात्री करून घेण्यासाठी मार्गदर्शकाची अत्यंत गरज असते जसे की आमचे मार्गदर्शक कुमरे सर

    Reply
  10. Excellent blog,Sir!
    या ब्लॉगमधून खूप काही शिकायला मिळाले.
    सरकारी आणि सामाजिक संस्था या नात्याने, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी दूर करण्यासाठी उपाय योजतात, आपण वैयक्तिक पातळीवर पाहू. तरुणांसाठी बेरोजगारीचा दर गगनाला भिडत असताना, मी एक समजू शकते की, औपचारीक शिक्षण हे आधुनिक काळातील कर्मचारी वर्गामध्ये काम करण्यासाठी कौशल्ये प्रदान करण्यात अयशस्वी ठरत आहे. जर औपचारिक शिक्षण तुम्हाला उदरनिर्वाह करण्यास अपयशी ठरत असेल, तर तुम्ही काय करावे?

    मला खात्री आहे की तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढणारा एकमेव पर्याय म्हणजे स्वतःहून कौशल्ये शोधणे. तुम्ही शाळेत मिळवलेल्या ज्ञानाव्यतिरिक्त, तुम्ही स्वतःसाठी व्यावहारिक कौशल्ये शिकली पाहिजेत. या प्रकारच्या स्व-शिक्षणालाच उद्योजकता म्हणतात. तुम्हाला माहित आहे का की संपूर्ण जगातील सर्व श्रीमंत लोक सर्व उद्योजक आहेत?

    मला वाटते की जगभरातील श्रीमंत लोक उद्योजक असण्यामागे एक कारण आहे. औपचारिक शिक्षणात कठीण कमतरता आहेत हे या लोकांना लवकर कळले. त्यामुळे त्यांनी आपले कौशल्य मिळवून आणि व्यवसाय सुरू करून जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा निर्णय घेतला.
    आपल्या जीवनात मार्गदर्शक असणं खूप महत्त्वाच आहे.
    जॉन क्रोस्बी यांनी म्हटलेले आहे की,
    मार्गदर्शन म्हणजे चालना देणारा एक मेंदू, ऐकून घेणारा कान आणि योग्य दिशेने दिला गेलेला धक्का असतो.”
    मार्गदर्शक तुम्हाला तुमचे सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन देतो, तुम्ही कुठे कमी पडत आहात ते सांगतो आणि तुमचे सामर्थ्य वाढविण्यास मदत करतो.तुम्हाला तुमच्या क्षमतांवर जितका विश्वास असतो, त्यापेक्षा जास्त तुमच्या मार्गदर्शकाला असतो. तो मार्गदर्शक तुमची क्षमता आणि तुमची प्रतिभा जगासमोर आणण्यास मदत करतो.मार्गदर्शकांच्या अनुभवातून आपण शिकतो.मार्गदर्शक जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन देतात.
    मार्गदर्शक तुमच्या चुका होण्याआधीच त्या चुका कशा टाळायच्या हे शिकवत असतात आणि योग्य मार्गावर आणून उभे करतात.
    थोडक्यात सांगायचं झालं तर,आपण जर स्व-विकासावर भर दिला आणि आपल्या जीवनात योग्य मार्गदर्शक असेल तर आपल्याला successful होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
    Thank You sir for these mind blowing blog!

    Reply
  11. नमस्कार सर,
    हा ब्लॉग खूप फायद्याचा आहे. नव्या युगाच्या नव्या आव्हानांना कशा प्रकारे सामोरे जायचे? जीवनात झपाट्याने होणारे बदल कसे accept करायचे?असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये सतत गोंधळ उडवत असतात आणि याच प्रश्नांची उत्तरे या ब्लॉगमध्ये मिळतात. आणखी एक नवीन concept या ब्लॉग मधून समजली. Next level चे लाईफ. आणि हे लाईफ जगायचे असेल तर आपल्याला Next level च्या तयारीसाठी तयार व्हावं लागेल. त्यासाठी काही मुलतत्वे accept करावे लागतील आणि ते apply करावे लागतील. नवीन mindset, skillset and toolset हे accept करून पुढे जावे लागेल. आणि या ब्लॉग मध्ये दोन महत्त्वाची तत्त्वे आपल्याला समजतात.
    1) Invest in yourself – मी एका session मध्ये ऐकलेले की वेळ आणि पैसा खर्च करायचा असेल तर स्वतःवर करावा पण तेव्हा काही समजले नाही पण जेव्हा सरांनी ब्लॉगमध्ये किंवा sessions मध्ये याचा उल्लेख केला तेव्हा समजले कि सेल्फ डेव्हलपमेंट वर focus करणे, स्वत:चा विकास करणे होय. परंतु आपण सेल्फ डेव्हलपमेंट वर कधीही लक्ष देत नाहीत. शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपण formal education वर भर देतो, त्याने आपल्याला डिग्री, प्रमाणपत्र, मार्क्स चांगले मिळतात पण आपण प्रोफेशनल्स, employable,valuable बनणारच त्याची खात्री नाही ना. यासाठी सेल्फ एज्युकेशन घेणे महत्त्वाचा आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंट झाली तर आपण कुठल्याही क्षेत्रात कार्य करु शकतो. एक नवीन गोष्ट या ब्लॉग मधून शिकण्यास मिळाली ती म्हणजे जे लोक मानेच्या खालच्या भागावर खर्च करतात ते लोक तडजोडीचे जीवन जगतात आणि जे लोक मानेच्या वरच्या भागावर म्हणजेच मेंदूवर खर्च करतात ते लोक स्वातंत्र्याचे जीवन जगतात. आणि आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्याचे जीवन जगायला आवडेल यासाठी आपण मेंदूवर मेहनत करायला हवी.
    2) योग्य मार्गदर्शकाची निवड करणे
    मार्गदर्शकाची भूमिका आपल्या जीवनात खूप महत्त्वाची असते. लाईफ मध्ये दिशा दाखवण्याचे कार्य हे मार्गदर्शन करत असतात, आपल्या शिष्याच्या चुका होण्याआधीच ते टाळत असतात. प्राचीन काळात जे महान योद्धे , राजे होऊन गेले त्यांचे ही कोणीतरी मार्गदर्शक होते म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले . तसेच आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी आपल्याही जीवनात एखादे तरी मार्गदर्शक असावेत. जेणेकरून आपल्याला काहीही करत बसायची वेळ येणार नाही.आणि आपल्या जीवनाचा उद्देश समोर ठेवून आपण आपल्याला पाहिजे ते achieve करता येईल. and I’m so greatful to have you (Kumare sir) as my mentor.
    Many thanks to you Sir 😊…

    Reply
    • Great learning, सानिका, तुम्ही मला as a Mentor मानता हे माझ्यासाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट वाटते. तुम्ही तुमच्या जीवनात असेच शिकत मोठे व्हावे हाच माझा प्रयत्न आहे.

      Reply
  12. नमस्कार सर…!
    आजचा ब्लॉग अप्रतीम असा आहे. खरचं सर आयुष्यात यश प्राप्त करायचे असेल तर, Self -Development व योग्य मार्गर्शनाची गरज आवश्यक असते व त्या साठी योग्य मार्गदर्शक आपल्या जवळ असणे आज आवश्यक बनले आहे.
    धन्यवाद सर…!

    Reply
    • तुमच्या प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सर 😊

      Reply
  13. खूपच छान आणि अप्रतिम असा ब्लॉग आहे हा, कारण या बदलत्या जगात, वाढत्या तंत्रज्ञानात, नवनवीन शोधात, नवनवीन कल्पनेत, आणि आधुनिक काळात आपण तसं बदललं ही पाहिजे, आणि तसं एज्युकेशन घेतले पाहिजे, पण या बदलत्या काळाला अनुसरून विद्यापीठाचा तसा सिल्याबस नसतो, हे एकदम खरं सांगितलं सर तुम्ही, डिग्री , पदवी कितीही घेत राहिलो, तरी जॉब करताना, ते शिकलेले कुठेच येत नाही, तर तुम्ही खरं सांगितलं या फॉर्मल एज्युकेशन बरोबर , आपण स्किल डेव्हलपमेंट करणारं एज्युकेशन घेतलं पाहिजे, स्वतःमध्ये आपण गुंतलं पाहिजे , तसेच मार्गदर्शकाची निवड केली पाहिजे, बाकी सर्व गोष्टीत करणारच आहोत, पण स्वता मध्ये गुंतून स्वतःला घडवण्याचं, खरं काम आत्ता आहे, हे मला तुमच्या ब्लॉग मधून समजले, Thank you so mucha sir,,,

    Reply
    • छान विचार मांडलेस प्रतिक्रियेच्या माध्यमातून, असेच reading वाढवा. आणि जीवनात grow करा. ☺️

      Reply
  14. खूपच छान आणि अप्रतिम असा ब्लॉग आहे हा, कारण या बदलत्या जगात, वाढत्या तंत्रज्ञानात, नवनवीन शोधात, नवनवीन कल्पनेत, आणि आधुनिक काळात आपण तसं बदललं ही पाहिजे, आणि तसं एज्युकेशन घेतले पाहिजे, पण या बदलत्या काळाला अनुसरून विद्यापीठाचा तसा सिल्याबस नसतो, हे एकदम खरं सांगितलं सर तुम्ही, डिग्री , पदवी कितीही घेत राहिलो, तरी जॉब करताना, ते शिकलेले कुठेच येत नाही, तर तुम्ही खरं सांगितलं या फॉर्मल एज्युकेशन बरोबर , आपण स्किल डेव्हलपमेंट करणारं एज्युकेशन घेतलं पाहिजे, स्वतःमध्ये आपण गुंतलं पाहिजे , तसेच मार्गदर्शकाची निवड केली पाहिजे, बाकी सर्व गोष्टीत करणारच आहोत, पण स्वता मध्ये गुंतून स्वतःला घडवण्याचं, खरं काम आत्ता आहे, हे मला तुमच्या ब्लॉग मधून समजले, Thank you so mucha sir,,, khup chan vichar madle aahe tumhi.

    Reply
  15. खूपच छान आणि अप्रतिम असा ब्लॉग आहे हा, कारण या बदलत्या जगात, वाढत्या तंत्रज्ञानात, नवनवीन शोधात, नवनवीन कल्पनेत, आणि आधुनिक काळात आपण तसं बदललं ही पाहिजे, आणि तसं एज्युकेशन घेतले पाहिजे, पण या बदलत्या काळाला अनुसरून विद्यापीठाचा तसा सिल्याबस नसतो, हे एकदम खरं सांगितलं सर तुम्ही, डिग्री , पदवी कितीही घेत राहिलो, तरी जॉब करताना, ते शिकलेले कुठेच येत नाही, तर तुम्ही खरं सांगितलं या फॉर्मल एज्युकेशन बरोबर , आपण स्किल डेव्हलपमेंट करणारं एज्युकेशन घेतलं पाहिजे, स्वतःमध्ये आपण गुंतलं पाहिजे , तसेच मार्गदर्शकाची निवड केली पाहिजे, बाकी सर्व गोष्टीत करणारच आहोत, पण स्वता मध्ये गुंतून स्वतःला घडवण्याचं, खरं काम आत्ता आहे, हे मला तुमच्या ब्लॉग मधून समजले, Thank you so mucha sir,,, khup chan vichar madle aahe tumhi.

    Reply
  16. अतिशय सुंदर ब्लॉग आहे सर अतिशय प्रभावी लेखन मनातल्या शंका दूर होतात एक वेळेस मनात छाप सोडून जातो हा ब्लॉग परस्थितूनुसर जो बदलतो ज्यांच्यामध्ये बदलाव होतो खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचा विकास होत असतो. त्यामुळे परस्थिनुसर बदलण्याची अपाली तयारी असली पाहिजे. मग ही तयारी येते कुठून? अशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी कुठलं औषध आहे ? असे प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. या प्रश्नाची अगदी साजेशी आणि गरजेची , गुणकारी उत्तरे आपण सांगितलेल्या दोन तत्वामधून शिकायला मिळाले.
    या bullet train सारख्या अतीशय वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये आपला टिकाव लागण्यासाठी तुम्ही सांगितलेलं पहिलं तत्व ( स्वतःमध्ये गुंतवणूक करा:- (Invest in Yourself) खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे कारण बाहेरची परस्थिती कितीही वादळी वाऱ्याची असली तरी जर आपल्या मनाचं छत्र मजबुत असेल तर असे वादळ पुढं येऊन झुकतात. कुठलही काम करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्या मनाने त्या कामाला accept केलं पाहिजे आणि मनाला ते accept करण्यासाठी आपल्या आपल्यामध्ये invest करण अत्यंत महत्वाचं आहे . जर झाडाचे roots पक्के असतील तर ते झाड कितीही मोठं वादळ आलं तरी त्याला काहीच फरक पडत नाही त्या जीवघेण्या वादळात सुद्धा ते झाड आनंदात नृत्य करत असते कारण त्याचे मुळाच तेवढे पक्के झालेले आहेत . मग आपल्या जीवनाचे roots पक्के करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या Self Development करावी लागेल . आपला दृष्टीकोन सकारात्मक बनवलं पाहिजे , Negative feeding ला तात्काळ delete केलं पाहिजे ह्या सर्वांसाठी स्व विकासाची गरज आहे हे तुम्ही अगदी पटवून सांगितलंत . Self Development करण्यासाठी चे स्त्रोत सुद्धा तुम्ही आम्हाला सांगून आमच्या जीवनाला एक सकारात्मक वळण दिलीत आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट साठी हा लाईफ changing platform तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला त.
    जीवन प्रवासामध्ये एक योग्य मार्ग दाखविण्यासाठी , आपल्याला यशाच्या पायरी पर्यंत हात धरून घेऊन जाण्यासाठी , आपण भरकटत चाललेला रस्त्याची जाणीव करून देण्यासाठी एक योग्य मार्गदर्शकाची नितांत गरज आहे

    Reply
  17. आताचे जीवन खूप वेगाने बदलत आहे. त्यातले challenges आपल्याला face करायचे असतील तर, next level ची तयारी करावी लागेल. त्यासाठी आपल्याला एक mindset, skill set and tool set यांची गरज़ भासणार आहे.

