जीवनात संपूर्ण परिवर्तन कसे करावे? How to make a total transformation in life?

Spread the love

आजचा ब्लॉग जीवनात संपूर्ण परिवर्तन कसे करावे? या संबधीचा आहे. हा ब्लॉग जीवनाला पूर्णपणे बदलण्याच्या बाबतीत आहे, तुम्ही तुमच्या जीवनाकडे जेंव्हा मागे वळून बघाल तेंव्हा तुमचे ते भूतकाळातील आयुष्य तुम्हाला तुमचे वाटणार नाही तर, ते दुसऱ्याच कोणाचेतरी होते असे वाटेल.

जीवनात खूप काही मोठं करायचं असेल तर एखाद्या प्रोग्रेसिव्ह समूहाला (Community) जॉईन करावे लागेल तसेच एखाद्या मिशन चा भाग बनावे लागेल, असे जगातील मोठी मोठी लोकं सांगतात. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचाल याची मला खात्री आहे. यातून तुमच्या मनात नक्कीच मोठे होण्याची ईच्छा जागृत होईल.
आज मी तुम्हाला एक आव्हान करतोय की  Lifeshodh या प्रोग्रेसिव्ह समूहाला जॉईन करून त्याच्या मिशन मध्ये सामील होण्याच्या संधीचा लाभ जरूर घ्या. त्यासाठी तुमची प्रतिक्रिया (Comment) ब्लॉग च्या खाली नक्की नोंदवा. जेणेकरून चांगल्या विचारांची देवाण घेवाण वाढेल.

आज मी तुमच्यासोबत सात गुरुमंत्र शेअर करीत आहे, जे मला माझ्या गुरूंकडून शिकायला मिळालेत.

जेंव्हा जेंव्हा मी जगातील महान आणि यशस्वी लोकांकडे बघतो ना, मग ते रतन टाटा असोत की धीरूभाई अंबानी, स्वामी विवेकानंद असोत की मदर तेरेसा, मार्क झुकेरबर्ग असो की, नारायण मूर्ती, ए.पी.जे. अब्दुल कलाम असोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांपैकी प्रत्येक व्यक्ती या सात टप्प्यांतून (Stages) गेलेले आहेत असे लक्षात येते.

हे सात गुरुमंत्र माझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला पूर्णपणे मदत करीत आहेत व यातून माझे संपूर्ण जीवन बदलले आहे.

मला माहीत आहे तुम्ही माझे ब्लॉग वाचत आहात व अशाप्रकारचे विविध वाचन, मनन आणि चिंतन करीत असाल, यावरून मला असे वाटते की तुम्ही तुमच्या जीवनात परिवर्तन करण्याची इच्छा बाळगणारे परिवर्तनवादी नक्कीच आहात. होय की नाही?

तुम्ही तुमच्या जीवनात तुमच्या बाजुने यशासाठी जेव्हढे प्रयत्न करायला पाहिजे तेव्हढे जरूर करीत असाल, होय ना? तुम्ही तुमची रोजची लढाई समर्थपणे जरूर लढत असाल.

तुम्हाला प्रश्न पडत असेल ना? की आपण तर सर्वकाही करीत आहोत परंतु आपल्याला पाहिजे तेव्हढा रिझल्ट का मिळत नाही? जेव्हढे यशस्वी व्हायला पाहिजे तेव्हढे यश का मिळत नाही?

जीवनात संपूर्ण परिवर्तन कसे करावे? हा ब्लॉग जीवनाला पूर्णपणे बदलण्याच्या बाबतीत आहे, तुम्ही तुमच्या जीवनाकडे जेंव्हा मागे वळून बघाल तेंव्हा तुमचे ते भूतकाळातील आयुष्य तुम्हाला तुमचे वाटणार नाही तर, ते दुसऱ्याच कोणाचेतरी होते असे वाटेल.
हा ब्लॉग जीवनाला पूर्णपणे बदलण्याच्या बाबतीत आहे, तुम्ही तुमच्या जीवनाकडे जेंव्हा मागे वळून बघाल तेंव्हा तुमचे ते भूतकाळातील आयुष्य तुम्हाला तुमचे वाटणार नाही तर, ते दुसऱ्याच कोणाचेतरी होते असे वाटेल.

या प्रश्नांची उत्तरे आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला नक्की मिळण्यास मदत होईल.

हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत जरूर वाचा कारण यात ती उत्तरे देणाऱ्या सात टप्प्यांची (Stages) मी चर्चा करणार आहे व एक गोष्ट सांगणार आहे जी कहाणी मी एक वर्षापूर्वी मोटीवेशनल स्पीकर दीपक बजाज सर यांच्या एका ट्रेनिंग-वर्कशॉप मध्ये ऐकली होती, त्या एका गोष्टीने मला खूप प्रभावित केले होते.

मला खात्री आहे, ती गोष्ट वाचून तुम्हीही तेव्हढेच प्रभावित होणार व जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन त्यातून बदलवण्यास ती कहाणी नक्की मदत करेल.

यांमध्ये आज मी ज्या सात टप्प्यांची चर्चा करणार आहे त्यांपैकी तुम्ही कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर येऊन अडकलेले असाल तर ती गोष्ट त्या टप्प्यातून तुम्हाला बाहेर पडण्याची शक्ती नक्की देईल व एक मार्ग दाखवण्यास मदत करेल.

अशाप्रकारे तुम्ही एक एक टप्पा (Stage) पार करीत जीवनात महान बनण्याच्या वाटेवर वाटचाल करू लागाल, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो.

तुम्हाला  महान बनायचे असो की असिमित यश प्राप्त करायचे असो, तुम्हाला तुमचे उत्पन्न पटीत वाढवायचे असो की जगात प्रभावशाली व्यक्ती बनायचे असो, सक्षम प्रशासक किंवा प्रभावी नेता, अभिनेता / अभिनेत्री बनायचे असो, की कोणत्याही क्षेत्रात आपली छाप पाडायची असो, ते सगळे शक्य आहे.

हा ब्लॉग अतिशय काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत वाचा, मी तर म्हणेल एकदा, दोनदा नव्हे वारंवार वाचा म्हणजे त्यातील बारकावे तुम्हाला कळायला मदत होईल.

जीवन परिवर्तन करणारी गोष्ट:-

एका ठिकाणी एक तलाव होता.

तो १० ते १२ फूट खोलीचा असेल.

त्यात छोटे छोटे जीव-जंतू व किडे राहत होते.

तिथे पाण्यात वाढणारी छोटी छोटी झाडी-झुडपे आणि वेली सगळीकडे पसरल्या होत्या.

तलावाच्या तळाशी किड्यांचा एक समूह राहत होता. बर्‍याच काळापासून ते आपले जीवन मजेत व्यतीत करीत होते.

कधी कधी असे व्हायचे की, त्या समूहामधील एखादा किडा त्या पाण्यातील वेलीच्या आधाराने हळूहळू पाण्याच्या बाहेर यायचा. परंतु याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट अशी व्हायची की, जो किडा तलावाच्या तळातून जसा बाहेर जायचा तसा तो आपल्या समूहात कधीच परत यायचा नाही.

समूहातील सर्व किड्यांना प्रश्न पडायचा की, वर गेलेल्या सहकाऱ्यांचे नेमके काय होत असेल? कारण आजपर्यंत जेव्हढे किडे खालून वर गेले त्यांच्यापैकी एकही किडा कधीच परत आला नाही.

एके दिवशी किड्यांनी एक सभा आयोजित केली व एक करार केला, की त्यांच्यापैकी एक किडा तळातून वर जाईल, वर गेल्यावर तिथे नेमके काय घडते ते परत येऊन सविस्तर सांगेल आणि इथून बाकी सर्व किड्यांना बाहेर काढण्याची नैतिक जबाबदारी तो स्वीकारेल, असे ठरले.

आता एक आव्हान असे होते की त्यांच्यापैकी नेमकं कोण तळातून बाहेर जाण्याची हिंमत करणार?