    आज आपल्या समोर नोकरी, व्यवसाय, फायनान्स, करियर, नाती, आरोग्य यांच्यात जी आव्हाने येतील ते कशाप्रकारे हाताळायचे? यांचे या ब्लॉग मध्ये दोन मूलभूत तत्वे आम्हाला समजावले आहेत.

    1. स्वतःमध्ये गुंतवणूक करा
    ‘Formal education will make you living, but self education will make fortune’…. हे खरेच आहे आज आम्ही जी पदवी घेतो ती काही दिवसातच कालबाह्य ठरते. आज पोस्ट graduation करून पण आपण काही शिकलो आहोत असे वाटतच नाही. कारण तो अभ्यासक्रम 20/30 वर्षा अगोदरच्या होता. ज्याचा आजच्या जीवनाशी काही संबंध आहे, असे वाटतच नाही. म्हणून ते फक्त formal education झाले. ज्याने कुठेतरी नोकरी करून उदरनिर्वाहासाठी दोन पैसे कमावता येतील. परंतु Self education आम्हाला जीवनाचा प्रत्येक गोष्टीत मदत करेल ज्याने आमचे life balance and fulfillment असेल.

    आज आपण formal education साठी किती वेळ, पैसा आणि energy देतो.
    परंतु तीच energy, वेळ आणि पैसा आपण सेल्फ education वर दिला तर ती स्वतःमध्ये एक investment असेल, ज्याने self development होईल त्यासोबतच,
    सहकार्याची भावना
    समन्वयाची वृत्ती
    Positive attitude
    Progressive mindset
    लीडरशिप
    धाडस
    कम्युनिकेशन skills
    अशाप्रकारचे skills आपल्यात develop होतील. त्यामुळे आपला जीवनाकडे, समाजाकडे, देशाकडे व जगाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल.
    .
    2. योग्य मार्गदर्शकाची निवड करा.
    या ब्लॉग मध्ये योग्य मार्गदर्शक किती महत्वाचा असतो हे कळते कारण मार्गदर्शक ही पुढील कामे करतात.

    1.आपल्याकडे कोणत्या क्षमता आणि knowledge आहे, हे ओळखून त्यावर मार्गदर्शन करतात.

    2.ते आपल्याला करेक्ट रोडमैप देतात. जेणेकरुन आपण भटकणार किंवा चुकीचा ठिकाणी धडकणार नाही.

    3.आपल्या चुका कश्या टाळता येतील, यावर नेहमी मार्गदर्शन करतात.

    4. आपल्या क्षमता आणि कमतरता ओळखून मोजमाप करून एक आलेख देतात.

    5. आपले चुकीचे mindset बदलून, नवीन positive mindset create करतात.

    6. आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात.

    7. आपल्या personality नुसार योग्य युक्त्या सुचवून आपले जीवन सोपे करतात.

    8. ते कधी कठोरपणे नियमांचे पालन आपल्याला करायला सांगतात, ज्याने आपल्या जीवनात चांगले परिवर्तन होईल.

    9. जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन, उद्देश, व्हिजन आणि मिशन काय पाहिजे हे समजावून सांगतात.

    10. मार्गदर्शक हे आपल्या आयुष्यातील नको असलेल्या गोष्टी छाटून टाकतात. जेणेकरून आपल्या व्यक्ति मताला योग्य आकार येईल.

    11. आपल्या चुकीचा सवयींचे रूपांतर चांगल्या सवयी मध्ये रोपण करतात.

    इतिहास साक्ष आहे.
    जगात ज्या काही महान व्यक्ति होऊन गेल्या, त्यांचे कोणी ना कोणी मार्गदर्शक होते. जसे, ब्लॉग मध्ये नमूद केलेले
    अंजनिपुत्र हनुमानाचे गुरु जामुवंत यांनी हनुमानाच्या क्षमतांची जाणीव करून दिली होती. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत यशस्वी झाले.
    महान धनुर्धर अर्जुन यांना त्यांचे गुरू द्रोणाचार्य यांनी निपुण केले.
    कुरुक्षेत्र मध्ये ज्ञानाने व शक्तीने भरलेल्या अर्जुनाची काय अवस्था होती. त्याने आधीच पूर्ण हार मानून घेतली होती. तेव्हा त्यांचे मार्गदर्शन श्री कृष्णाने यांनी केले म्हणुन ते महान महायुद्ध जिंकू शकले.
    म्हणजेच ज्ञान आणि शक्ति कितीही असली तरी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन साठी मार्गदर्शक महत्वाचा असतो.
    भारत देशाचा अभिमान, युवकांचा प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचे गुरू परमहंस होते.
    अश्याप्रकारे जगातले कोणतेही महान व्यक्ति घेतले तर, जसे महान योद्धे, संशोधक, उद्योजक, खेळाडू… ज्यांची नावे आज अमर आहेत. यांना कोणी ना कोणी मार्गदर्शक जरूर भेटला आहे.
    म्हणजेच यापुढेही कोणी महान बनण्याचा विचार करत असेल तर, मार्गदर्शक शिवाय ते शक्य नाही. आपल्याकडेही आज योग्य मार्गदर्शक नसेल तर जीवनात आपण काहीही करत बसणार. जीवनात काय महत्वाचे आणि काय नाही याचा अंदाजच लावता येणार नाही.
    मला ही गोष्ट खूप आवडली की, 💯आजही त्याच लेवल चे गुरू लाभतात,ज्या लेवल चे आपण शिष्य आहोत. 😊
    Sir, (kumare Sir) आजच्या blog मधील मार्गदर्शक चे पूर्ण फायदे आम्ही अनुभवतो आहे. Lifeshodh family मूळे तुम्ही प्रत्येकाचे hand holding केलेले आहे. म्हणुन तुमच्या प्रती आभार मांडण्यासाठी आमच्याकडे शब्द कमी पडतात

    Thank you so much sir 🙏

    Reply
    • That’s the spirit of learning, अतिशय अचूक प्रतिक्रिया मांडलीस. असेच तुम्ही तुमच्या जीवनात grow व्हावे हाच माझा एकमेव उद्देश आहे,

      Reply
  18. सर, या ब्लॉगमध्ये दोन महत्त्वाची तत्त्वे सांगितलेली आहेत ते म्हणजे
    1) स्वतःमध्ये गुंतवणूक करा(Invest in yourself ) यामध्ये आपण self development वर focus करायचा आहे.
    त्यामुळे सहकार्याची भावना (Cooperation), समन्वयाची भूमिका (Coordination), सकारात्मक वृत्ती (Positive Attitude), विकासात्मक मनोवृत्ती (Progressive Mindset), नेतृत्व गुण (लीडरशिप Skills), धाडस (Courage), संवाद साधण्याचे कौशल्य (Communication Skills), इ. महत्वाचे गुण आपल्या जीवनात भर घालत असते.
    2) योग्य मार्गदर्शकाची निवड करा. (Choose Your Right Mentor)
    आपल्या जीवनात मार्गदर्शक असणे हे खूप महत्त्वाचे आहे. ब्लॉगमध्ये सरांनी मांडलेले बारा प्रमुख मुल्ये मार्गदर्शक आपल्या शिष्याच्या जीवनात अंतर्भूत करत असत.
    या ब्लॉग मध्ये आणखी काही खास add केलेलं आहे .सरांनी आपल्याला काही (मार्गदर्शक) गुरू-शिष्याचे उदाहरण दिले आहेत. जसे की हनुमानाचे मार्गदर्शक गुरू जामुवंत होते, चंद्रगुप्त मौर्य यांना चाणक्य सारखे गुरू लाभले, धनुर्धर अर्जुन यांना गुरू द्रोणाचार्य सारखे मार्गदर्शक लाभले, छ. शिवाजी महाराज घडले ते राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणीमुळे इ.
    शेवटी एक महत्त्वाचा बोध मिळतो, ज्या लेवलचा शिष्य असतो त्याच लेवल चे गुरु त्याला भेटत असतात.
    Thank you Sir😊…

    Reply
    • खूप छान आणि अभ्यासपूर्ण या ब्लॉगचं वाचन केलेलं दिसतंय, मोठे व्हा 👍☺️

      Reply
  19. अतिशय सुंदर ब्लॉग आहे सर,
    यातून‌ आम्हाला कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळाली.
    जगात होणारे बदल स्वीकारण्याची व पचवण्याची ताकद मोजक्याच लोकांमध्ये असते आणि आम्हाला त्यांच्यापैकीच बनायचे आहे. त्यासाठी आम्ही ‌ आमचा
    Mind set
    Skill set
    Tool set हे बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
    आजकालच्या बदलत्या काळामध्ये जगात होणाऱ्या वेळच्या बदलाला आजची युवा पिढी कसे सामोरे जाईल हे सांगता येत नाही…. पण आता तुम्ही या आव्हानांना सामोरे जाण्याचे जी पद्धत सांगितली आहे ती अतिशय सोपी आहे…. शिक्षण घेत असताना किंवा नोकरी करत असताना व्यवसाय करत असताना‌‌…. नेक्स्ट लेवल ला कसा जायचं. त्याचा आनंद कसा घ्यायचा…. त्यासाठी तुम्ही जे ‌ तत्व सांगितले हे पण अतिशय चांगले आहेत…
    1. स्वता मध्ये गुंतवणूक करणे…
    औपचारिक शिक्षणामुळे माणूस फक्त जिवंत असतो परंतु आपल्या स्वतः बद्दल शिक्षण घेणे स्वतःसाठी शिक्षण घेणे हे आपले भाग्य ठरवत असते जगायला शिकवत असते.. आपल्या‍ लक्ष नेहमी आपण ज्या औपचारिक शिक्षण घेतोआहे त्यावर आहे असते‌ आणि या शिक्षणामुळे आपल्याला प्रमाणपत्र तर मिळतात.. सुशिक्षित बनवतात परंतु रोजगार मिळेल याची खात्री नसत आणि त्यासाठी भरपूर वेळा, पैसा खर्च होत असते… यामुळे आजची पिढी हुशार तर आहेच परंतु परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना चांगला रोजगार मिळेल हे नक्की नाही ,
    म्हणूनच मिळालेले गुण हे सर्व काही आहे असे नसते…. म्हणूनचSelf develpament याचे शिक्षण घेणे गरजेचे झाले आहे… हे आपल्या मध्ये महत्त्वपूर्ण गुणांची भर घालत असतात….
    असे म्हटले जाते की लोक पोटासाठी जास्त कसा करतात परंतु जेव्हा आपण मेंदूसाठी खर्च करतो तेव्हा खरे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळते…. खरंच राव सर तुम्ही असं सांगितलं की जगातील सर्वात श्रीमंत असलेले लोक हे एका दिवसात पुस्तकाची 500पाने वाचतात यामुळे त्यांचा विकास आधीच झालेला असतो आता आम्ही सुद्धा थोड्या पासून सुरुवात करू….
    2. योग्य मार्गदर्शकाची निवड.
    मार्गदर्शक नेमके काय करतात, त्यांच्यामुळे जीवनात काय बदल होतो…. हे तर खरोखर मी अनुभवलेला आहे…. आमचे मार्गदर्शक , mentor… तुम्हीच आहात .. आज आम्ही या जागेवर आहोत त्याचे कारण सुद्धा कुठे ना कुठे तुम्हीच आहात
    तुम्ही आमचे स्किल डेव्हलपमेंट सेमिनार घेतले त्याचा फायदा थोड्या प्रमाणात तरी आम्हाला झालेला आहे त्यामुळेच आता आम्ही या वेबिनार ला कनेक्ट होऊ शकलो आहोत. पाच वर्षांपूर्वी आम्ही ठरवले होते की आम्हाला हे हवं आहे ते कुठे ना कुठे आम्हाला मिळालेले आहे आणि कदाचित त्यावेळी त्या गोष्टी चे महत्त्व आम्हाला आज एवढे जर समजले असते तर आत्ताच्या situation पैकी सुद्धा चांगले situation मध्ये आम्ही राहू शकलो असतो….. आम्हाला केव्हाही अडचण आली तरी नेहमी मनात असा प्रश्न येतो की आपण ही गोष्ट आपल्या मार्गदर्शकांना सांगाती त्यांच्याकडे आपल्या अडचणी उत्तर नक्कीच असेल आणि ते मिळतं आमच्या जेव्हा चुका होतात तेव्हा तुम्ही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात जेव्हा आम्हाला असे वाटते की बस आता संपलं चुकूनही नाही तुम्ही आम्हाला नवीन सकारात्मक असे दृष्टीकोन देत असतात कुठल्या क्षेत्रात आम्ही करिअर बनवू शकतो हे तुम्ही आम्हाला सजेस्ट करत असतात, कधी कधी कठोर होऊन नियमांचे पालन सुद्धा करायला लावत असतात पण त्याचे परिणाम हे आमच्या जीवनात सकारात्मक होत आहेत ,जीवन फक्त जिवंत राहण्यासाठी नाही तर जगण्यासाठी जगावे फक्त स्वतःसाठी ,स्वतःसाठी वेळ द्यावा या गोष्टी आम्हाला आता पुढे तरी समजत आहे आमच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देण्याचे काम तुम्ही करतात…. खरं तुला तुमच्या सारखे मार्गदर्शक लागणाऱ्या आमचे जीवन हे आता जेवढी सुंदर आहे त्यापेक्षा पुढे अधिक सुंदर बनणार आहे त्यामुळे सर आम्हाला वेळ असेच मार्गदर्शन तुम्ही करत राहा मी एवढेच सांगेन..
    Thank you so much for being us …

    Reply
    • आज बरेच लोक म्हणतात की आजची पिढी काही वाचन करीत नाही, परंतु तुम्ही तर हे खोटं ठरवलं आहे, तुम्ही खूप छान वाचत आहात व प्रतिक्रियाही अभ्यासपूर्ण देत आहात. असेच वाचन चालू ठेवा व मोठे बनून दाखवा.

      Reply
  20. नमस्कार सर
    आजकाल प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात next level ला जायचं असतं. पण त्यासाठी ची दिक्षा माहिती नसते. तो प्रयत्न तर खूप करतो ण ते योग्य दिशेने जाणारे नसल्याने अथक परिश्रमाने ही तो आपले आयुष्य next level ला नेऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि पुढील आयुष्यात सकारात्मक मोठे बदल घडवून आणण्यासाठी जी तत्त्वे आवश्यक आहेत ती आपल्याला ह्या ब्लॉग मधून कळतात.
    १) स्वतःमध्ये गुंतवणूक करा:- (Invest in Yourself)
    Invest in yourself म्हणजे स्वतःमध्ये अशी गुंतवणूक करा जी तुमचे आयुष्य Next level वर घेऊन जाईल. आपण नेहमी पाहतो की लोक त्यांच्या जवळ असलेला वेळ आणि पैसा नको त्या ठिकाणी खर्च करतात आणि हे लोक General or average आयुष्य जगतात. पण जे लोक मानेच्या वरती म्हणजे बुद्धीवर पैसे आणि वेळ खर्च करतात ते next level जीवन जगतात. जगात अशी अनेक लोक आहेत जी त्यांच्या lifestyle पेक्षा त्यांच्या बुद्धीच्या जोरावर next level आयुष्य जगतात. For example : Elon Musk , Jeff Bezos , Bill gates , Dr.A. P. J. Abdul Kalam and many more. ज्या लोकांनी स्वतः वर invest केल आणि ही investment knowledge improve करण्यासाठी केली त्यामुळे ते अनेक लोकांचे आदर्श आहेत.

    2) योग्य मार्गदर्शकाची निवड करा. (Choose Your Right Mentor)
    आयुष्यात मार्गदर्शक असणं फार आवश्यक आहे. आपण प्रयत्न तर खूप करतो पण ते बरेच दा चुकीच्या दिशेने असतात आणि त्या चुकीच्या दिशेने न जाता योग्य दिशेने जाण्यासाठी मदत करतात ते मार्गदर्शक असतात. मार्गदर्शक आपल्याला योग्य मार्गदर्शन करून यशस्वी होण्यासाठी मदत करतात. ह्या ब्लॉग मधून आपल्या आयुष्यात मार्गदर्शक असणं किती गरजेचे आहे ते कळते. मार्गदर्शक आपल्यासाठी पुढील गोष्टी करतात.
    १. आपल्या गुणांची आपल्याला नव्याने ओळख करून देऊन त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात कसे बदल होतील हे सांगतात.

    २. मार्गदर्शक हे तुमच्या आयुष्याला योग्य दिशेने जाण्यासाठी मदत करतात.

    ३. तुमच्या चुका होण्या आधीच सुधारतात.

    ४.तुमचे positive and negative points लक्षात आणून देतात.

    ५. तुमचे आयुष्य depressive mindset कडून progressive mindset कडे नेण्यासाठी मदत करतात.

    ६. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात ( Health , relationship , career , spirituality , happiness ) तुम्हाला guide करतात.

    ७. कधी मायेने तर कधी कानउघडणी करून योग्य मार्गावर आणतात.

    ८. Resourceful mindset develo करतात.

    ९. New vision निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करतात.

    १०. तुमच्या वाईट सवयी सोडवून चांगल्या सवयी लावून देतात.

    ज्या व्यक्तींनी आयुष्यात काही मोठं करून दाखवले आहे ते नेहमी त्यांच्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनामुळेच .
    शिवराय छत्रपती होऊ शकले ते जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळे. सिकंदर जगावर राज्य करण्याचे धाडस करू‌ शकला ते ॲरिस्टॉटलमुळे. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी असामान्य पराक्रम केले ते त्यांच्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनामुळेच.
    Thank you sir for this amazing blog and introducing the success rules with us.
    तुम्ही सांगितलेले प्रत्येक तत्त्व अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करू. आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा.

    Reply
    • खूप सविस्तर आणि काळजीपूर्वक प्रतिक्रिया दिल्या, यातून असे लक्षात येते की तुम्ही बरच काही या blog च्या माध्यमातून शिकत आहात ☺️
      Thank you, समीक्षा ☺️

      Reply
  21. सर काल तुमचा ,” नव्या युगाची नवी आव्हाने कशी परतून लावावी ?” हा ब्लॉग वाचला आणि काल खऱ्या अर्थाने कान , डोळे , मन , विचार करण्याची शमता हया सगळ्या गोष्टींची डोळ उघडं झाली आणि म्हणूनच आज त्या ब्लॉग वर प्रतिक्रिया देण्याची एक काहीली मनात निर्माण झाली आणि पेन आपोआप चालायला लागला .
    सर आजचा युवक हा बिना लगाम घोड्या सारखा पळतोय . त्या तरुणाला आयुष्या ला काही दिशा माहीत नाही , अर्थ नाही फक्त तो जे वाट दिसेल त्या वाटेला पळतोय . बरं असही नाही की तो नवीन बदल त्या आजच्या नव्या युगाच्या शर्यतीत पळतोय , तो फक्त पळतोय . तो पळता पळता यश संपादितहि करेल , पण तो background चा विकास होईल , पण त्या तरुणाच नेतृत्व हे शुंन्य विकसित झालेलं असेल ,आणि त्याच मुळे तो एक प्रभावी वक्तीमत्व बनणार नाही आणि नवीन युगाचा नव्या आवहानांना सामोरे जाण्याची क्षमता त्याच्या मध्ये मुळीच नसेल .
    म्हणून , सर आज खऱ्या अर्थाने तरुणाने आपला स्वतः चा विकास केला पाहिजे , त्याने स्वतः ला focus ठेवलं पाहिजे आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी background ला ठेवल्या पाहिजे , हे सगळ आपोआप घडणार नाही , ते आपल्याला घडवावं लागेल , त्या धोरणांची आपल्या आयुष्यात अंबलबजावणी करावी लागेल आणि हे तुम्ही स्वतः एकटे करू शकणार नाही , त्या साठी तुम्हाला योग्य मार्गदर्शक (mentor ) लागेल . मार्गदर्शक तुमच्या आयुष्याला लगाम लावेल आणि योग्य रित्या पळवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच मुळे तुम्ही नव्या युगाचे नवे आव्हाने योग्य रित्या परतवून लावलं .
    सर म्हणून आजच्या तरुणाला आजच्या नव्या युगाच्या नव्या शर्यतीत योग्य रित्या पळायचे असेल तर त्याला वरील दोन गोष्टी केल्या शिवाय जमणार नाही . पहिली गोष्ट त्याने स्वतः ला focus ला ठेवावे आणि दुसरी म्हणजे योग्य मार्गदर्शक काची (mentor ) निवड करावी .
    सर मी अशी प्रतिक्रिया पहिल्यांदाच लीहतोय काही चुकल तर तुमचाच शिष्य म्हणून माफ करा !

    तुमचाच शिष्य
    सुमित गावंडे

    Reply
  22. सर तुम्ही या ब्लॉग मध्ये जे विचार मांडला ते फक्त मोटिवेशनल विचार म्हणून नाही किंवा एखाद्याला प्रभावित करण्यासाठी केलेलं मार्गदर्शन नाही तर हे प्रत्येकाचं जीवन आहे असे मला वाटते. हा ब्लॉग वाचल्यानंतर माईंड प्रत्यक्षात शॉक झालेला आहे. कारण या माईंड ला या गोष्टीची आत्तापर्यंत जाणीवच नव्हती आणि ती जाणीव कुणी करून सुद्धा दिलेली नव्हती. यामधला प्रत्येक शब्द न शब्द शिकण्यासारखा आहे. मी तर असं म्हणेन की, या ब्लॉक मधील प्रत्येक शब्दात आपलं जीवन दडलेला आहे.

    या नव्या या तंत्रज्ञानाच्या युगाचा विचार करत असताना हे यूग अतिशय वेगाने बदलत आहे, त्यामुळे या नव्या जगामध्ये टिकून राहण्यासाठी आपला अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आपल्याला नव्या जगात तयार झालेल्या नव्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आपल्याजवळ असली पाहिजे.

    जीवनाच्या खालील खालील क्षेत्रांमधील 👇
    १) Health
    2) Relation
    3) Finanace
    4) Carrier/ profession
    5) Spirituality
    6) fun and joy
    या क्षेत्रामधील आव्हानाला तोंड देण्यासाठी , या मध्ये येणारे आव्हानांना पार करून जाण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. मग ही क्षमता निर्माण करण्याचे ज्ञान कुठून घ्यायचं? खरं तर हा विषय मला वाटते शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये स्पेशली घेतला पाहिजे कारण विद्यार्थ्यांचे भवितव्य या सहा भागांमध्ये आहे आणि हे सहा भाग मजबूत करण्यासाठी याबद्दलचे योग्य ते ज्ञान त्यांना देणे अत्यंत आवश्यक आहे.

    यावर तुम्ही जे या या ब्लॉग मध्ये औषध सांगितलेला आहे ते अत्यंत उपाय कारक आहे. तुम्ही सांगितलेली दोन रहस्य किंवा तत्त्वे खरंच जर आपल्या आयुष्यामध्ये अंगिकारलं तर जग कितीही बदलले कितीही मोठे मोठे आव्हान नेत्यांमध्ये निर्माण झाले तरी ही त्या आव्हानांना लाथ मारण्याची क्षमता निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.

    @@ self Development @@
    आपण आत्तापर्यंत जे काही जीवन जगत आलो आहोत त्या जीवनातून आपल्याला खरंच आनंद समाधान मिळतो का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच नाही असे येईल . कारण आत्तापर्यंत जीवन हे दुसऱ्याच्या विचारावर अवलंबून होतं . या विचाराने मुळे आपण शैक्षणिक बाबी मध्ये मोठे मोठे पदव्या किंवा सर्टिफिकेट मिळवू शकतो परंतु शेवटी रिझल्ट आपल्या मनासारखा राहात नाही

    आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो, प्रचंड अभ्यास करतो, खूप खूप सार्‍या पुस्तकांचा खजिना आपल्याकडे असतो आणि ते आपण इतरांच्या म्हणण्यानुसार वाचत असतो परंतु ते आपल्यासाठी समाधान कारक राहत नाही आणि त्यातून रिझल्ट दिसत नाहीत या गोष्टी कारण ही आहे की , आपण पण आत्तापर्यंत आपल्यामध्ये काही इनवेस्ट केलेलं नसतं. आपल्या आत डोकावून बघण्याची संधी आपल्याला आजूबाजूची लोकं येऊच दिली नसतात. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते आहे आणि यातून फक्त निराशा हाती लागत.

    मग या निराशेला थांबवण्यासाठी आणि निराशेच्या जागी उत्सुकता निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये डोकावून बघण्याची नितांत गरज आहे. स्वतःमध्ये इन्वेस्ट करण्याची गरज आहे. यामुळे आपल्या मनाचा पाया पक्का होतो आणि आपली कौशल्य किंवा ज्या गोष्टी मध्ये आपला इकिगाई आहे त्या गोष्टीमध्ये आपण काम करायला सुरुवात करतो आणि आपलं जीवन हे स्वर्ग बनत जात Due to this Self Development is very very very very important.

    @@ मार्गदर्शक @@
    प्रत्येकाची इच्छा असते की , आपल्याला आपल्या मनासारखा जीवन जगायला मिळाला पाहिजे परंतु हे फक्त काही मोजक्याच लोकांच्या बाबतीत सत्यात उतरते. असं का होते ये कि जगातील काहीच लोक प्रचंड यशस्वी होतात ज्या गोष्टीला त्यांनी हात लावतात ती गोष्ट त्यांची होती अशी कोणती जादू आहे त्यांच्याकडे? आपण सुद्धा प्रचंड मेहनत करतो असतो आपल्याला असे यश का मिळत नाही? अशी प्रश्न मला पडलेलीच होती आणि हा ब्लॉग वाचून म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर मिळाले ते फक्त उत्तरा पुरते मर्यादित आहे तर उत्तरा पलीकडचं जीवन त्यामध्ये सामावलेला आहे.
    आपली मेहनत प्रचंड वेगाने , रात्रंदिवस चालू असते , सकाळी सहापासून ते रात्री 12 पर्यंत आपण लायब्ररीमध्ये प्रचंड मेहनत करत असत तीन तीन चार चार वर्ष झगडत असतो तरीसुद्धा आपल्याला यश मिळत नाही कारण आपल्या मेहनतीचे दिशा ही यशाच्या विरुद्धार्थी आहे त्यामुळे यामधे कितीही जरी वेग असला तरी ते याशापासून पासून लांब जात असते. ही दिशा योग्य ठरवण्यासाठी मार्गदर्शक एक महत्त्वाचे असते ते योग्य मार्ग दाखवतात. आणि आपण त्या मार्गावर जरी भरकटत असतो तरी ते आपला हात धरून पुन्हा त्या मार्गावर आणि push करतात असतात त्यामुळे ळे आपल्याकडे Succes ला येणे भागच आहे.
    Mentor आपला Hand Hold करून sucsess कडे घेऊन जात असतात. आपल्या ज्या चुका होतात त्या चुका होण्याआधीच टाळण्याचे काम मार्गदर्शन करत असतात त्यामुळे आपल्या कृतीमध्ये वेग प्राप्त होतो आणि त्या वेगाची दिशा ही योग्य असते कारण मार्गदर्शक त्याला पुरेपूर सहाय्य करत असतात त्यामुळे यशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणीही आणू शकत नाही. ( Success want to speed )
    आत्तापर्यंत जगामध्ये चे कोणतेही मोठे व्यक्ती आहेत किंवा होऊन गेले त्यांच्या आयुष्यामध्ये एक Mentor होते म्हणून त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची चुणूक दाखवलेली आहे. आणि त्यांना हवं ते मिळवलेला आहे . आयुष्यामध्ये मार्गदर्शक किती महत्त्वाचे आहे हे हे इतिहास सुद्धा सांगतो.