सर्वच किडे भितीच्या विचाराने आपापल्या बिळात शिरले. कारण वर गेल्यावर आपले नेमके काय होईल याचा काहीही अंदाज नसल्यामुळे बाहेर गेल्यावर आपले काही बरे वाईट तर होणार नाही ना? या भीतीपोटी कोणीच पुढे येईना.

शेवटी त्या किड्यांमधील एका किडयाने वर जाण्याची हिंमत दाखवली, म्हणजेच ते आव्हान त्याने स्वीकारले.

आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद घेऊन वर जाण्यासाठी त्याने आपले प्रयत्न सुरू केले.

इतर सर्व किड्यांना वचन दिले की, तो लवकरच परत येईल व वर नेमके काय घडते ते सगळे सविस्तर सांगेल. तसेच बाकी सर्व किड्यांना बाहेर काढेल, असे सांगून त्याने सर्वांचा निरोप घेतला.

तो किडा तळ्यात वाढलेल्या एका वेलीचा आधार घेत हळूहळू वर पोहचला व एका पानावर जाऊन बसला.

वर पोहचल्यावर तो सगळीकडे बघायला लागला, खाली पाणीच पाणी आणि वरती निळे आकाश व सूर्याची किरणे, सोबतच तळ्यात आजूबाजूला कमळाची फुले पाण्यावर तरंगत होती.

हे सारे दृश्य बघून तो विचारात पडला की आता आपले काय होणार?

सकाळच्या कोवळ्या सूर्याच्या किरणांनी तो आता हळूहळू सुकू लागला. संध्याकाळपर्यंत त्याच्या अंगाला हलकीशी खाज यायला लागली.

आता त्याच्या शरीराचे काही भाग हालायला लागले.

त्याने जेंव्हा स्वतः आपल्या शरीराची हालचाल करायला सुरुवात केली तेंव्हा बघता बघता त्याच्या शरीरातून दोन छोटे छोटे पंख यायला लागले, हळूहळू त्याने पंखांची फडफड चालू ठेवली.

आणखी थोड्या वेळाने तो पानावरुन थोडा थोडा वर उडायला लागला.

आता सूर्याच्या गरमीने तो एक छोटा किडा एका ड्रॅगन फ्लाय (Dragon Fly) मध्ये परावर्तित झाला.
या Dragon Fly ला मराठीत काही ठिकाणी चतुर किंवा घोडा असेही म्हणतात.

तो आता आकाशात उडायला लागला, कधी कमळाच्या फुलांवर बसतोय, तर कधी पानांवर येऊन बसतोय.

असा बेभान खेळतोय, बागडतोय. अक्षरशः त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला खूप आनंद वाटत होता. हा त्याच्यासाठी पूर्ण नवीनच अनुभव होता.

रात्र झाली तेंव्हा तो तिथेच एका कमळाच्या पानावर एक जागा शोधून बसला. त्याने तिथेच रात्र घालवली.

दुसरा दिवस उगवला, परत तो उडायला लागला, उडता उडता त्याचे लक्ष अचानक खाली गेले, तिथे किड्यांची कॉलनी त्याला दिसली. त्याला एकदम आठवले की आपण तर वचन दिले होते परत जाण्याचे.

थोडा विचार करून त्याने तलावाच्या तळात असलेल्या आपल्या सहकाऱ्यांकडे परत जाण्यासाठी प्रयत्न केला, आपले शरीर त्या तळ्यातील पाण्याला लावण्याचा प्रयत्न केला, परंतु घडले असे की, पाण्याच्या आत तो जावूच शकत नव्हता.

एकदा नव्हे अनेकदा प्रयत्न करूनही त्याला यश काही मिळतच नव्हते.

त्याचे सारे प्रयास असफल ठरले, त्याने खाली किड्यांना बघीतले. त्याची प्रचंड इच्छा असूनही तो खाली तळात जाऊ शकत नव्हता, कारण तो आता एक पंखावाला ड्रॅगन फ्लाय बनला होता. त्याने आणखी प्रयत्न केला असता तर पाण्यात बुडून आपला जीव त्याला गमवावा लागला असता.

आता त्याचे एका किडयाच्या रुपातून उडणाऱ्या ड्रॅगन फ्लाय मध्ये रूपांतरण झाले होते.

खाली तळात असलेल्या इतर किड्यांना बघून त्याला आपल्या जीवनाच्या परिवर्तनाचे सात प्रकारचे बोध झाले. (Seven Realizations of Transformation of Life)

या सात प्रकारच्या बोधाने मला खूपच प्रभावित केले आहे. ते सात बोध जेंव्हा मी समजून घ्यायला सुरुवात केली, तेंव्हा माझ्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन व्हायला लागले.

मला विश्वास आहे जेंव्हा तुम्हीही त्या Seven Learning’s समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेंव्हा तुमचेही आयुष्य आज जसे आहे तसे अजिबात राहणार नाही. याचा अनुभव तुम्हाला हा ब्लॉग वाचताना पुढच्या पाच ते सहा मिनिटातच येईल. अशी मी तुम्हाला ग्वाही देतो.

ड्रॅगन फ्लाय पानावर बसून स्वतःमध्ये झालेल्या परिवर्तनाचा विचार करू लागला. त्या सुंदर ड्रॅगन फ्लायला झालेला एक एक बोध त्याच्यापुढे यायला लागला.

ड्रॅगन फ्लायला झालेला पहिला बोध:-

१) जर मी वरती येण्यासाठी प्रयत्न केला नसता तर खाली आजही किडयाचेच जीवन जगावे लागले असते:-
(If I hadn’t tried to go up, I would still be living the life of a worm today.)

त्या ड्रॅगन फ्लायच्या मनात एक स्वप्न होते, इच्छा होती की, किडयाचे जीवन जगण्यासाठी आपला जन्म झाला नाही.

जीवनात काहीतरी मोठे होऊ शकते या विचाराने त्याने प्रयत्न केला होता.

वर जाण्याची हिंमत तर करून बघूया, जर काहीच झाले नाही तर किडा तर आपण राहणारच आहोत. बाकी तर सर्व फक्त बाता मारत असतात, आपण हिंमत करून वर जाण्याचे आव्हान का नाही स्वीकारायचे?

जीवनाला उन्नत करणाऱ्या विचाराने त्या एका किडयाला, एका सुंदर ड्रॅगन फ्लायमध्ये परावर्तीत केले होते.

यावरून एक सूत्र सापडले की, जीवनात खरंच परिवर्तन करायचे असेल तर मनात एक तीव्र ईच्छाशक्तीची गरज असते. ईच्छाशक्ती ही शोधून सापडत नाही तर ती निर्माण करावी लागते. (You don’t find willpower, you have to create it.)

आपण इतर लोकांकडून खूप अपेक्षा करीत असतो, पंतप्रधानांनी हे करायला पाहिजे, सरकारने ते करायला पाहिजे, देशातील सर्व लोकांनी हे करायला पाहिजे, एखाद्या खेळाडूने असे खेळायला पाहिजे, पोलिसांनी हे करायला पाहिजे, शिक्षकांनी ते करायला पाहिजे, शाळा, महाविद्यालयांनी हे करायला पाहिजे, ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने, आणि महानगरपालिकेने अमुक करायला पाहिजे, उद्योजकांनी ते करायला पाहिजे, शेतकऱ्याने हे करायला पाहिजे. या ब्रम्हांडातील प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षा आहेत, पण आपण स्वतः कधी काही करणार की नाही? तुमच्याहातून काहीतरी चांगले व्हायला पाहिजे याचा कधी विचार केला आहे?

महात्मा गांधी म्हणाले होते की, “तुम्ही ‘तो बदल’ स्वतःमध्ये करा, की, ‘जो बदल’ तुम्हाला दुसऱ्यांमध्ये झालेला बघायला आवडेल”.

(Mahatma Gandhi had said that you should make that change in yourself that you would like to see the change that has taken place in others.)
ड्रॅगन फ्लायला झालेला दुसरा बोध:-
२) स्वतः मध्ये झालेले खरे परिवर्तन हे आहे की, जेंव्हा आपण आपल्या इतिहासाला मागे वळून बघू, तेंव्हा तो भूतकाळ आपला नव्हे, दुसर्‍या कुणाचा तरी वाटला पाहिजे.
(When we look back at our history, it should feel like someone else’s past, not ours.)