    रामायणामधील अंजनी पुत्र हनुमान सुरुवातीला एक साधे सामान्य व्यक्ति होते , त्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याची सुप्त गुणांची ची जाणीव न्हवती परंतु जेव्हा त्यांच्य आयुष्यामध्ये मार्गदर्शक म्हणून गुरु जामुवांत चा प्रवेश झाला. खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच हनुमान सगळ्यांना ओळख झाले आणि आज आपण जी त्यांची कीर्ती ऐकतो ते सगळ्या त्यांच्या गुरु मुळे साध्या हनुमानाचा अंजली पुत्र हनुमान म्हणून नावारूपाला आले.

    आपल्याकडे कौशल्य भरपूर असतात परंतु ती कौशल्य कुठे आणि कसे वापरायचे या गोष्टीचा मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक अत्यंत आवश्यक असतात. महाभारतामध्ये निष्णात धनुर्धर असलेले अर्जुन द्रोनाचाऱ्या च्या मार्गदर्शनाने आपल्या कार्याची ची गगन भरारी झेप घेऊन दाखवली आहे . यामध्ये खरं बघायचं झालं तर अर्जुनापेक्षा कर्ण खूप हुशार होता त्याच्याकडे अर्जुन राव पेक्षाही जास्त कौशल्य होती परंतु त्या कौशल्याला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शक त्यांच्या आयुष्यामध्ये नव्हते त्यामुळे ते वर येऊ शकले नाही.
    आज 21 मार्च ज्यांची आपण जयंती साजरी करतो असे अख्या महाराष्ट्राचे कुलदैवत, ज्यांनी रयतेच्या सुखासाठी आपला प्राण गहान असे थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गगनभरारी कामगिरी च्या मागे एक मार्गदर्शक म्हणून मा जिजाऊ चा हात होता त्यामुळे ते प्रचंड युक्त्या , बुद्धीच्या जोरावर आपलं राज्य अटकेपार घेऊन जाऊ शकले.
    Mentor मध्ये अगदी वाळलेल्या झाडा ला फुलवण्याची ताकद असते हे आपल्याला चंद्रगुप्त मौर्याच्या इतिहासावरून समजते. एका दाशी चा असलेला हा मुलगा चंदू ज्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की आपण एक महान राज्यकर्ता बनू शकतो परंतु तू गुरुवर्य चाणक्य मुळे ते चंद्रगुप्त मौर्य या महान नावा पर्यंत येऊन पोहोचले.
    वरील या सर्व बाबीचा विचार केला असता या व्यक्तीने आपलं संपूर्ण जीवन हे त्यांच्या गुरूकडे समर्पित केले होते. त्यांनी स्वतःचं डोकं लावन थांबवलं होतं जसे मार्गदर्शक म्हणतील तशी कृती त्यांची होती. त्यामुळे ते पराजयाच्या दारातून विजयाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत.

    अशी ही bulb blow करणारी लर्निंग या ब्लॉग मधून घेता आली . एवढा ऊर्जा दायक ब्लॉग आमच्यासाठी दिल्याबद्दल Heartly thanks Sir 🥰

    Reply
    • तुझ्या learning मध्ये असेच सातत्य ठेवलेस तर एकदिवस compound effect या नियमानुसार तू जीवनात एक मोठा साहित्यिक होशील यात काही शंका नाही, तुला खूप शुभेच्छा 👍

      Reply
  23. Formal study hard work it’s just 20% of your success 80% mindset skill set tool set of your life
    हल्ली जग खूप झपाट्याने वाढत आहे
    रोज नवनवीन अविष्कार होत आहेत त्याचा टेक्नॉलॉजी ही खूप डेव्हलप होत आहे
    आणि या झपाट्याने वाढणाऱ्या जगामध्ये आपल्यालाही दररोज अपडेट होणं हे गरजेचं झालं आहे
    आणि या झपाट्याने वाढणाऱ्या जगामध्ये केवळ अभ्यास नसून आपण बाकीच्या कला सुद्धा आपल्यामध्ये अवगत केल्या पाहिजे कारण ही सध्याच्या काळाची गरज आहे
    आणि या झपाट्याने वाढणाऱ्या जगामध्ये आपल्याला एका मार्गदर्शकाचे खूप आवश्यकता आहे
    मार्गदर्शक ही अशी व्यक्ती असते ज्या आपल्यातल्या कला गुण ओळखून आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे वेळोवेळी सांगत असते
    आपण स्वतःला कितीही हुशार समजला तरी आपण एखाद्या मार्गदर्शक का शिवाय जीवनामध्ये पुढे जाणे अशक्य असते जसं आपण
    महाभारतामध्ये पाहिलं
    2 वीर धनुर्धारी होते 1 अर्जुन आणि 2 कर्ण
    दोघेही वीर होते पण त्यापैकी अर्जुनाला गुरू द्रोनाचाऱ्या मार्गदर्शन होतं जॅकी कणाला ते नव्हतं
    थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही कितीही हुशार असले तरीही मार्गदर्शका आणि त्याच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकत नाही

    तसंच झपाट्याने वाढणाऱ्या जगामध्ये केवळ आपल्याला शिक्षणावर अवलंबून राहून चालणार नाही तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या कला विकसित केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही
    आणि कला का विकसित केल्या पाहिजे या बद्दल एक छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे

    एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये 2 व्यक्ती इंटरव्यू साठी गेले होते
    त्या दोघांचे सारखेच जगातील प्रसिद्ध Howard University मधून master of business administration (MBA)
    झाले होते
    क्या कंपनीमधील इंटरव्यू पॅनल ने त्या दोघांना अनेक प्रश्न विचारले तथा त्या दोघांनी त्या प्रश्नाचे उत्तरे अगदी अचूक दिली
    शेवटी इंटरव्यू पॅनलने विचार करून दोघांना एक टास्क दिला
    तो टास्क असा होता की त्या दोघांनाही एका टाकल्या माणसाला कंगवा विकण्यास सांगितले
    आता सगळे असाच विचार करतील की एखाद्या टाकल्या माणसाला कंगव्याची काय गरज कारण त्याला तर केस नाहीत
    तो माणूस कंगवा का घेईल
    पहिल्या माणसाने यशस्वीपणे एका तकल्या माणसाला कंगवा विकला
    मग इंटरव्यू पॅनेलने पहिल्या माणसाला विचारले की तू टकला माणसाला कंगवा कसा विकला
    पहिला माणूस म्हणाला मी त्याला कंगवा किती चांगला आहे ते पटवून दिलं म्हणून त्याने खरेदी केला
    आणि दुसर्‍या माणसाने सुद्धा टक्ल्या माणसाला यशस्वीपणे कंगवा विकला
    मग कंपनीमधील इंटरव्यू पॅनल दुसऱ्या माणसाला विचारले तू तकल्या माणसाला कंगवा कसा विकला दुसऱ्या माणसाची उत्तर खूप छान होते
    तो म्हणाला सर आधी मी त्याला तेलाची बॉटल विकली आणि मग त्याला कंगवा विकला
    तो दुसरा माणूस म्हणाला सर मी त्याला म्हणालो की हे तेल लावल्यामुळे तुमच्या डोक्याला केस येथील
    असं ऐकताच त्या टाकल्या माणसाने तेलाचे बॉटल विकत घेतली
    मग दुसरा माणूस म्हणतो त्या टाकल्या माणसाल सर तुम्ही आता माझ्याकडून तेलाची बॉटल घेतली मग तुम्हाला आता केस येणार पण भांग पाडण्यासाठी कंगवा लागेलच ना
    मग कंगवा सुद्धा माझ्याकडूनच घ्या शुभ काम में देरी कैसे
    तो माणूस माझ्या बोलण्याला खूप खुश झाला व त्याने माझ्याकडून कंगवा विकत घेतला
    थोडक्यात सांगायचं तात्पर्य जो दुसरा माणूस होता तो शिक्षणावर नव्हे तर त्याने स्वतःच्या विक्री कौशल्य ला सुद्धा डेव्हलप केले होते म्हणून त्याने कण्व यासोबत तेलाची बॉटल सुद्धा विकली असंच काही सरांना सुद्धा या ब्लॉगमधून सांगायचं आहे
    सर या अमूल्य ब्लॉग मधून मला या दोन गोष्टी अतिशय उत्कृष्टपणे शिकायला मिळाल्या नव्हे तुमच्या प्रत्येक ब्लॉग मधूनच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात तसेच ब्लॉग आमच्यासाठी अनंत रहा आणि तुमच्या सारखे मार्गदर्शक आम्हाला लाभले यात आमचा खूप आनंद आहे आणि आम्हाला खूप अभिमान सुद्धा आहे धन्यवाद🙏

    Reply
  24. नमस्कार सर…
    स्वतःला सक्षम बनवुन कुटुंबाचा, समाजाचा व राष्ट्राचा हिता साठी योग्य दिशा देण्याचा मंत्र या ब्लॉगच्या माध्यमातून शिकायला मिळाले.आरोग्य, फायनान्स, नाती, नोकरी इत्यादी आव्हानांवर मात कश्या प्रकारे करता येईल याची उत्तरे सहजपणे मिळाली.next level चा आनंद मिळविण्यासाठी दोन प्रकारच्या तत्वे आत्मसात केली तर जीवनात नक्कीच फादेशीर ठरतील.
    स्वतःमध्ये गुंतवणूक करा (invest in yourself):-
    वयक्तिक विकास गुंतवणुकीत आपल्यात असलेलं कौशल्य develop करणं आजच्या काळाची गरज आहे.formal education स़ोबत self education असणे आवश्यक आहे, औपचारिक शिक्षणात १००% पैकी ९९% मिळाले तरी एका कागदावर सुशिक्षितता दर्शविली जाते. स्व विकासाची कमतरता भासते. जीवनात सकारात्मक मानसिकता तयार करणे तसेच आंतरिक चेतना जागृत करण्याचे काम स्व विकास करते .
    सहकार्याची भावना
    समन्वयाची भुमिका
    सकारात्मक वृत्ती
    विकासाची मनोवृत्ती
    नेतृत्व गुण, धाडस
    संवाद साधण्याचं कौशल्य इत्यादी
    मानेच्या खालच्या भागावर खर्च करून पोटाचे गुलाम बानाण्यापेक्षा , मानेच्या वरच्या भागावर (मेंदू ) वर खर्च केला तर आपल्या ज्ञानात भर पडून स्वातंत्र्य जीवन जगण्याची संधी मिळते, एका दिवसात पुस्तकाची ५०० पाने वाचणारे बिल गेट्स,बफेट या महान व्यक्ती कडे पाहून स्व विकासाची क्षमता लक्षात येते.
    योग्य मार्गदर्शकाची निवड:-
    जगातलं सगळे ज्ञान जरी आपल्या कडे असले परंतु त्या ज्ञानाचा उपयोग कुठे कश्या प्रकारे करायचा हे माहीत नसेल तर आपल्याला त्यात यश मिळेलच याची शाश्वती नसते. परंतु आपल्या आयुष्यात एक चांग ला मार्गदर्शक लाभला तर जीवनाची ट्रेन track ने बरोबर चालते, आपल्या जीवनातील सत्य जाणून घेऊन होणाऱ्या चुका टाळून, प्रत्यक्षात कृती करण्या साठी मार्गदर्शन करतात. आपले ध्येय, उदिष्ट साध्य करण्यासाठी आयुष्यात एक मार्गदर्शकाची नितांत गरज असते, जीवनात सकारात्मक मानसिकता तयार करून वाईट प्रवृत्ती ला बळी पडू न देता यश मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात, यशस्वी लोकांना मागे नेहमी एका बुद्धिमान मार्गदर्शकचा हात असतो परिपूर्ण यश मिळवून देण्याची जवाबदारी पार पाडत असतात .या ब्लॉग मध्ये दिलेल्या उदाहरणावरून mentor chi भूमिका लक्ष्यात येते.
    गुरु जामुवंत
    द्रोणाचार्य
    श्रीकृष्ण
    चाणक्य
    गुरूमाता जिजाऊ
    परमहंस
    ज्या लेव्हल चे शिष्य त्याच लेव्हल मार्गदर्शक असतात म्हणून मी आत्ता या क्षणी खूप आनंदी आहे ,मला माझी लेवल कळली कारण माझ्या आयुष्यात माझे मार्गदर्शक म्हणून कुमरे सर तुम्ही आहात . lifeshodh फॅमिली सारखे व्यासपीठ मिळाले म्हणून मी आत्ता या क्षणी खूप कृतज्ञ आहे
    Thank you so much sir

    Reply
  25. नमस्कार सर
    खूप छान Blog आहे सर Excellent !
    नव्या युगाच्या नव्या आव्हानांना कसं सामोरं जायचं हे तुम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे.
    आजच्या या संगणकाच्या युगामध्ये रोज नवनवीन बदल होत आहेत, हे बदल स्वीकारण्याची व पचविण्याची ताकद आज जगातील मोजक्या लोकांमध्ये दिसते.आपलयाला या आधुनिक काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या Self development वर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
    Darvin ने सांगितल्या प्रमाणे आपणाला survive करण्यासाठी Strong रहावे लागेल.
    आज सगळेच यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतात परंतु मोजकेच लोक यशस्वी झालेले दिसतात याचं कारण काय असेल?
    फक्त मेहनत करून यशस्वी होत नाही तर यशस्वी होण्यासाठी मेहनत योग्य दिशेने करणे आवश्यक असते.तसेच आपल्या जिवनामधे मार्गदर्शकाची भूमिकाही महत्त्वाची आहे.
    कारण मागदर्शक आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम करत असताना त्यामुळे आपल्या जिवनामधे मार्गदर्शकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.
    Thank you sir

    Reply
  26. सदर लेख वाचून खूप आनंद झाला.
    कारण माझी सध्याची मानसिक स्थिती ही खूप गोंधळलेली आहे, प्रत्येक गोष्टीत confusion खूप आहे…
    काय करायला पाहिजे,काय नाही करायला पाहिजे याविषयीचा विचार करून एक ठाम निर्णय घेण्यात माझा खूप वेळ वाराला जात आहे……

    माझे वरील सर्व विस्कळीत झालेले विचार जर एका direction मध्ये आणायचे असेल तर मला माझ्या जीवनात मार्गदर्शकाची खूप गरज आहे ….हे मला वरील लेखातून शिकायला मिळाले ….. धन्यवाद …..,🙏

    Reply
  27. मी, रोहित विनायक शेळके.
    तुमचे ब्लॉग प्रथमच वाचतोय,
    पाठीमागच्या काही वर्षांमध्ये माझासोबत
    अनेक असे प्रसंग निर्माण झाले की त्यामुळे मला हे सर्व
    जग एक भलं मोठं आव्हान न म्हणता एक शून्याचा मोठा गोळा दिसत होत. त्या कालावधीत मी शिव खेरा यांचे यश तुमच्या हातात हे पुस्तक वाचलं त्याने मला जरा इच्छाशक्ती भेटली.
    असो….
    तुमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही असे बरेच विषय कव्हर उप केलेत जे की मला जरा कठीण जात होते जस की why we all needs a better mentor.
    पैश्यासाठी अनेक optins आहेत but at the other hand एका समाजासाठी आपण एक योग्य उदाहरण असू अशीच माझी अपेक्षा असते.
    सद्ध्या मी कृषी व्यवसाय व्यवस्थापन शिकतोय त्यात माझे स्किल सेट्स हे जरा आणखीन पॉलिश होत आहेत beside this मला mind set वर जरा(जास्तीच) काम करण्याची गरज आहे. या मुळे माझ्या एका हितचिंतकाने तुम्हाला रेफर करायला सांगितले . I hope तुमचे ब्लॉग वाचून माझा माईंड सेट ही आणखी कणखर होईल याची आपेक्षा.
    हा ब्लॉग मला फार भावला.
    तुमचे ब्लॉग वाचून जिंदगित आणखीन पुढच्या लेव्हल ला मी एक दिवस नक्कीच जाईल…

    Reply
    • यशाची शिखरे गाठायची असतील तर learning with Mentor शिवाय दुसरा पर्याय नाही, शिकणं थांबवू नकोस..

      Reply
  28. नमस्कार सर
    वरील लेख वाचून खूप बरं वाटलं आणि नेमकं सत्य काय आहे त्याचा शोध लागला.
    सत्याचा शोध यासाठी म्हणतोय की, आपण लिहीता कि नुसत्या डिग्री घेऊन किंवा चांगले गुण घेऊन आपला विकास होत नाही. आणि स्व चाही शोध लागत नाही. स्व चा शोध घेणं हे खूप गरजेचं आहे,‌कारण‌ कागदोपत्री गुणांची शिदोरी घेऊन आपण आयुष्यभर जगू शकत नाहीत तर त्यासाठी आपल्याला स्व चा शोध घेणे आणि स्व चा विकास करणे हे खूप गरजेचं आहे..!

    अनेक यशस्वी व्यक्तीनं पैकी एक असणारे फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे सकाळी ४ वाजता जिम मध्ये जातात तर दुसरीकडे आजचा तरुण ४ वाजेपर्यंत फेसबुक वापरण्यासाठी जागतो..!

    सर,
    असं अनेक जणं म्हणतात की ,
    मुझे और मशहूर होणे की जरुरत नहीं है.मेरे गुरू मुझे पहचानते है वही मेरे लीऐ काफी है..!

    वरील ओळींना अनुसरूनच , प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरू असले पाहिजेत. ज्या वेळेला BCCI भारताच्या क्रिकेट टीम ला एक कोच देतात तरी सुद्धा रोबिन उत्तप्पा सारखा एक खेळाडू स्वतःसाठी एक वेगळा कोच निवडतो .
    प्रत्येकाचं आयुष्य असंच असतं, प्रत्येकाला एका गुरूची गरज असते कारण तेच असतात आपल्या जिवनाचे शिल्पकार..!
    धन्यवाद 🙏

    Reply
    • धन्यवाद वैभव, तुम्ही जीवनात यशाच्या शिखरावर विराजमान व्हावे, हाच या ब्लॉग लिहिण्याचा मुख्य उद्देश आहे. ☺️
      तुम्ही असेच शिकत रहा व जीवनात पुढे जा 👍👍

      Reply
  29. आणि या झपाट्याने वाढणाऱ्या जगामध्ये केवळ अभ्यास नसून आपण बाकीच्या कला सुद्धा आपल्यामध्ये अवगत केल्या पाहिजे कारण ही सध्याच्या काळाची गरज आहे
    आणि या झपाट्याने वाढणाऱ्या जगामध्ये आपल्याला एका मार्गदर्शकाचे खूप आवश्यकता आहे
    मार्गदर्शक ही अशी व्यक्ती असते ज्या आपल्यातल्या कला गुण ओळखून आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे वेळोवेळी सांगत असते
    आपण स्वतःला कितीही हुशार समजला तरी आपण एखाद्या मार्गदर्शक का शिवाय जीवनामध्ये पुढे जाणे अशक्य असते जसं आपण
    महाभारतामध्ये पाहिलं
    2 वीर धनुर्धारी होते 1 अर्जुन आणि 2 कर्ण
    दोघेही वीर होते पण त्यापैकी अर्जुनाला गुरू द्रोनाचाऱ्या मार्गदर्शन होतं जॅकी कणाला ते नव्हतं
    थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही कितीही हुशार असले तरीही मार्गदर्शका आणि त्याच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकत नाही

    तसंच झपाट्याने वाढणाऱ्या जगामध्ये केवळ आपल्याला शिक्षणावर अवलंबून राहून चालणार नाही तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या कला विकसित केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही
    आणि कला का विकसित केल्या पाहिजे या बद्दल एक छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे

    एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये 2 व्यक्ती इंटरव्यू साठी गेले होते
    त्या दोघांचे सारखेच जगातील प्रसिद्ध Howard University मधून master of business administration (MBA)
    झाले होते
    क्या कंपनीमधील इंटरव्यू पॅनल ने त्या दोघांना अनेक प्रश्न विचारले तथा त्या दोघांनी त्या प्रश्नाचे उत्तरे अगदी अचूक दिली
    शेवटी इंटरव्यू पॅनलने विचार करून दोघांना एक टास्क दिला
    तो टास्क असा होता की त्या दोघांनाही एका टाकल्या माणसाला कंगवा विकण्यास सांगितले
    आता सगळे असाच विचार करतील की एखाद्या टाकल्या माणसाला कंगव्याची काय गरज कारण त्याला तर केस नाहीत
    तो माणूस कंगवा का घेईल
    पहिल्या माणसाने यशस्वीपणे एका तकल्या माणसाला कंगवा विकला
    मग इंटरव्यू पॅनेलने पहिल्या माणसाला विचारले की तू टकला माणसाला कंगवा कसा विकला
    पहिला माणूस म्हणाला मी त्याला कंगवा किती चांगला आहे ते पटवून दिलं म्हणून त्याने खरेदी केला
    आणि दुसर्‍या माणसाने सुद्धा टक्ल्या माणसाला यशस्वीपणे कंगवा विकला
    मग कंपनीमधील इंटरव्यू पॅनल दुसऱ्या माणसाला विचारले तू तकल्या माणसाला कंगवा कसा विकला दुसऱ्या माणसाची उत्तर खूप छान होते
    तो म्हणाला सर आधी मी त्याला तेलाची बॉटल विकली आणि मग त्याला कंगवा विकला
    तो दुसरा माणूस म्हणाला सर मी त्याला म्हणालो की हे तेल लावल्यामुळे तुमच्या डोक्याला केस येथील
    असं ऐकताच त्या टाकल्या माणसाने तेलाचे बॉटल विकत घेतली
    मग दुसरा माणूस म्हणतो त्या टाकल्या माणसाल सर तुम्ही आता माझ्याकडून तेलाची बॉटल घेतली मग तुम्हाला आता केस येणार पण भांग पाडण्यासाठी कंगवा लागेलच ना
    मग कंगवा सुद्धा माझ्याकडूनच घ्या शुभ काम में देरी कैसे
    तो माणूस माझ्या बोलण्याला खूप खुश झाला व त्याने माझ्याकडून कंगवा विकत घेतला
    थोडक्यात सांगायचं तात्पर्य जो दुसरा माणूस होता तो शिक्षणावर नव्हे तर त्याने स्वतःच्या विक्री कौशल्य ला सुद्धा डेव्हलप केले होते म्हणून त्याने कण्व यासोबत तेलाची बॉटल सुद्धा विकली असंच काही सरांना सुद्धा या ब्लॉगमधून सांगायचं आहे
    सर या अमूल्य ब्लॉग मधून मला या दोन गोष्टी अतिशय उत्कृष्टपणे शिकायला मिळाल्या नव्हे तुमच्या प्रत्येक ब्लॉग मधूनच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात वयक्तिक विकास गुंतवणुकीत आपल्यात असलेलं कौशल्य develop करणं आजच्या काळाची गरज आहे.formal education स़ोबत self education असणे आवश्यक आहे, औपचारिक शिक्षणात १००% पैकी ९९% मिळाले तरी एका कागदावर सुशिक्षितता दर्शविली जाते. स्व विकासाची कमतरता भासते. जीवनात सकारात्मक मानसिकता तयार करणे तसेच आंतरिक चेतना जागृत करण्याचे काम

    Reply
  30. आपल्या जीवनाचे काही महत्त्वाचे क्षेत्र आहेत तेच क्षेत्र विकसित करण्यासाठी त्या क्षेत्राची वाढ करण्यासाठी आणि त्यातून रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्यामध्ये FLEXIBILITY असणे खूप गरजेचे आहे. आपल्यासमोर उद्भवलेली परस्थिती आपल्याला Accept करता आली पाहिजे , परिस्थितीनुसार आपल्या मध्ये बदल झाला पाहिजे तरच आपला विकास होतो. जीवनात खूप काही करण्यासाठी प्रचंड यश मिळवण्यासाठी आपल्याला Next level ची ची तयारी करण्याची गरज आहे. आणि नेक्स्ट लेवल ची तयारी करण्यासाठी पहिल्यांदा आपली स्वतःची तयारी असणे खूप गरजेचे आहे. या अतिशय वेगाने बदलणार्‍या जगामध्ये आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आपल्या अस्तित्वाचा ठेवा पुढे नेण्यासाठी आपल्याला आपल्या मध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक बाब आहे . माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याकडे काहीतरी वेगळेपणाची चाहूल असते आणि ती चाहूल पुढे मार्केटमध्ये नेण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये चेंज करने खूप गरजेचे आहे.

    Next level ची तयारी करून आपल्या मनासारखे जीवन जगण्यासाठी जे दोन तुम्ही या ब्लॉगमधून सांगितला ते खूपच परिणामकारक आहेत. तुम्ही सांगितलेली दोन तत्वे खरंच आपल्या आयुष्यात लागू केली तर आपल्याला आपल्या मनासारखे जीवन जगण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.

    झपाट्याने बदलणारे जगामधील आपले अस्तित्व पुढे नेण्यासाठी आपल्याला आपल्या मध्ये invest करणे खूप गरजेचा आहे. आपल्यासमोर बनवणे नवीन नवीन अडचणीसाठी, नवीन परिस्थिती कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक बनवण्यासाठी आपल्याला आधी आपलं व्यक्तिमत्व मजबूत बनविण्याची गरज आहे. आणि आपल्याला आपलं व्यक्तिमत्त्व मानसिक रित्या आणि शारिरिक रित्या मजबूत करण्यासाठी पर्सनल डेव्हलपमेंट बद्दलची अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि या सोन्यासारख्या लर्निंग साठी तुम्ही आम्हाला एवढा परिवर्तनशील आणि जीवन बदलणारा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात त्याबद्दल खरंच तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. लर्निंग मधून आपल्या व्यक्तिमत्त्वाची स्तंभ मजबूत होतात आणि सर खांब मजबूत असतील तर त्यावर कितीही मोठी इमारत बांधली तर अगदी सुरक्षित असते. म्हणून जर नव्या युगाची ही नवी आव्हाने नव्या जोमाने परतून लावायची असेल तर पर्सनल डेव्हलपमेंट करणे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे.