एका किड्याचे रूपांतर ड्रॅगन फ्लायमध्ये झाले होते, हे परावर्तीत झालेले रूप जेव्हा तो ड्रॅगन फ्लाय स्वत: बघेल ना तेव्हा, या आधी आपण किडा होतो या आपल्या भूतकाळावर त्याचा कदापी विश्वासच बसणार नाही.

ड्रॅगन फ्लायला झालेला तिसरा बोध:-

३) खरे परिवर्तन ते आहे, जे तुमची ईच्छा असूनही त्या भुतकाळातील कोशात तुम्हाला जाऊ देणार नाही, जिथून तुम्ही अथक प्रयास करून बाहेर पडला होता.
(Once you have transformed, you can never go back to your past form.)

त्या ड्रॅगन फ्लायमध्ये अशाप्रकारचे परिवर्तन झाले होते की, त्याने कितीही प्रयास केला तरी, तो परत किडा कधीच बनणार नाही.

ड्रॅगन फ्लायला झालेला चौथा बोध:-

४) परिवर्तनासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. आपल्या जवळच्या लोकांच्या मनाच्या विरोधात जाऊन कधी कधी निर्णय घ्यावे लागतील.
(There is a huge cost to change. Sometimes decisions have to be made against the will of those closest to you.)

ड्रॅगन फ्लायला आपल्या स्वतःच्या लोकांनी बरेच समजावले असेल की वरती जाण्याचे हे आव्हान तू स्वीकारू नकोस, असे काम आजपर्यंत आपल्या वंशातील कोणत्याही किडयाने अजून केलेले नाही, तू कसा काय करणार? वरती गेल्यावर आपल्या लोकांपासून तू लांब जाणार ही सर्वात मोठी किंमत तुला मोजावी लागेल.

असे अनेक प्रश्न त्याच्यापुढे मांडले गेले असतील ना? ते आव्हान जर त्याने स्वीकारले नसते तर आज हा परिवर्तनाचा दिवस त्याला बघायला मिळाला असता काय?

ड्रॅगन फ्लायला झालेला पाचवा बोध:-

या विचाराने माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकला आहे.
५) खरे परिवर्तन ते आहे जे की, जर मी परत त्या किड्यांच्या वस्तीत गेलो, तर ते आपले सहकारी हे कधीच मानायला तयार होणार नाहीत की, मी त्यांच्यापैकीच एक आहे जो त्यांच्यामधूनच बाहेर पडला आहे. 
(If I went back to that insect habitat, they would never be willing to let their people believe that I was one of them.)

हा विचार मला खूप पावरफूल वाटतो.

मोहनदास करमचंद गांधी यांचे जे मित्र होते ते, महात्मा गांधींचे मित्र नव्हते.

नरेंद्र ने ज्या दिवशी स्वामी विवेकानंद बनण्याचा निर्णय घेतला त्यादिवशी ते सर्व मित्र त्यांच्या जीवनातून निघून गेलेत, जे नरेंद्रच्या सोबत होते.

भगतसिंग ने जेंव्हा क्रांतिकारी भगतसिंग बनण्याचे व्रत हाती घेतले त्यादिवशी ते सारे मित्र सोडून गेले जे भगतसिंग चे मित्र होते.

हे आपल्या जीवनात असे नेहमी घडत राहणार, तुम्ही जेंव्हा जेंव्हा जीवनात परिवर्तन किंवा बदल करण्याचा निर्णय घ्याल, किंवा जीवनात पुढे पुढे जाण्याचा प्रयास कराल, तेंव्हा तेंव्हा तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही बदललात. तुमचे बदलणे त्यांच्यासाठी अस्वस्थतेची (Uncomfortable) भावना निर्माण करेल. त्यांचे तुमच्यासोबत आणि तुमचे त्यांच्यासोबत उठणे बसणे अस्वस्थ करणारे असेल. ते तुम्हाला सारखे म्हणतील, तुमच्यात आता बदल झाला आहे, तुम्ही पूर्वीसारखे आता वाटत नाही.

एक आश्चर्य सांगू? आपल्यातील १०० पैकी ९९ लोकं आपण बदललो नाही असे म्हणून परिवर्तनाच्या सुंदर प्रक्रियेला मुकतात आणि ते जिथून आले होते तिथेच परत जातात.

जसे की एक उदाहरण घेऊया, आज हा ब्लॉग वाचून एखाद्या व्यक्तीने ठरवले की उद्यापासून त्याची तंबाखू, गुटखा, खर्रा, स्मोकींग किंवा ड्रिंकिंगची सवय सोडून द्यायची. ही बातमी त्याने आपल्या चार मित्रांना जर सांगितली, तर त्याच्या चार मित्रांना आनंद व्हायला पाहिजे ना? की आपला एक मित्र या नरकातून बाहेर पडला.

परंतु ते त्याचे मित्र तसे होऊ देणार नाहीत, कारण हा पाचवा मित्र आपल्या सोबतच राहिला पाहिजे यांसाठी ते चार मित्र पूर्ण ताकद लावतील, आणि या व्यसनातून तो मुक्त होऊ नये म्हणून त्याला मैत्रीच्या नावाखाली एक शेवटचा सिगरेटचा कश किंवा शेवटचा पेग म्हणत त्यां मित्राला परत त्याच नरकात ओढण्याचा प्रयत्न करतील. हे खरे आहे की नाही?

असे म्हटले जाते की, मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की, त्याने मनावर घेतले तर तो आपल्या कोणत्याही बिकट परिस्थीतीत परिवर्तन करू शकतो. जी परिवर्तनाची शक्ती आपल्याला जन्मतः मिळालेली आहे तीचा १०० पैकी ९९ लोक फायदाच घेत नाहीत.

आपण मनुष्य असून बदलणार नसाल तर आपल्यापेक्षा ते कीडे, जीव-जंतू चांगले म्हणावे लागेल ना!

ड्रॅगन फ्लायला झालेला सहावा बोध:-

६) तुम्हालाही हाच प्रश्न पडेल जो प्रश्न त्या ड्रॅगन फ्लायला पडला की, मी तिथूनच तर वर आलो आहे, ते सगळे माझेच आहेत, त्यांना किड्यांच्या जगातून वर आणण्याची ईच्छा तर खूप आहे, परंतु ते माझं ऐकू शकत नाहीत, माझा आवाज मी त्यांच्यापर्यंत पोहचवू शकत नाही, काय करावे?

अशी त्या ड्रॅगन फ्लाय सारखी अवस्था तुमचीही कधी कधी होण्याची शक्यता आहे, आपण ज्या समाजात मोठे झाला आहात, त्या समाजासाठी खूप काही करावेसे वाटत असेल परंतु तुमचं कोणी ऐकूण घेत नसेल तर, एक काम करत राहावे लागेल की, आणखी वर उडत रहा, आपली गुणवत्ता आणखी वाढवत रहा, आपली कहाणी हळूहळू लोकांना सांगत रहा, एक दिवस असा येईल की त्या उडणाऱ्या ड्रॅगन फ्लायला बघून खाली असलेला एखादा किडा प्रभावित होईल व विचार करेल की, हा उडू शकतो तर आपण का उडणार नाही, अशी प्रेरणा तो दुसरा किडा घेईल आणि एक दिवस तो दुसरा कीडाही ड्रॅगन फ्लाय बनून उडू लागेल.

एक दिवस त्या ड्रॅगन फ्लायला येऊन म्हणेल की, थॅंक्स, कारण तुमच्यामुळे मी आज उडू शकलो. हे शब्द ज्या दिवशी कानावर पडतील त्यां दिवशी त्या ड्रॅगन फ्लायचे जीवन सफल झाले असे समजावे.

ड्रॅगन फ्लायला झालेला सातवा बोध:-

७) किड्यांच्या पुढे जे आव्हान होते ते स्वीकरण्यासाठी पुढाकार घेतला नसता तर आजचे ड्रॅगन फ्लायचे जीवन बघायला मिळाले नसते आणि हे जग एव्हढे सुंदर आहे, ते कधीच कळले नसते.   
(Wouldn’t the life of today’s dragonfly have been seen if we hadn’t taken the initiative to accept the challenge that lies ahead?)