    त्यासाठी आपण आपल्याला शोधलं पाहिजे. आपल्या जीवनाचा आपण उद्देश मिळवला पाहिजे स्वतःचा चहूबाजूने परिपक्व करण्यासाठी , आलेल्या संकटांना आलेला दुःखांना हिंमतीने लाथ मारण्यासाठी आपल्याला Personal Development ची learning घेणे गरजेचे आहे. जेवढे आपण स्वतःमध्ये डोकावून पहाल त्यावेळी खरंच आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला मिळतो आणि एकदाका जर जीवनाचा उद्देश मिळाला तर आपल्याला आनंदी जीवन जगण्यास पासून कोणीही अडवू शकत नाही, प्रत्येक गोष्ट आपली वाटते आणि सगळं जग आपल्या हातात येतं. आतापर्यंत जगामध्ये या यशस्वी व्यक्तीने उंच उंच भरारी घेतलेली आहे त्यांनी सुरुवातीला त्यांची पंख मजबूत केलीली आहेत. त्यासाठी कुठलेही कार्य करण्यासाठी कोणत्याही कार्यामध्ये संपादित करण्यासाठी कुठल्या क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व गाजवण्यासाठी आपल्याला व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असं म्हणतात की एखाद्या झाडाची फांदी तोडण्यासाठी दोन तास लागत असतील तर त्या दोन तासांमध्ये दीड तास कुऱ्हाडीला धार लावण्यात घलवल्यास कुराड एकदम sharp बनल्यानंतर तर अर्ध्या तासात अतिशय कमी मेहनतीने फांदी तोडल्या जाऊ शकते म्हणून जर कमी मेहनतीत उंच भरारी घ्यायची असेल अफाट यश संपादित करायचं असेल तर आधी आपण स्वतःला मजबूत करण्याची गरज आहे.

    जीवनातल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कामगिरी करत असताना त्या क्षेत्रामध्ये कमी वेळा कमी मेहनतीने जर यश संपादित करायचं असेल तर आपल्या आयुष्यात मार्गदर्शक असणे खूप महत्त्वाची बाब आहे. जी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला दहा तास लागतात ती गोष्ट मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार अगदी काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते. मार्गदर्शक आपल्याला आपल्या मध्ये असलेल्या कौशल्याची ओळख करून देतात त्याच बरोबर ती कौशल्य आपल्या जीवनात भरभराट कशी आणतील याबद्दल मार्गदर्शन करून आपल्याला त्या मार्गाने चालायला लावतात आणि यश मिळेपर्यंत ती आपल्या सोबत असतात आणि आपण जिथे थांबलो तिथे Push करण्याचं काम मार्गदर्शन करत असतात म्हणून आपल्या आयुष्यात मार्गदर्शक निवडणे खूप महत्त्वाचे आहे .

    Sucess want to Speed and Correct Directon and it can get only from progressive, Positive Mentor .

    जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आणि आपण करत असलेल्या कार्यामध्ये वेग प्राप्त करून देण्यासाठी Mentor चा role अत्यंत महत्वाचा असतो. आजपर्यंत जगामध्ये ज्या व्यक्तीने
    अमाप यश मिळवलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक होते आणि त्यामुळेच त्यांनी हव्या त्या Destination पर्यंत आपली मजल मारू शकले आणि कमी मेहनतीने आपल्या आयुष्याच सार्थक मार्गदर्शकाच्या सहाय्याने त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी प्रत्येक आव्हाने त्यांनी मार्गदर्शकाच्या सहाय्याने पळवून लावले आहेत.

    अशीच आपल्या आयुष्यात येणारे सुद्धा आव्हाने पळवून लावायचे असतील तर आपल्याला या ब्लॉग मध्ये दिलेल्या दोन तत्त्वांच पालन करण्याची आणि ती तत्वे आपल्या आयुष्यात आत्तापासूनच लागू करण्याची नितांत गरज आहे. असा हाल लाइफ चेंजिंग ब्लोग आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनापासून आभार.

    Reply
  31. आजचा ब्लॉग अतिशय दर्शक आणि मोटिवेशनल करणारा आपण जीवनात काय करत आहे काय करायला पाहिजे त्याची स्पष्टता देणारा शिक्षकाचे महत्त्व सांगणारा मार्गदर्शक कसा असावा हे सांगणारा मार्गदर्शक आपले जीवन कसे घडवतो अशी माहिती देणारा आजचा ब्लॉग होता तुम्ही म्हटल्याप्रमाणे दासी पुत्र चंदू हा गुरु चाणक्याच्या मार्गदर्शनाने अखंड भारताचा सम्राट होऊ शकतो , अर्जुन पराभूत होत असलेली युद्ध कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकू शकतो तर मग काहीही होऊ शकतो फक्त गरज आहे तर योग्य मार्गदर्शकाची योग्य गुरुजी तर आपण आज म्हणतो की तेवढे महान गुरु आज भेटत नाही पण ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे मीच या गोष्टीशी सहमत आहे आपण जे योग्य शिष्य असू तर आपल्याला योग्य गुरु ची व शिक्षक मिळणारच गुरु आपल्या जीवनाला योग्य दाखवतो आपल्या जीवनातील वाईट गोष्टी काढून चांगल्या सवयी लावतो अशा गुरूंच्या सानिध्य खाली राहून माणूस कधीच भटकू शकत नाही आम्हाला पण अशा गुरुचे रूपात आपण लाभले सर याचं मनात नेहमी एक आनंद वाटतो
    धन्यवाद

    Reply
  32. नमस्कार सर,
    या ब्लॉगमध्ये नव्या युगाची नवी धोरणे कशी परतावून लावावी? या वर विचार मांडलेले आहेत.
    आपल्याला लाईफ next level चे पाहिजे असेल तर next level ची तयारी करावी लागेल. आपल्या आसपास, जगात खूप बदल होत आहेत त्या बदलानुसार आपणही बदल केला पाहिजे आणि नवीन बदल स्वीकारले पाहिजेत. यासाठी आपल्याला काही मूलतत्त्वे आत्मसात करावे लागतील. Mindset toolset, skillset याची पण आवश्यकता आपल्याला भासणार आहे. आजच्या पिढीला योग्य दिशा दाखवण्यासाठी या ब्लॉग मध्ये दोन महत्वाची मूलतत्वे सांगितलेले आहेत.
    1) स्वतःमध्ये गुंतवणूक करा( Invest in yourself).. यालाच पर्सनल डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणतात. फॉर्मल एज्युकेशन जेवढे महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही जास्त सेल्फ एज्युकेशन खूप महत्त्वाचे आहे. Self development केली तर अनेक महत्त्वपूर्ण गुणांची भर पडते.(co-opertion , coordination, positive attitude etc) आणि जे लोक मेंदूवर खर्च करतात ते लोक खरे स्वातंत्र्याचे जीवन जगत असतात.
    2) योग्य मार्गदर्शकाची निवड करा. (Choose Your Right Mentor)
    जीवनात मार्गदर्शकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कारण मार्गदर्शक हे आपल्याला दिशा दाखवण्याचे कार्य करतात. आणि चुका होण्याच्या आधी ते टाळतात. असे अनेक मूल्ये मार्गदर्शक आपल्या शिष्याच्या जीवनात अंतर्भूत करत असतात.
    या ब्लॉग मध्ये मांडलेले हे दोन मूल्य खूप महत्वाचे आहेत. यशस्वी जीवन जगायचे असेल तर या दोन मूल्यांची आवश्यकता आहे.
    Thank you Sir☺

    Reply
  33. आजचा ब्लॉग अप्रतीम असा आहे. खरचं सर आयुष्यात यश प्राप्त करायचे असेल तर, Self -Development व योग्य मार्गर्शनाची गरज आवश्यक असते व त्या साठी योग्य मार्गदर्शक आपल्या जवळ असणे आज आवश्यक बनले आहे.
    आयुष्यात मार्गदर्शक खूप महत्त्वाचा आहे . या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती धावत आहे , व्यवस्तित नियोजन न करता फक्त धावत आहेत, फक्त धावणे हे आपलं कर्तव्य समजून तो जो रस्ता समोर दिसतोय त्या रस्त्या ने धावत आहे तो रस्ता चुकीचा आहे की बरोबर याची त्याला खात्री नाही तो रस्ता आयुष्याच्या कुठल्या वळणाला जाऊन संपतो याची त्याला खात्री नाही . आपण ज्या रस्त्या वर चाललो आहे तो बरोबर आहे की चुकीचा याची खात्री करून घेण्यासाठी मार्गदर्शकाची अत्यंत गरज असते.
    त्यानंतर महत्वाचा असतो आपला mindset !
    तुम्ही जे विचार करता ते तुमचे वास्तव बनते. तुमच्या मनाला सकारात्मक विचार करण्यास प्रशिक्षित करा. यासाठी वेळ आणि सराव दोन्ही लागतील. त्याची सुरुवात मानसिक जागृतीने होते. तुम्ही माइंडफुलनेस तंत्र आणि ध्यानाद्वारे जागरूकता सराव करू शकता. जेव्हा तुम्ही तुमचे विचार स्वीकारण्यात आणि त्यांना पुढे जाऊ देण्यामध्ये चांगले व्हाल, तेव्हा तुम्ही तुमच्या ट्रॅकमधील नकारात्मक विचार थांबवू शकता.साधारणपणे, एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग असतात. तथापि, नेहमी फक्त एक optimal way किंवा ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो.
    कठोर करण्यापेक्षा हुशारीने काम करण्यासाठी, मागे काम करून सुरुवात करा. आपले ध्येय आराखडा आणि परिभाषित करा. त्यानंतर, तेथे कसे जायचे यासाठी प्रक्रियेची योजना करा. तुमच्या आधी आलेल्या इतरांनी ते कसे केले हे पाहण्यासाठी संशोधन करा. तुम्ही ते अधिक चांगले कसे करू शकाल यासाठी तुमची स्वतःची कौशल्ये आणि कल्पनांची गणना करा.

    अपयशाच्या भीतीमुळे किंवा निर्णय घेण्याच्या भीतीमुळे स्वतःला लहान विचार करू देणे सोपे असू शकते. परंतु, जीवनातील महान गोष्टी साध्य करण्यासाठी, तुम्हाला जोखीम घेण्यास खुले असले पाहिजे. कोणतीही आव्हाने आली तरी नेहमी विचार करा आणि मोठी स्वप्ने पहा. अशा प्रकारे, आपण कधीही कल्पना केली नसेल त्यापेक्षा जास्त साध्य कराल.
    जेव्हा एखादे आव्हान येते, तेव्हा ती शाळेतील मोठी परीक्षा असो किंवा आगामी धावण्याची शर्यत असो, हार मानू नका! आव्हानांवर मात करण्यासाठी चिकाटी ही एक मोठी गुरुकिल्ली आहे. हार मानण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आव्हानावर मात करणार नाही किंवा त्यातून काही शिकणार नाही.
    आव्हानांचा सामना कसा करायचा हे शिकण्यासाठी वेळ, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन लागतो. तुमच्या जीवनाची परिस्थिती काहीही असो, कठीण काळ येईल. परंतु, योग्य मानसिकता आणि सरावाने, तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यावर मात करू शकाल आणि प्रक्रियेत वाढू शकाल!
    थोडक्यात सांगायचं झालं तर,आपण जर स्व-विकासावर भर दिला आणि आपल्या जीवनात योग्य मार्गदर्शक असेल तर आपल्याला successful होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
    Thank You sir for these mind blowing blog!

    Reply
  34. How to overcome the new challenges of the new age?

    हे सध्याच्या आधुनिक जग वाऱ्या सारखं बदलत आहे आणि या बदलत्या जगामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपली छाप कायम ठेवण्यासाठी आणि आपण आपल्या जीवनाचा ठरवलेला उद्देश आपण बघितलेली भन्नाट स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्यालासुद्धा या बदलत्या जगाबरोबर आपली जीवनशैली बदलावी लागेल कारण माणसाचा विकास कसा होतो हे बघत असताना यामध्ये एक बाब सापडते ती म्हणजे परिस्थितीनुसार ज्या माणसामध्ये बदलाव होतो खऱ्या अर्थाने त्या माणसाचा विकास होत असतो म्हणून या बदलत्या परिस्थितीनुसार आपण सुद्धा बदलला पाहिजे . जसे या जगामध्ये आधुनिकीकरण आलं आणि माणसाच्या विकासाची स्थिती उंचावली तसेच जेवढा विकास होत आहे जेवढ्या सोयीसुविधा आपल्याला मिळत आहेत जेवढं जी आपलं जीवन ऐशो अरमाच होत आहे तेवढीच कठोर आव्हाने आपल्या पुढे उभी राहत आहेत.

    या येणाऱ्या कठोर आव्हानांना तडा देण्यासाठी आपल्याकडेसुद्धा त्या कठोर आव्हानांची चावी असली पाहिजे आणि ती चावी आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी सध्याच्या शिक्षण पद्धतीचा विचार केला तर त्यातून असे लक्षात येते की त्यामध्ये आपलं जीवन नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी जेवढी क्षमता आपल्याकडे पाहिजे ती क्षमता या शैक्षणिक दुनियेतून येत असताना दिसत नाही त्यामुळे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या आजूबाजूला बेरोजगारांचा बाजार तुडुंब भरलेला आहे या गोष्टीचा कारणांची मीमांसा करत असताना एक गोष्ट लागते ती म्हणजे आपल्या या सध्याच्या उत्साही नवतरुनाकडे या नवीन युगाच्या नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ताकद उरलेली नाहीये असं म्हणण्यापेक्षा ती ताकद निर्माण करण्याची क्षमता आज आपल्याला शाळा महाविद्यालयातून मिळत नाही या गोष्टी मागे अनेक कारणे आहेत. मग ते शिक्षण पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल होण्यास होत असलेला विलंब असेल किंवा अभ्यासक्रम असेल अशा अनेक गोष्टीचा संख्या मुळे आपल्या या नऊ तरुणांमध्ये शी शक्‍ती निर्माण होत नाही आणि जरी निर्माण झाली तरी ा प्रचंड वेगाने बदलणार्‍या जगामध्ये ती जुनी होत आहे त्यामुळे त्या शक्तीला अर्थ उरत नाही आणि शेवटी बेरोजगारी हाती लागते. अशीच बेरोजगारी जर देशांमध्ये वाढत गेली तर देश सुद्धा बेरोजगार होऊन जाईल . मग ही बेरोजगारी थांबवायची असेल, नव्या युगातील नव्या संकटांना नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या अतिउत्साही तरुणांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी काय करावे लागेल?

    तरी यासाठी आपल्याला एक गोष्ट करण्याची नितांत गरज आहे ती म्हणजे आपण या ऑफ शारीरिक शिक्षण पद्धतीबरोबरच सेल्फ Development ची लर्निंग सुद्धा घेतली पाहिजे. कारण औपचारिक शिक्षण पद्धती मधून आपल्याला आपल्या जीवनात औपचारिकता प्राप्त होईल परंतु त्या ओपचारिक त्याचा उपयोग आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा त्या औपचारिकतेचा समाजाला काय फायदा होईल या गोष्टीचा विचार केला असता आता ही औपचारिक शिक्षण पद्धत garrented नाही. त्यामधून आपण आपल्या पोटाची खळगी भरू शकतो की नाही याचा विश्वास नाहि तो विश्वास आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी , आपल्यामध्ये कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची शक्ती निर्माण करण्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजेच स्व विकास खूपच महत्त्वाचा आहे आणि ही नवी आव्हाने पळून लावण्यासाठी यांच्या छाताडावर लाथ मारून पुढे जाण्यासाठी आपल्याला ही learning घे ना गरजेचा आहे आहे.

    आज आपण वेगवेगळे पंचतारांकित स्वप्न बघून त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आतोनात मेहनत करत आहोत रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून अभ्यास करण्याची वाटचाल आपल्या सध्याला चालू आहे परंतु आपल्याला आपल्या मेहनतीच्या पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही आपल्याला जेवढे त्या क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे त्या क्षेत्रामध्ये यश दिसून येत नाही या गोष्टीचे कारण लक्षात घेतली असता तर त्यातून एक गोष्ट हाती लागते ती म्हणजे आपण आपल्या स्वतःमधील क्षमतेचा वापर आपण करत असलेल्या कामांमध्ये भरपूर प्रमाणात आपण वापरण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु त्याठिकाणी तेवढ्या प्रमाणात आपलं पोटेन्शिअल उपयोगात येत नाही हे घटनेमागील कारण म्हणजे आपण आपल्या स्व विकासावर भर कमी केलेला आहे. त्यामुळेच आपल्याला अशी आव्हाने आपल्या समोर निर्माण होत आहेत आणि त्या आव्हानांना तोंड देत असतान आपल्या जिवाचं रान होत आहे अशी कामगिरी थांबवण्यासाठी , यातून सावरण्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंट महत्त्वाची आहे.

    एखादी इमारत बांधत असताना त्या इमारतीचा पाया जर भक्कम नसेल किंवा तो पाया बांधत असताना त्यामध्ये सिमेंट किंवा पाण्याची कमतरता असेल तर ते मजबूत होत नसतं आणि पाया मजबूत नसेल तर वर आपण आपल्याला पाहिजे तेवढी इमारत उभी करू शकत नाही. आणि जरी केली तर तो पाया मजबूत नसल्यामुळे नक्की बांधले तेवढी इमारत कोसळणार आहे आपल्या जीवनाची इमारत सुद्धा पक्की अगदी मजबूत करायची असेल तर त्यासाठी आधी त्याचा Base पक्का करावा लागेल आणि त्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंट लर्निंग घेणे हे गरजेचे आहे. एकदा का आपल्या मनाचा छत्र पक्क झालं की , मग आपल्या पुढे कितीही वादळी वारे आले तरीसुद्धा आपल्याला काहीच फरक पडणार नाही किंवा त्याचा परिणाम आपल्यावर जाणवणार नाही त्यामुळे जीवनात उंच भरारी घेण्यासाठी , अगणित यश संपादित करण्यासाठी ठरवलेल्या क्षेत्रांमध्ये अजिंक्य होण्यासाठी आपल्याला आधी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

    आणि हाच विकास साधण्यासाठी या ब्लॉगमध्ये दिल्ली 2 रहस्य अगदी अद्भुत रहस्य आहेत. सबंध जीवनाचा रस्ता बदलणारी ही दोन रहस्य आहेत. खरंच आपण जर या दोन रेषा चांगला विचार करून त्यांचे इम्पलेमेंटेशन जर आपल्या आयुष्यात केलं तर नक्कीच आपण आपण ठरवलेल्या क्षेत्रामध्ये अमर्याद कामगिरी करू शकतो आणि जगातील महान व्यक्ती मध्ये आपलं नाव नोंदवू शकतो.
    यामधील पहिल्या रहस्याचा ( स्वतःमध्ये गुंतवणूक करा:- (Invest in Yourself)
    विचार केला असता तर या रहस्यमय अफाट ताकद आहे यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जेचा साठा आपल्याकडे येतो . माझ्या सध्याच्या जीवनाचा विचार केला तर या जीवनाचा या पहिल्या रहस्याची तुलना केली तर त्यामध्ये विरोधाभास दिसून येतो कारण या आधी हे कळलंच नव्हतं म्हणून तडजोडीचे जीवन आत्तापर्यंत जगत होतो परंतु आज हा ब्लॉग वाचायला मिळाला आणि यातून एक नवीन संधी मिळालेली आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये हे संपादित करण्यासाठी किंवा जीवनात असलेले जे काही महत्त्वाचे क्षेत्र आहेत त्यामध्ये आरोग्य, व्यवसाय ,नातेसंबंध, पैसा आणि अध्यात्म आपल्या जीवनाचा खरंच अगदी खोलवर विचार केला तर आपले जीवन या चार पाच गोष्टी भोवती खेळत असते संपादित करण्यासाठी या क्षेत्राचं सोन करण्यासाठी आपल्या मध्ये भरपूर पोटेन्शिअल असता परंतु आपण त्या पोटेन्शिअल चा विचारच करत नाही आपली स्वतःमधील इन्व्हेस्टमेंट खूप कमी असते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्यामध्ये खूप सारा असून सुद्धा त्या ठिकाणी यशस्वी होण्यापासून मुकावं लागतं आणि तडजोड च्या जीवनात प्रवेश करावा लागतो हे थांबवण्यासाठी , आपल्यामधील असलेलं ऊर्जादायक पोटेन्शिअल बाहेर काढण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी वेळ देणे नितांत गरजेचे आहे.

    हल्ली आपण या क्षेत्रामध्ये यश संपादित करण्यासाठी आपल्याला विसरून चाललोय आणि आपल्यापेक्षा दुसऱ्यांना जास्त महत्त्व देत असल्यामुळे ळे आपल्याला नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी शक्ती निर्माण होण्याचा अडथळा येत आहे. आपल्याकडे सोन्याचा खजिना असून जा आपण लोकांच्या चांदीच्या सेवेत आपले आयुष्य घालवत आहोत ही बाब आपल्याला जाणवणं आपल्या विकासासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढून स्वतःला महत्त्व दिले पाहिजे आणि त्यामधील असलेल्या कौशल्या कडे डोकावून बघण्याची आवश्यकता आहे आणि आपल्यामधील असलेली भन्नाट कौशल्य बाहेर काढून ती मार्केटमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्यापुढे कशी ही आव्हाने आली तर ती आव्हाने आपण अगदी सहज रित्या आपल्यामध्ये असलेल्या वेगळ्या पोटेन्शिअल च्या मदतीने सोडू शकतो म्हणून काही वेळ स्वतःसाठी काढणे सुद्धा गरजेचे आहे आहे.

    आज आपण या बिनकामी असलेल्या सोशल मीडियाच्या गर्दीमध्ये हरवलो आहोत, ज्यातून जीवनात असलेल्या समस्यांचे निवारण होण्याऐवजी उलट प्रचंड प्रमाणात निगेटिव्हिटी चा शेर का होत आहे आणि त्यामुळे आपलं जीवन दिवसेंदिवस निगेटिव्हिटी धारण करत असल्यामुळे आपला माईंड सेट तश्या पद्धतीचा सेट होऊन निराशा आपल्या हाती येत आहे . म्हणून या व्हाट्सअप ,फेसबुक ,इंस्टाग्राम या रंगीबिरंगी दुनियेतून आपल्या स्वतःच्या दुनियेत या कारण पण ती दुनिया आपल्या सगळ्यात जवळची दुनिया असते आणि जवळच्या या क्षेत्रामध्ये माणूस पारंगत असतो आणि ती पारंगगतता जीवनाचा उद्धार करत असते . म्हणून दररोज स्वतःसाठी किमान एक तास तरी वेळ काढन गरजेचा आहे त्यातून आपल्याला आपल्या कौशल्याची आपल्यामध्ये असलेल्या पोटेन्शिया ची ओळख होईल आणि ती ओळख या नव्या युगामध्ये निर्माण झालेल्या नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अगदी धडाडीने कार्य करेल.

    मला यामधील ” जे लोक मानेच्या खालच्या भागावर (पोटासाठी) खर्च (मेहनत) करतात ते तडजोडीचे, गुलामीचे जीवन जगतात आणि जे लोक मानेच्या वरच्या भागावर (मेंदूवर) खर्च (मेहनत) करतात ते खरे स्वातंत्र्याचे जीवन (Freedom of Life) जगतात.” हे विधान प्रचंड आवडलेला आहे आणि खरच मानेच्या वरच्या भागाचा विकास केलं किंवा तो भाग पारंगत , अग्रेसर केलं तर अख्खा आयुष्य अग्रेसर होऊन जाईल म्हणून आयुष्यात राजा म्हणून जगायचं असेल तर स्व विकासाची गरज आहे आणि स्व विकास साधण्यासाठी स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची नितांत गरज आहे म्हणून स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून स्वतःच्या कौशल्याचा विचार स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार करून त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे , जेवढे आपल्याला स्वतःची ओळख होईल त्यावेळी या नव्या आव्हानांना लाथ मारण्याची प्रचंड शक्ती आपल्याकडे येईल.

    या ब्लॉग मध्ये दिलेल्या दुसरं दुसरं रहस्य सुद्धा प्रचंड ताकद दार आहे. हात लावलेला गोष्टीचं सोनं करण्यासाठी , प्रत्येक क्षेत्रामध्ये लीडर म्हणून जगण्यासाठी, ठरवलेलं क्षेत्रामध्ये टॉप ला जाण्यासाठी आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शक असणे अत्यंत गरजेची बाब आहे कारण मार्गदर्शक ही आपल्या आयुष्याचा, जीवनाचा Road map 🗺️ तयार करत असतात त्यामुळे आपण ठरवलेले डेस्टिनेशन अगदी आपण सहजतेने आणि fully गॅरेंटेडपण गाठू शकतो.

    कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या कामाला योग्य दिशा असणे खूप महत्त्वाची बाब असते ते किती योग्य दिशा आपल्या क्षेत्रामध्ये प्राप्त करून देण्यासाठी आणि त्या दिशेनुसार आपल्या कडून काम करून घेण्यायाच काम मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आपल्या कामाला योग्य दिशा मिळवून आपण आपण ठरवलेले क्षेत्रांमध्ये अगदी सहजतेने यश मिळू शकतो आणि आपल्या आयुष्यात निर्माण झालेली कितीही मोठे संकटे पार करून जाण्यासाठी मार्गदर्शक आपल्याला फार्मूले देत असतात आणि त्या फॉर्मुला चा वापर करून आपण आपल्या आयुष्याचं गणित अगदी सहज रीतीने सोडू शकतो आणि ते पण अगदी अचूकतेने म्हणून आपल्या जीवनात अचूकता निर्माण करायची असेल तर आयुष्यात एका उत्तम मार्गदर्शकाची आवश्यकता आहे.

    आजपर्यंत जगामध्ये जे काही मोठे मोठे व्यक्ती होऊन गेले , त्यांच्या जीवनाचा अस्तित्व संपून किते शकतो वर्ष संपले तरीपण आज प्रत्येकाच्या तोंडात त्यांचं नाव असतं त्यांच्या यशामागील रहस्य काय या गोष्टीचा विचार करत असताना या महान व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाकडे एक उत्तम मार्गदर्शक होते आणि उत्तम मार्गदर्शकाच्या अतिउत्तम मार्गदर्शनामुळे त्यांनी त्यांच्या जीवनात एक वेगळीच छाप ठेवून गेलेली आहे. तिच छाप आपल्या मध्ये सुद्धा निर्माण करायची असेल तर choose progressive Mentor in earlier times.

    मार्गदर्शकाच्या बाबतीत सांगत असताना इतिहास सुद्धा सांगतो की मार्गदर्शक आपल्या आयुष्यात असणे किती महत्त्वाचे असते त्यातून जर आपण सगळ्यात शक्तिशाली वीर पराक्रमी ज्याला मानतो ते म्हणजे अंजनी पुत्र हनुमान . त्यांच्यामध्ये असलेल्या अफाट शक्ती ची ओळख त्यांना मार्गदर्शन का मुळे झाली . त्यांच्यामुळेच वेगळेपणा होता त्यांच्यामध्ये ची वेगळी कौशल्य होती ते कौशल्य ची ओळख हनुमानाला गुरु जामवंत यांनी करून दिली म्हणून हनुमान प्रत्येकाच्या तोंडात आहे. गुरु जामुवंत हनुमानाच्या आयुष्यात येण्याआधी हनुमानाचे जीवन अगदी आपल्यासारखाच सामान्य होतं परंतु ज्यावेळेस या उत्तम मार्गदर्शकाचा प्रवेश त्यांच्या आयुष्यात झाला त्यावेळी त्यांच्या आयुष्याचा रस्ता बदलला आणि त्यांनी त्यांच्या आत मध्ये डोकावून पाहू त्यांच्यामध्ये असलेले पोटेन्शिअल वर आणलं आणि त्यामुळे आज एक असामान्य व्यक्ती पासून असामान्य तिचा प्रवास साध्य करु शकले. हे फक्त मार्गदर्शक मुळे.