आपलेही काहीसे असेच होते, असे तुम्हाला वाटत नाही का?

आपण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात एव्हढे गर्क झालेलो असतो की, आपल्याला वाटायला लागते की, आपल्या आसपास जे आहे, तिथेच जग संपतंय, त्यापुढे काहीही नाही असे समजून जीवनात कोणतेही नवीन आव्हान आपण स्वीकारण्यास कधीच तयार होत नाही.

जीवनात मोठा विचार करण्याची आपण हिंमतच करत नाही, त्यामुळे आपल्यातील नेतृत्वाचे (Leadership) गुण कधीच विकसित होत नाहीत.

सारांश:-

कीड्याचे रूपांतर ड्रॅगन फ्लायमध्ये झाल्यावर त्या  ड्रॅगन फ्लायला उडत राहण्यासाठी व आणखी उंच जाण्यासाठी त्याच्यासारख्या उडणाऱ्या ड्रॅगन फ्लायशीच मैत्री करावी लागेल, जेणेकरून ते त्याला आणखी उंच भरारी कशी घ्यायची हे शिकवतील आणि त्याला वर खेचतील.

तुम्हाला आजच्यापेक्षा आणखी जबरदस्त जीवन जगायचे असेल तर, एक काम करावे लागेल, योग्य समविचारी लोकांचा शोध घ्यावा लागेल व त्यांची संगत करावी लागेल, जेणेकरून तुम्हाला ते आणखी वर खेचतील.

You should find the right like-minded people, who will pull you up.

तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद!!

हा ब्लॉग तुमच्या आवडत्या लोकांना / विद्यार्थ्यांना / मित्रांना नक्की शेअर करा, काय सांगता येईल त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात तुमचा हा छोटासा प्रयास महत्वाचा ठरेल .

आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?

आणखी वाचा: जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? What’s the secret that only five percent of people in the world succeed?

आणखी वाचा: यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?

आणखी वाचा: माणूस आपल्या उपजत कौशल्य आणि कल्पनांवर काम का करत नाही? Why are people not working on our talent and ideas?

आणखी वाचा: आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. No one can stop you from succeeding in life if you do your own research.

आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?

आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?


Spread the love

93 thoughts on “जीवनात संपूर्ण परिवर्तन कसे करावे? How to make a total transformation in life?”

  1. Thank you so much
    To giving direction to my aim.I refered this blog to my sister’s and they also inspired from this

    Reply
  2. अप्रतिम ब्लॉग आहे सर. 👌👌👌हे सात प्रकार चे बोध समजून अमुलाग्र परिवर्तन करू😊.

    Reply
  3. खूपच छान सर. तुमच्या ब्लॉग्स मधून आम्हाला नेहमीच काहीना काहीतरी मोटिवेशन मिळत असतं 👌😊

    Reply
  4. अप्रतिम विचारशैली , खूपच चविष्ट लिखाण आणि नक्कीच या लिखाणावरून आम्ही सुद्धा वेगवेगळे आव्हाने बम्बाट इच्छाशक्ती ने स्विकारु आणि Dragan fly सारखं गंजलेल्या विचारांना धार देऊन चकाकतं बणवण्याचा प्रयत्न करू.

    Reply
  5. त्या ड्रॅगन फ्लायरने जिथे आहोत तिथूनच पाण्या बाहेर काय आहे याचा विचार केला असता तर कदाचित तो कधीच पाण्याबाहेरच सुंदर जग पाहू शकला नसता. ज्याचं कारण ठरली त्याची ‘अगम्य ईच्छाशक्ती’.

    त्याचबरोबर त्याला मिळालेला ५ वा बोध जनू “वैश्विक सत्य” च आहे अस म्हणता येईल.
    ५ व्या बोधातील मला आवडलेल्या शेवटच्या दोन ओळी,
    “आपण मनुष्य असून बदलणार नसाल तर
    आपल्यापेक्षा ते कीडे, जीव-जंतू चांगले
    म्हणावे लागेल ना! “🌸

    ईच्छाशक्ती ही शोधून सापडत नाही तर ती निर्माण करावी लागते.
    खरच खुप सुंदर लेख आहे🍃

    Thank you sir.

    Reply
    • तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे व्हावे हा उद्देश ठेऊन हा माझा छोटासा प्रयास आहे.

      Reply
  6. अप्रतिम ब्लॉग आहे sir. किती सोप्या भाषेत तुम्ही समजावता…. आमच्यासाठी तुम्हीच आमचे ड्रॅगन फ्लाय आहात … कारण आमचा आयुष्यात उंच उडण्यासाठी तुम्ही मदत करत आहात Thank you so much sir🙏😊

    Reply
  7. वाह सर… अति सुंदर लेख आहे.
    तुम्ही एका उदाहरणाने एवढे मोठे सत्य मांडले ज्यांचा सहसा आपण विचारच करत नाही..
    सर असेच प्रेरणादायी विचार मांडून आकाशात उंच झेप घेण्यासाठी बळ देत रहा…तुमचा हा ब्लॉग वाचून मी काहीवेळ पर्यंत स्तब्ध झालो…….
    खूप खूप धन्यवाद सर
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👌🙏💯👌✍️✍️✍️🙏🙏

    Reply
  8. सर खूप छान संदेश दिला आहे .आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन कसे असावे असा सुदर असा लेख दिला धन्यवाद सर👌👍

    Reply
  9. सर या किड्याचा जसा ड्रॅगन फ्लाय होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण समोर ठेवलेल्या ध्येयांना सामोरे जाऊन आपल्या जीवनात परिवर्तन कसे करता येईल ते या ब्लॉगच्या सात बोधांच्या माध्यमातून समजले. हा ब्लॅाग आमच्यात नवी ऊर्जा निर्माण
    करून जीवनात नक्कीच परिवर्तन घडून आणेल. Thank You sir.

    Reply
  10. सर आपण अप्रतिम मांडणी करता. आपल्या लेखात कर्मण्यता, प्रेरणा व भविष्याचा वेध यांचा त्रिवेणी संगम दिसून येतो.

    Reply
  11. सर तुमचा हा ब्लॉक वाचून मला खूप आनंद झाला की एक किडा आपल्या जीवनात एवढा बदल करू शकतो तर आपण का नाही करू शकत ? हा ब्लॉक वाचून मला ही या किड्या सारखे चे काही प्रयत्न मे पण माझ्या जीवनात करेल आणि त्याचे जे सगळे श्रेय असेल तुम्हाला जाईल……… धन्यवाद सर…!🙏

    Reply
    • तुझा हा प्रयत्न करणारा विचार तुला जीवनात काहीही कमी पडू देणार नाही. तुला खूप शुभेच्छा.

      Reply
  12. #परिवर्तन……!
    भगवद गीतेत सांगितल्या प्रमाणे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. प्रत्येकाने स्वत:ला बदलायलाच हवे. आजच्या सध्याच्या परिस्थितीत स्वता:मध्ये परिवर्तन घडवून आणणे म्हणजे स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणणे अनिवार्य आहे.