    निष्णात धनुर्धर असलेल्या अर्जुनाचा विचार केला असता त्यांच्या मध्ये असलेल्या मौलिक विद्य मागील रहस्याचा विचार केला तर त्यामागे गुरुवर्य द्रोणाचार्यांचा हात दिसून येईल त्यामुळे अर्जुन आयुष्य फुलत गेलं ते फक्त मार्गदर्शक मुळे.

    आजही आपल्याला गावागावांमध्ये प्रचंड हुशार असलेले लोक आढळत असतात परंतु ते त्यांच्या क्षेत्रामध्ये यश संपादित करू शकले नसतात , आज खेडेगावांमध्ये जर बघितलं तर जबरदस्त गायन करणारी वाद्य वाजवणारे वक्तृत्व करणारी लोक आढळतात परंतु ते त्यांच्यामध्ये वयोमर्यादा टॅलेंट असून सुद्धा त्याच ठिकाणी राहतात या गोष्टीचं कारण काय असेल तर त्यांच्या आयुष्याला एक चांगली दिशा त्यावेळी मिळालेली नव्हती आणि ते दिशा देण्याचं काम मार्गदर्शन करत असतात म्हणून आपल्या मध्ये किती आहे याला महत्त्व असतं आहे ते आपण कशा पद्धतीने उपयोगात आणतो हे अधिक महत्त्वाचं असतं आणि हे उपयोगात आणण्याचा काम Mentor करत असतात.

    याठिकाणी मला एक माझ्या मित्राच्या वडिलांची वस्तुस्थिती नोंदवावे वाटते , ते एक गाजलेले पैलवान होते, प्रचंड ताकद, डावपेचाचा खजिना असलेला माणूस, दांडगा अनुभव दिसायला अगदी धिप्पाड रांगडा गडी आज त्यांच्या समोर नुसत उभा जरी राहिलं पैलवान काय असतो हे त्यातून कळून येतं एवढं चांगलं व्यक्तिमत्व गावातल्या गावातच राहिले आणि सामान्य जीवनच जगत आहे यासाठी मी त्यांच्याकडे छोटीशी चौकशी केली की तुमच्याकडे एवढा असतानासुद्धा तुम्ही इथेच का? यावर त्यांचे वक्तव्य असं होतं की, ” तुमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचं असतं परंतु तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही योग्य मार्गानुसार उपयोगात आणता का? ही बाब महत्त्वाचे असते ” आणि त्यांच्या सुद्धा जीवनात असंच घडलं त्यांच्याकडे भरपूर होतं परंतु ती योग्य मार्गाने लावण्यासाठी एक योग्य मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शकाची कमी होती म्हणून ते आहे त्या ठिकाणी आहेत . त्या मुळे जीवनात खरंच एखादी गोष्ट साध्य करायची असेल, या नव्या युगात तयार झालेले नवीन आव्हाने नष्ट करायचे असतील तर खरंच मार्गदर्शक असणे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे.

    मला वाटते ही दोन भविष्य नवीन योगाची पाषाण यासारखी आव्हाने जरी निर्माण झाली तरी त्या आव्हानांना चिरण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि जर या दोन प्रवास याची अंमलबजावणी आपण आपल्या आयुष्यात लागू केली तर नक्कीच पुढे येणारा आव्हान आपल्याला पाणी पिल्या सारखा असेल यात काही शंका नाही असा हा life changing blog आमच्या आयुष्याला एक चांगला मार्ग देण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    Reply
  35. आज घडीला जर जगाचा विचार केला , तर जग प्रचंड वेगाने बदलताना दिसून येत आहे. आज तयार केलेली वस्तू उद्या विकेल की नाही या गोष्टीचा अंदाज लावणं सुद्धा सद्यस्थितीला कठीण झालेला आहे कारण जगामध्ये हे तेवढ्या प्रमाणात प्रगती सुद्धा होत आहे . त्यामुळे तयार केलेल्या वस्तू सेवा आपल्याकडे असलेले ज्ञान खूप वेगाने कालबाह्य होत आहे. आणि जर आपण आपल्या शिक्षण पद्धतीचा विचार केला असता किंवा आत्ता जे आपण महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेत आहोत हे शिक्षण , हा अभ्यासक्रम या बदलते जगा नुसार बदलत आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर सद्यस्थितीला तर निश्चितच नाही असे येईल. कारण स्वतंत्र भारतामध्ये शिक्षण पद्धतीचा विचार केला असता तर आपल्याला मागचा इतिहास सांगतो की, जवळपास 20 ते 25 वर्षानंतर शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या अतिशय प्रगत तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या शिक्षणाचे महत्त्व किंवा त्याची किंमत कमी होत आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे बेरोजगार नावाचा शब्द जन्म घेत आहे.

    हे जग जेवढ्या वेगाने बदलत आहे, ज्या प्रमाणे या जगामध्ये तंत्रज्ञानाच्या नवनवीन रूपामध्ये जन्म होऊन जगाचे चित्र सुद्धा आगळं वेगळं बनत आहे . त्याच प्रमाणे त्यातील समस्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणात जन्म घेत आहेत. कारण पण एखादी गोष्ट जर चांगले घडत असेल तर त्यापुढे उभा राहणारा आव्हान सुद्धा तेवढच आव्हानात्मक असेल. मग ही आपल्या समोर उभे राहणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याची शक्ती आपल्याकडे असायला पाहिजे. या शक्तीची उत्पत्ती ज्या प्रकारचा आव्हान आहे त्याबद्दलच्या ज्ञानातून होत असते आणि त्याच ज्ञानाची कमतरता आपल्याकडे असल्यामुळे आज जवळपास 99 टक्के लोकांना तडजोडीचा जीवन जगावे लागत आहे.

    मग यातून मार्ग काढण्यासाठी कोणता उपाय असेल? तर मला असं वाटते की , प्रत्येक शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये कौशल्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची नितांत गरज आहे. प्रत्येकाला स्वाभिमानाची भाकर कमवता यावे अशी शिक्षण पद्धती लागू करण्याची नितांत गरज आहे.
    तुम्ही सांगितलेली दोन रहस्य किंवा तत्त्वे खरंच जर आपल्या आयुष्यामध्ये अंगिकारलं तर जग कितीही बदलले कितीही मोठे मोठे आव्हान नेत्यांमध्ये निर्माण झाले तरी ही त्या आव्हानांना लाथ मारण्याची क्षमता निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
    self Developmen(स्व विकास)
    आपण आत्तापर्यंत जे काही जीवन जगत आलो आहोत त्या जीवनातून आपल्याला खरंच आनंद समाधान मिळतो का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच नाही असे येईल . कारण आत्तापर्यंत जीवन हे दुसऱ्याच्या विचारावर अवलंबून होतं . या विचाराने मुळे आपण शैक्षणिक बाबी मध्ये मोठे मोठे पदव्या किंवा सर्टिफिकेट मिळवू शकतो परंतु शेवटी रिझल्ट आपल्या मनासारखा राहात नाही

    आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो, प्रचंड अभ्यास करतो, खूप खूप सार्‍या पुस्तकांचा खजिना आपल्याकडे असतो आणि ते आपण इतरांच्या म्हणण्यानुसार वाचत असतो परंतु ते आपल्यासाठी समाधान कारक राहत नाही आणि त्यातून रिझल्ट दिसत नाहीत या गोष्टी कारण ही आहे की , आपण पण आत्तापर्यंत आपल्यामध्ये काही इनवेस्ट केलेलं नसतं. आपल्या आत डोकावून बघण्याची संधी आपल्याला आजूबाजूची लोकं येऊच दिली नसतात. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते आहे आणि यातून फक्त निराशा हाती लागत.

    मग या निराशेला थांबवण्यासाठी आणि निराशेच्या जागी उत्सुकता निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये डोकावून बघण्याची नितांत गरज आहे. स्वतःमध्ये इन्वेस्ट करण्याची गरज आहे. यामुळे आपल्या मनाचा पाया पक्का होतो आणि आपली कौशल्य किंवा ज्या गोष्टी मध्ये आपला इकिगाई आहे त्या गोष्टीमध्ये आपण काम करायला सुरुवात करतो आणि आपलं जीवन हे स्वर्ग बनत जात Due to this Self Development is very very very very important.

    मार्गदर्शक ( Mentor)
    प्रत्येकाची इच्छा असते की , आपल्याला आपल्या मनासारखा जीवन जगायला मिळाला पाहिजे परंतु हे फक्त काही मोजक्याच लोकांच्या बाबतीत सत्यात उतरते. असं का होते ये कि जगातील काहीच लोक प्रचंड यशस्वी होतात ज्या गोष्टीला त्यांनी हात लावतात ती गोष्ट त्यांची होती अशी कोणती जादू आहे त्यांच्याकडे? आपण सुद्धा प्रचंड मेहनत करतो असतो आपल्याला असे यश का मिळत नाही? अशी प्रश्न मला पडलेलीच होती आणि हा ब्लॉग वाचून म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर मिळाले ते फक्त उत्तरा पुरते मर्यादित आहे तर उत्तरा पलीकडचं जीवन त्यामध्ये सामावलेला आहे.
    आपली मेहनत प्रचंड वेगाने , रात्रंदिवस चालू असते , सकाळी सहापासून ते रात्री 12 पर्यंत आपण लायब्ररीमध्ये प्रचंड मेहनत करत असत तीन तीन चार चार वर्ष झगडत असतो तरीसुद्धा आपल्याला यश मिळत नाही कारण आपल्या मेहनतीचे दिशा ही यशाच्या विरुद्धार्थी आहे त्यामुळे यामधे कितीही जरी वेग असला तरी ते याशापासून पासून लांब जात असते. ही दिशा योग्य ठरवण्यासाठी मार्गदर्शक एक महत्त्वाचे असते ते योग्य मार्ग दाखवतात. आणि आपण त्या मार्गावर जरी भरकटत असतो तरी ते आपला हात धरून पुन्हा त्या मार्गावर आणि push करतात असतात त्यामुळे ळे आपल्याकडे Succes ला येणे भागच आहे.
    Mentor आपला Hand Hold करून sucsess कडे घेऊन जात असतात. आपल्या ज्या चुका होतात त्या चुका होण्याआधीच टाळण्याचे काम मार्गदर्शन करत असतात त्यामुळे आपल्या कृतीमध्ये वेग प्राप्त होतो आणि त्या वेगाची दिशा ही योग्य असते कारण मार्गदर्शक त्याला पुरेपूर सहाय्य करत असतात त्यामुळे यशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणीही आणू शकत नाही. ( Success want to speed )
    आत्तापर्यंत जगामध्ये चे कोणतेही मोठे व्यक्ती आहेत किंवा होऊन गेले त्यांच्या आयुष्यामध्ये एक Mentor होते म्हणून त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची चुणूक दाखवलेली आहे. आणि त्यांना हवं ते मिळवलेला आहे . आयुष्यामध्ये मार्गदर्शक किती महत्त्वाचे आहे हे हे इतिहास सुद्धा सांगतो.

    रामायणामधील अंजनी पुत्र हनुमान सुरुवातीला एक साधे सामान्य व्यक्ति होते , त्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याची सुप्त गुणांची ची जाणीव न्हवती परंतु जेव्हा त्यांच्य आयुष्यामध्ये मार्गदर्शक म्हणून गुरु जामुवांत चा प्रवेश झाला. खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच हनुमान सगळ्यांना ओळख झाले आणि आज आपण जी त्यांची कीर्ती ऐकतो ते सगळ्या त्यांच्या गुरु मुळे साध्या हनुमानाचा अंजली पुत्र हनुमान म्हणून नावारूपाला आले.

    आपल्याकडे कौशल्य भरपूर असतात परंतु ती कौशल्य कुठे आणि कसे वापरायचे या गोष्टीचा मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक अत्यंत आवश्यक असतात. महाभारतामध्ये निष्णात धनुर्धर असलेले अर्जुन द्रोनाचाऱ्या च्या मार्गदर्शनाने आपल्या कार्याची ची गगन भरारी झेप घेऊन दाखवली आहे . यामध्ये खरं बघायचं झालं तर अर्जुनापेक्षा कर्ण खूप हुशार होता त्याच्याकडे अर्जुन राव पेक्षाही जास्त कौशल्य होती परंतु त्या कौशल्याला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शक त्यांच्या आयुष्यामध्ये नव्हते त्यामुळे ते वर येऊ शकले नाही.
    आज 21 मार्च ज्यांची आपण जयंती साजरी करतो असे अख्या महाराष्ट्राचे कुलदैवत, ज्यांनी रयतेच्या सुखासाठी आपला प्राण गहान असे थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गगनभरारी कामगिरी च्या मागे एक मार्गदर्शक म्हणून मा जिजाऊ चा हात होता त्यामुळे ते प्रचंड युक्त्या , बुद्धीच्या जोरावर आपलं राज्य अटकेपार घेऊन जाऊ शकले.
    Mentor मध्ये अगदी वाळलेल्या झाडा ला फुलवण्याची ताकद असते हे आपल्याला चंद्रगुप्त मौर्याच्या इतिहासावरून समजते. एका दाशी चा असलेला हा मुलगा चंदू ज्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की आपण एक महान राज्यकर्ता बनू शकतो परंतु तू गुरुवर्य चाणक्य मुळे ते चंद्रगुप्त मौर्य या महान नावा पर्यंत येऊन पोहोचले.

    अशी ही प्रबोधनात्मक शिदोरी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    Reply

Leave a Comment

Translate »
error: Content is protected !!