    आजच्या सरांच्या या एका लेखाने मला कुठेतरी विचार करायला भाग पाडलं….!
    स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर सर्वात आधी स्वतःला वेळ देण गरजेज आहे. आजकाल आपण स्वतःपेक्षा इतरांकडेच जास्त लक्ष देतो, बरोबर ना!
    यासाठी सर्वात अगोदर आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि स्वतःला ओळखण्यासाठी एकांत फार महत्वाचा असतो. आपल्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला समजायला हव्या. वाईट गोष्टींवर, वाईट सवयीवर कशी मात करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. स्वतःची क्षमता ओळखता आली पाहिजे. आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते विक पॉईंट्स कोणते हे समजले पाहिजे.
    त्यामुळे या सगळ्यावर आपण विचार केला पाहिजे.
    विचार करण्याच वरदान जे आपल्याला परमेश्वराने दिलंय ना, याच्या बळावर आपण कोणतेही कामं सहज करू शकतो.
    Rhonda Bryne यांनी THE SECRET हे पुस्तकं (LAW OF ATTRACTION ) या आधारवर लिहलं आहे.
    यात Rhonda Bryne असं सांगतात की, जसा आपण विचार करतं असतो, तशाच गोष्टी आपल्या सोबत घडतं असतात.त्यामुळे नेहमी चांगलाच विचार करावा.
    परिवर्तन घडवून आणायच असेल तर सर्वात महत्वाचं जर काही असेल तर ती तीव्र इच्छाशक्ती., प्रचंड धाडस., चिकाटी., हिंमत आणि प्रयत्न.
    आणि या सर्वांच्या जोडीला आपल्यात एक गोल्डन पॉईंट असायला हवा म्हणजेच “सकारात्मकता” असायला हवी.
    कोणत्याही कामाची सुरवात करतांना नेहमी पॉसिटीव्ह अँप्रोच ठेवावा. जे कोणतं कामं कराल ते प्रामाणिक पणे करा. जो होगा वो देखा जाएगा….!
    भगवत गीतेत सुद्धा हेच सांगितलं आहे, फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा. चांगल्या कामच फळ नेहमी चांगलंच मिळतं.
    चांगल्या गोष्टी घडायला आणि चांगल्या सवयी लागायला वेळ हा लागतोच.असं म्हणतात वाईट सवयी लवकर लागतात, चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो. तर असं काही नसतं. प्रसिद्ध अमेरिकन सर्जन Maxwell Maltz यांच्या PSYCHO – CYBERNETICS या पुस्तकात त्यानी त्यांच्या अनुभवावरून असं सांगितलं आहे की, एखादी कृती आपण सलग 21 दिवस केली की ती आपली सवय होऊन जाते. (21 पेक्षा जास्त दिवस सुद्धा लागू शकतात, पण कमीतकमी 21 दिवस )

    सरानी सारांश मध्ये एका अतिशय महत्वाच्या बाबी चा उल्लेख केला आहे. समविचारी लोकांचा शोध घ्यावा व त्यांची संगत करावी.
    आपल्या जीवनावर आपल्या विचारांचा, आपल्या गुणांचा जसा परिणाम होत असतो, तसाच आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचा, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम होत असतो.
    परिणाम हा चांगला वाईट दोन्ही प्रकारचा असू शकतो.

    सुसंगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो ||
    ही (मोरोपांताची केकावली )

    सुसंगती म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री, गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगितीत राहावे. सुजन वाक्य म्हणजे चांगल्या विचारांची धारणा केली पाहिजे जेणे करून आपलं मन निर्मळ व प्रेमळ होईल.

    ज्याप्रकारे चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो त्याचप्रकारे चांगली माणसं भेटायला सुद्धा वेळ हा लागतोच. त्यामुळे शोधा म्हणजे सापडेल.

    समाजात चांगल्या माणसांच्या जोडीला वाईट वृत्ती ची माणसं सुद्धा असतातच. चांगल्या व्यक्तींना इतरांचा नेहमी चांगल व्हावं असंच वाटत असतं परंतु वाईट वृत्तीच्या, वाईट विचारांच्या व्यक्तींना असं वाटत नाही. त्यामुळे ते आपल्याला नेहमी हिणवण्याचा, कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. किंबहुना त्यांच ते कामच असतं.
    पण या सगळ्याला आपण बळी न पडता. आपलं ध्येय आपल्याला कसं गाठता येईल याकडे आपला कल असला पाहिजे.

    “निंदकाचे घर असावे शेजारी” असं संत तुकाराम सांगून गेले.
    जोपर्यंत आपली निंदा करणारी,आपल्याला कमी लेखणारी, आपल्या चुका काढणारी माणसं आपल्या आजूबाजूला नसतात ना तोपर्यंत आपण एक आदर्श व्यक्तिमत्व नाही घडवू शकत.
    त्यामुळे शांतता, संयम आणी संघर्ष हा हवाच….!

    सरांचा आजच्या या एका लेखाने मला इतका विचार करण्यास प्रवृत्त केल..!
    खरच खूप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏
    या लेखा मुळे खरच खूप प्रेरणा मिळाली. हा लेख मी जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवण्याचा पूर्ण पर्यत करीन.

    आणि सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टी चे आभार मानावेसे वाटत असतील तर ते म्हणजे तुम्ही तुमचे विचार मराठीतुन मांडत आहात.
    हा लेख फक्त आजची तरुण पिढीच नाही वाचणार तर आमचे पालक, नातेवाईक सर्व जण वाचतील.याच एकमेव कारण म्हणजे आपली “मराठी भाषा”!

    तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा….!
    असेच प्रेरणादायी लेख लिहीत रहा, आम्हाला प्रेरणा देत रहा.!

    Reply
    • अप्रतिम प्रतिक्रिया, अशीच शिकण्याची तळमळ असु दे, जीवनात खरी गरज याच गोष्ठीची आहे. असेच शिकत रहा.

      Reply
  13. नमस्कार सर…!
    अतिशय सुंदर लेख तसेच विचार मांडण्याची पद्धत म्हणजे एक अभ्यासपूर्ण लेखण, सर आपण उल्लेख केलेल्या सात टप्पे यशस्वी पार केले तर जीवनात नक्कीच परिवर्तन घडून येईल असे वाटते. पुढील लेखण कार्यास हार्दिक शुभेच्छा….!

    Reply
    • खूप खूप धन्यवाद, सर.
      तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.
      असेच प्रेरित करावे ही विनंती.

      Reply
  14. खूप अप्रतिम लिहिता सर तुम्ही, असे वाटते की वाचतच रहाव हा ब्लॉग संपूच नये. खूप काही शिकायला मिळते. धन्यवाद….असेच प्रेरणादायी लिहीत रहा. तुमच्यामुळे खूप किडे ड्रॅगन फ्लाय होतील नक्कीच.

    Reply
  15. Amazing sir khup chan aahe ब्लॉग 🥰😍👍👍
    Inspiration and motivation होेत khup chan vate read karun he story khup chan aahe sir 👍👍😊
    Thank you so much sir 😍😊👍👍

    Reply
  16. नमस्कार सर,
    मि हा ब्लॉग वाचून खूप motivate झालो
    आणि काही नवीन गोष्टी मला आज शिकायला भेटल्या ज्या प्रत्त्येत यशस्वी वक्ती ने केल्या आहे आणि जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्या गोष्टी करावा लागणार आहे त्या म्हणजे
    1.जीवनात कोणतीही गोष्ट करण्यासाठी धाडस खूप महत्वाचं आहे .
    2. निर्णय घेण्याची क्षमता महत्वाची आहे .
    3. स्वत:चा स्वतःवर विश्वास बळकट असला पाहिजे.
    आपण हे करू शकतो हा विश्वास महत्वाचा आहे.
    4. काहीतरी मोठं करण्याचि जिद्द असली पाहिजे.
    5. इच्छा शक्ती असली पाहिजे.
    एक महापुरुष्याने म्हंटले आहे कि *तुम्ही गरीब घरात जन्माला यात तुमची काही चूक नाहीये , पण तुम्हि गरीब म्हणूनच मेलात् त्या पूर्ण पणे तुमचीच् चुकी आहे*
    6.परिवर्तन साठी धैर्य महत्वाचे आहे
    म्हणतात कि
    Courage is a wonderful thing.
    आणि
    7. जीवनात ध्येय खुप मोठे ठेवले पाहिजे.
    तुम्ही खुप छान मार्गदर्शन केलेय सर.
    खूप खूप धन्यवाद.!!!

    Reply
    • शिकणे हेच आपल्या विकासाचे पहिले पाऊल असते, असेच शिकत रहा. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

      Reply
  17. अतिशय छान!
    मी त्या ड्रॅगन मध्ये स्वत:लाच बघत होतो

    फारच अप्रतिम मांडणी सर जी🙏🍁👍👍

    Reply
  18. #LIFE TRANSFER MATION ✨
    जेव्हा तुमचे ब्लॉग वाचते त्यावेळी खरच दिवस सार्थकी लागल्याची भावना मनात असते !
    आपण कायम फक्त म्हणतो परिवर्तन होन फार महत्वाचं आहे आणि खरच गरजेचं आहे पण ते होताना कायम त्रासदायक वाटत कारण ज्याला आपण एक आरामदायी जीवन म्हणतो ( comfort zone ) तो राहत नाही आणि म्हणून तो आपल्याला त्रासदायक वाटत असतो !
    आम्ही विद्यार्थी बऱ्याचदा सकारात्मक , धेय्यवादी राहण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो आणि ते पाहिल्यावर सुद्धा एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जे काही करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे जो काही बदल करायचा आहे तो आपल्याला करायचा आहे आपण ठरवलेलं धेय्य आपल्याला गाठायच असेल तर प्रयत्न सुद्धा आपल्यालाच करायचे आहेत .
    आणि एकदा या गोष्टी करायला लागलो की मग लक्षात येतं
    नव्हे ऐसे काही नाही अवघड |
    नाही कैवाड तोचीवरी ||तु. म.
    तुकाराांच्या या उक्तीप्रमाणे खरच जर आपण कायम प्रयत्न केले तर Nothing is impossible !
    तुमच्या ब्लॉग मध्ये ज्या ड्रॅगन फ्लाय च
    उदरहण तुम्ही दिलय अगदीच ते आमच्याही आयुष्याला लागू होतं . जे सात बोध तुम्ही त्यांचे सांगितले ते खरच आमच्याही आयुष्याला लागू होतात . BA ला addmission घेतलं म्हणून अनेकदा लोक अतिशय हलक्या भावनेनं देखील पाहतात पण तिथे कुठेतरी मनात एक विश्वास असतो की नाही याची आपल्याकडे बघण्याची दृष्टी आपण कधीतरी नक्की बदलू !
    जे सात बोध मला आकलन झाले ते असे की ,
    १) आयुष्यात आव्हानं स्वीकारावी नाहीतर आपण जिथे आहोत तिथेच राहतो …
    २) परिवर्तनाची खरी व्याख्या मला अस वाटत की यात मला कळली. की जेव्हा आपण परावर्तित होतो आणि सहज आपल्या भूतकाळाकडे तेव्हा आपल्याला हे मजबुतीने वाटल पाहिजे की खरच मी काय होतो आणि आता काय आहे …
    आणि सर जे तुम्ही सांगितलं की आपल्याला जेव्हा कोणी म्हणत की तू बदललीय आपण सहज बोलून जातो की नाही नाही मी कुठे बदलले ! आणि असच बोलून परिवर्तनाच्या त्या सुंदर प्रक्रियेला आम्ही मुकतो …
    पण तुमचा हा ब्लॉग वाचल्यानंतर आजपासून अशाप्रकारे कधीच न बोलता परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आनंद घेणार नक्की !
    ३) खरं परिवर्तन तेच जे पुन्हा आपल्याला त्याच कोशात नेत नाही ! एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण कायम प्रयत्न करतो कोणत्याही गोष्टीत सातत्य ठेवण्याच त्यातही बघायचं झालं तर सकाळी लवकर उठणे ही सवय अमलात आणण्याचा खूप प्रयत्न करतो परीक्षेच्या काळात उठतो सुधा पण परीक्षा संपली की पुन्हा तेच सुरू होतं मग हे कामच नाही ! ते झालेलं परिवर्तन कायमस्वरूपी असेल तर ते खरं परीवर्तन …
    ४) परिवर्तनासाठी किंमत मोजावी लागते कारण परिवर्तन ही यशाकडे नेणारी पायरी आहे आणि यश हे सोप्यात कधीच मिळत नाही त्यासाठी किंमत मोजावी लागते!
    अतिशय मजबूत धैर्य आणि खंबीर मनाच्या साथीने आपल्याला या गोष्टींना समोर जाव लागत.
    ५)अतिशय मनाला भावणारा असा हा पाचवा बोध मला वाटला की परिवर्तन होऊन आपण जेव्हा आपल्या भूतकाळातल्या व्यक्तींना भेटतो तेव्हा आपण वेगळेच असतो …
    ६) जांच्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे पण त्यांना जर आपलं म्हणणं परत नसेल तर आपण त्यांना सांगणं बंद करावं आणि इतकी प्रगती करावी की ज्याप्रमाणे मोगऱ्याचा फुलला सगळ्यांना सांगावं लागत नाही की माझा सुगंध घ्या त्याचा सुगंध जेव्हा आपोआप दरवळत जातो तेव्हा लोक लगेच ओळखतात , ‘अरे हा तर मोगऱ्याचा सुगंध आहे. तसच आपली उंची सुधा आपोआप सगळ काही सांगेल …
    ७) त्या ड्रॅगन फ्लाय ने जर आव्हानं स्वीकारलं नसतं तर कधीच उडून भरारी घेऊ शकल नसतं आणि तसच आपल्याला सुद्धा आव्हानांना सामोरे जायचे आहे…

    🌷शेवटी सारांश मध्ये जे तुम्ही सर सांगितलं ते म्हणजे आपण जांच्या सोबत वावरतो, राहतो, फिरतो ते कसे आहेत हे फार महत्त्वाचं आहे कारण त्याप्रमाणे आपले विचार बदलत जातात अनिंकधी बदलतात ते आपल्याला सुद्धा काळात नाही ज्याप्रमाणे संगतीचे प्रकार आहेत १. कुसंगती २.विसंगती ३.सुसंगती . यानुसार आपण बऱ्याचदा घडत जातो या प्रकारातली विसंगती फार महत्त्वाची नाही परंतु कुसांगती ही कधी आपल्याला दलदलीत अडकावेल सांगता येत नाही
    ढेकानाच्या संगे हिरा जो भंगला |
    कुसंगे नाडला साधू तैसा ||
    किंवा
    विषाने पक्वान्ने गोड कडू केली |
    कुसंगाने केली तैशापरी || तु. म.
    कूसंगती ही कायमच अपायकारक ठरते म्हणूनच मोरोपंत लिहून गेले की
    सुसंगती सदा घडो | सुजन वाक्य कानी पडो ||
    म्हणून आपल्या जीवनात आपण त्यांच्याच सोबत राहील पाहिजे ज्यांच्या सोबत राहिल्याने आपली प्रगती होईल ! 🌷

    सर तुमचा प्रत्येक ब्लॉग हा अप्रतिमच असतो !
    हे मी विशेष संगण्यासरख अस नाही पण खरच मी स्वतःला नशीबवान समजते की तुमची स्टूडेंट आहे आणि तुमचे हे सोपे पण जीवनाचा अर्थ सामावलेले ब्लॉग वाचण्याची संधी मिळते ! 🌈

    अतिशय समजेल अश्या सोप्या भाषेत आणि ते सुद्धा मराठीत इतके सुंदर ब्लॉग हे फार कमी पाहायला मिळतात आणि त्यात हे तुमचे मनाला भावणारे ब्लॉग mind-blowing च असतात! आज तुमच्या या ब्लॉग मला बराच विचार करायला भाग पाडलं आणि याचा खूप आनंद आहे मला THANK YOU SO MUCH SIR 🌈🙏
    असेच वेगवेगळे अवर्णनीय लिहा आणि ते वाचण्याची संधी आम्हला कायम मिळो 🙏🙏

    तुमच्या आणखी पुढील लेखनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ✨🌷🙏

    Reply
    • या ब्लॉग मधून खूप छान learn केलंस. असेच शिकत रहा, ‘सीखोगे तोही आगे बढोगे’, असं जे म्हणतात तो अनुभव लवकरच यायला लागेल.

      Reply
  19. खुप सुंदर सर…!
    तुम्ही लेखाच्या सारांश मध्ये एक विचार मांडला आहे तो मला खुप आवडला😊. की जर आपल्याला प्रगती करायची असेल तर… आपल्यासारख्या व्यक्तीची साथ धरावी लागणार🤝 ..जर आपण चुकीच्या व्यक्तीची साथ धरली तर आपली प्रगती न होता अधोगती होईल… त्यामुळे नेहमी चांगल्या मार्गाची आणि योग्य व्यक्तीची संगत धरावी.. आपण आपल्या जीवनात नक्कीच 💯यशस्वी होतील..! 👌👌 अप्रतिम सर

    Reply
    • काय निवडावे आणि काय नाही याचा निर्णय घेण्याची क्षमता निर्माण कारा.

      Reply
  20. आपल्याला खूप काही करण्याची, इच्छा असते .परंतु लोक काय म्हणतील आपल्याविषयी काय विचार करतील या दृष्टिकोनातून आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. परंतु आपल्याला हेच कळत नाही, लोक त्यांचं काम करत आहे नाव ठेवणे किंवा कौतुक करणे. ते त्यांच्या कामांमध्ये व्यस्त आहे.त्यांचं काम ते अतिशय नम्रपणे पार पाडतात आपल्याला नाव ठेवायची.परंतु आपण कुठेतरी आपलं काम नम्रपणे पार पाडत नाही. हे मला ब्लॉक मधून कळले आहे.म्हणजे जे . करायचे त्या गोष्टीचा आपण विचार करत नाही परंतु लोक काय म्हणतील आपल्याविषयी काय विचार करतील हेच आपण मनात भीती बाळगत असतो. लोक त्यांच्या परीने आपल्याला वर जाण्यापासून अडवायचं काम करत असतात. पुढे जाऊ नको असे सांगत असतात. आणि आपणही त्या विचारांमध्ये भरकटत जात असतो. आणि पुढे जाऊन आपण पण तेच काम करत असतो इतरांना नाव ठेवायचे. त्या लोकांमध्ये आणि आपल्या मध्ये फरक काय राहिला दोघेही सारखे झालो ना. ड्रॅगन फायला असे इतर किडे आणि प्राणी रोखत होते. परंतु तो त्यांच्या विचारांमध्ये गुंफुन गेला नाही. त्याचे ध्येय आहे आणि त्याला जे साध्य करायचे आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच आज तो इतर किड्यान पेक्षा वेगळा झाला . आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करून. आकाशाला गवसणी घ्यायला लागला. मग या ब्लॉगमधून आपल्यालाही हाच विचार करायचा आहे आपले ध्येय आपल्या इच्छा-आकांक्षा डोळ्यासमोर ठेवून. दुसऱ्यांच्या विचारांमध्ये गुरफटून न जाता. उंच शिखर पार करून. आकाशाला गवसणी घ्यायची आहे. आणि आपली लाईफ इतरांपेक्षा वेगळी करायचे आहे.
    सरांनी मांडलेला उच्च विचार. आणि सर्वांना आपले ध्येय प्राप्ती करण्यासाठी . सुंदर कल्पना करून. सर्वांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले आहे. म्हणून सरांच्या या कामाला. माझा शतशा प्रमाण . Thank you so mucha sir .

    Reply
  21. Thought provoking and supercalifragilisticexpialidocious blog Sir
    खरतर तुमच्या या अप्रतिम मार्गदर्शन पर blog पुढे Thank you हा शब्द खूप छोटा आहे आभार मानण्यासाठी…
    कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या कडे तर शब्दच नाहीत. मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते कि मला तुमच्या सारखे गुरु मिळाले आणि तुमचे अप्रतिम लेखन वाचण्याची संधी मिळाली…
    मला वाटते कि आम्हा सर्व विद्यार्थ्यां साठी तुम्ही एक कृष्णच आहात आणि आम्ही तुमचे शिष्य म्हणून अर्जुन एवढेच भाग्यवान आहोत कारण कर्ण एवढा शूरवीर महायोध्दा आणि विद्वान असूनही त्याच्या जीवनात योग्य मार्गदर्शक गुरु नव्हता त्यामुळे त्याचे जीवन भरकटले पण जर त्याला कृष्णा सारखे गुरु, सारथी लाभले असते तर तो जीवनात यशस्वी तर झाला च असता त्याचबरोबर महाभारत काही वेगळच असतं आज!
    म्हणून च आम्ही खूप भाग्यवान समजतो कि आम्हा ला योग्य मार्गदर्शन करणारे, ध्येयाच्या वाटेवरून भरकटू न देणारे ,नवनवीन चांगल्या गोष्टी शिकवणारे, आमच्यात प्रगतीशील विचारधारा निर्माण करणारे असे तुम्ही गुरू म्हणून आम्हाला लाभलात..!
    या blog ने मला तर खूपच प्रभावित केले आहे, यातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत.
    १)जीवनात आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य निर्णय घेऊन (मग त्यासाठी संघर्ष करावा लागला तरीही तो करून, संकटांना तोंड देऊन)
    सातत्याने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

    २)जेव्हा तुम्ही कोणती तरी गोष्ट करायला हाती घेता/एखादे आव्हान स्वीकारता तेव्हा तुम्हाला असे खूप लोक भेटतील जे तुम्हाला तू हे करू नको ते करू नकोस यापेक्षा तू दुसरा option बघ, हे तुला जमणार नाही, This, that ! blah blah blah असे नकारात्मक विचार तुमच्या समोर मांडतात पण त्या वेळी त्यांच्या negative thinking चा विचार करण्या ऐवजी फक्त आणि फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं अस मला वाटते Because
    If you dress well, you show off!
    If you dress simple, you’re poor!
    If you get fat, you’re eat to much!
    If you loose weight, you’re sick!
    At one point realized, No matter what you do in life people will always criticise you ,
    So You don’t have to look good for people,
    You don’t have to be perfect just because other people wanted you to be perfect..!
    Therefore just do what makes you happy and Don’t worry about these fools.

    “कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है केहना”।।
    अगर लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचने लगे तो फिर लोग क्या सोचेंगे?
    म्हणून आपल्या target ,aim वरती focused रहा, कोण काय म्हणेल या विचारात वेळ वाया घालवू नका, (because if you respect the time then time will respect you! Otherwise destroy you.) आणि ध्येयापासून भरकटू नका!
    ३) आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि त्यातून जेवढ शिकता येईल तेवढ शिका ,आत्मसात करा आणि इतरांना ही तुम्ही आत्मसात केलेल्या चांगल्या गोष्टी, ज्ञान द्या कारण ज्ञान दिल्यानेच ते वाढते!
    नवनवीन आव्हाने न कचरता, न घाबरता स्वीकारा, विजय -पराजय ही तर नंतरची गोष्ट आहे आणि तुम्ही जरी हरलात तरी हरकत नाही कारण ते आव्हान तुम्हाला अजून प्रयन्त करायला उमेद तर देईलच पण त्याचबरोबर अनुभव ही दूईल!
    Thank you so much sir for this Inspiring blog..!

    Reply
  22. Sir प्रचंड प्रेरणादायी, उत्साह वाढवणारा, आंतरिक मनाला उर्जा देणारा,जीवनाला एका विशिष्ट angle नी पाहायला लावणारा हा blog आम्हा विद्यार्थीना वाचायला भेटन ही प्रचंड अभिमानाची आणि नशीबवान असल्याची जाणीव करून देणारा bolg आहे …..

    सामान्य व्यक्ती दररोज च्या आयुष्यात प्रचंड अश्या चढ- उतरांना सामोरं जात असते….. अश्या वेळी ते येणारे चढ उतार इतके ग्रासून जातात की त्या चढ उताराचा सामना करण्याची ताकत नाहीशी होते आणि सामान्य माणूस कुठेतरी यशस्वी होण्याच्या प्रवासाला मुकलेला पाहायला मिळतो….. एकंदरीत अयशस्वी झालेला पहायला मिळतो…… अशा वेळी खचलेल्या मनात उर्जा पेरण खूप आवश्यक असत… एकदा का ही उर्जा पेरली गेली तर त्या उर्जेतून एकदा आविष्कार झाल्या शिवाय राहत नाही….
    ब्लॉग च्या सुरुवतीलाच प्रचंड साधक आणि अनुरूप अशी कथा वाचायला भेटली जी संपूर्ण blog वाचेपर्यंत महत्त्वाचा बिंदू ठरेल…..
    सामान्यांच आयुष्य आर्थातच त्या पाण्याखालील जीवाप्रमाने झालेलं असत ज्यांच्यामध्ये वरच्या प्रवाहामध्ये येण्याची इच्छा कधी निर्माणच होत नाही किंवा ती निर्माण केली जात नाही किंवा आजूबाजूचा समाज ती निर्माण करण्याची संधीच देत नाही आणि ते आयुष्य पाण्याखालीच कुंठीतच राहत….. त्यातल्या एका जीवांनी जरी परिवर्तनाची वाट स्वीकारली तरी त्याच्या पाठीमागचा प्रत्येक घटक परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये आपोआप येतो….
    आर्थात ही परिवर्तनवादी चळवळ निर्माण करण्याच काम या ब्लॉग मधून होतंय….. अर्थात एक रहस्य उगडण्यासारखं आहे…..
    पहिली बोध म्हणजे एकदा प्रबळ परिवर्तनशील विचार ,इच्छाशक्ती, मानसप्रतिमा ,स्व विश्वास एक अद्भुत अस विश्व निर्माण करत. एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छाशक्ती सुध्दा एक मोठी गोष्ट मिळवून देत…… अर्थात फक्त ती इच्छा शक्ती निर्माण होन गरजेचं असत…..
    दिलेले प्रत्येक ७ मंत्र हे एखाद्या तहानेने व्याकुळ झालेल्या अमृत देण्यासारखे आहेत…..
    यातला पहिला मंत्र हे सांगतो की …..
    १) एक विचार, एक हिंमत,एक आवाहन,एक इच्छाशक्ती संपुर्ण जीवन परावर्तित करते…..change in yourself is the most important thing which we learnt form this first mantra
    २) भूतकाळ काही का असेना परंतु झालेलं परिवर्तन आपल्याला आपला भूतकाळ इतरांचा भासून देईल…..हे परिवर्तनाचं कार्य मला फार महत्तवाचं वाटत……
    ३) Third is that transformation happened in you never allow to look back at your past …..that’s the most a like point
    ४)fourth is sometimes you have to be take some decisions against the closest of you…..that’s the cost you have to pay for that upcoming transformation which changen your life for lifetime
    ५)Fifth we learnt that don’t be or believe in public life ….. what people’s thinken About you and what they are saying About your paths…..just believe in what you want and what’s your life want …..
    ६)sixth is when your life change you are going to inspire your know societal people’s which never allowed to you to change path…… other’s going to follow your path when you reach at your point all this gonna happen automatically….
    ७) Seventh is you have taken good decisions,right path, accept challenges which lies ahead, sacrifices for this challenges, believe in yourself,make goals ……and that going to put your life at beautiful point
    😊😊
    Every single decision you take at your side will change your definitely…..
    And finally you have be with right minded people who will going to push you at your toughfest , at bad time…..

    हे सगळे विचार एक आदर्श माणूस घडवतील यात शंकाच नाही…… आयुष्यरूपी नौका भरकटली ,वादळामध्ये कळालं नाही की कुठे जायचं तर एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतील….. आणि समाजामध्ये वैचारिक परिवर्तन निर्माण करतील अर्थात ते परिवर्तन घडावं…. इतकाच एक विद्यार्थी म्हणून आशावाद…..
    बाकी blog प्रचंड सुंदर आहे हे सांगण्यासाठी शब्द अपरेमधून ☺

    Reply
  23. आयुष्यात जर काही करायचे असेल तर धाडस करावे लागते.जसे तो किडां तलावाच्या बाहेर आला तसे त्याला नवे रूप व नवे जग गवसले . ह्या ब्लॉग मध्यून मला हे कळले की मार्ग कितीही कठीण असला तरी सुरुवात करा .अथक परिश्रमाने तुम्हाला यश प्राप्ती नक्कीच होईल.
    Thank you so much Sir 😊

    Reply
  24. सर वाक्यरचना अगदी मनाला भिडणारी आहे त्यात असलेले वाक्य अगदी आपल्या जीवनातले आहे असे वाटते( खरे परिवर्तन ते आहे, जे तुमची ईच्छा असूनही त्या भुतकाळातील कोशात तुम्हाला जाऊ देणार नाही, जिथून तुम्ही अथक प्रयास करून बाहेर पडला होता.) हे वाक्य मला आवडलेला आहे आपण आपल्या जीवनाचा प्रवास कसा करावा याचे अगदी कमी शब्दात मार्गदर्शन आजच्या ब्लॉगमधून कळले आहे आपण आपल्या जीवनात कसे परिवर्तन करायचे याचे सात मूलमंत्र आज कळाले धन्यवाद सर

    Reply
  25. खुपच सुंदर सर …

    Motivational story …. तुमचे असेच मार्गदर्शन मिळाले तर आम्हीही एके दिवशी dragon fly सारखी उंच भरारी घेऊ …..

    Reply
    • अशीच शिकण्याची हिंमत ठेवली तर नक्की एक दिवस dragon fly सारखी उंच भरारी घेणार यात काहीही शंका नाही. keep learning.

      Reply
  26. Thank u sir for this blog, js ya blog madhe jo kida varti yaych try kela,ts me pn try karat ahee sir, aani ya blog madhe tumhi bolat ki tumhi change zale,tr lok boltat ki adhi sarkhi tu nahi rahili ,khup change zali ,He ase v4 dokyat yetat sir mazya pn yetat ki ase lok boltil tr apn ky karych,aani tumchya ya blog mule mla samjhl ki ya sarv que…la apan samore ks jaych,really sir mla pn dragon fly vhychay.😊😊

    Reply
  27. Inspirational story sir
    खूप साऱ्या गोष्टी ही story वाचून समजण्यात आल्या. निर्णय घेता आला पाहिजेल आणि घेतलेला निर्णय योग्य होता हे पण दाखवून देण्यात आला पाहिजेल हे ही story वाचून लक्षात येते
    Amezing story sir💯

    Reply
    • जीवनात मोठं बनण्यासाठीसुध्दा निर्णयच घ्यावा लागतो. असेच शिकत रहा व मोठे व्हा.

      Reply
  28. जिवन परिवर्तनाची गोष्ट किती छान आहे! एक सामान्य किडा ड्रॅगन fly: हवेत swachandi पणे उडणारा, ज्याचा कडे बघितल्यावर आपल्या मनाला देखील आनंद होतो परंतु त्याचा थक्क करणारा प्रवास सामान्य किडा ते हवेत उडणारा बंधन नसलेला chatur याचे रोमांचकारी वर्णन आपण खूप छान केले . मानवी जीवनाचे रहस्य देखील याच कथेचा माध्यमातुन आपण खूप छान पद्धतीने वर्णित केले .तीव्र icchashakti, उज्वल भविष्याची कास, swatacha निर्णययावर ठेवता येणारा विश्वास आणि सुंदर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा छान विकसित होऊ शकतो हे आपण खूप उत्तमरीत्या सांगितले! Thank you sir !

    Reply
  29. “उडत्या पक्षाला परतीची सीमा नसावी! ” याची झलक इतक्या साध्या, सरळ शब्दांत व्यक्त केली आहे कि शाश्वत परिस्थिती आणि कल्पनेतलं आयुष्य यांचा प्रवास ध्येय नि “उड़ जा अब तेरी बारी है, ” अशी जिद्द मनात जागली कि तो प्रवास तितका अवघड नसतो समजतयं. मनपूर्वक आभार सर.

    Reply
  30. [1/27, 08:22] bawajayashri: जीवनात संपूर्ण परिवर्तन कसे करावे….
    जीवनात परिवर्तन तर सर्वांनाच करावेसे वाटते , पण त्यासाठी होणारे प्रयत्न कुठेतरी कमी पडतात.
    * या story मधील dragon fly हि आपलीच story वाटतें
    * प्रयत्न केले नाहीत तर किड्यांचे जीवन जगावे लागेल हे नक्की…
    * परिवर्तनासाठी खुप मोठी किंमत मोजावी लागते.. आपली लोकं कधीही तयार होत नाही…पण थोडी हिंमत दाखवली की त्याचे फायदे जाणवायला लागतात.
    * प्रभावी लोकांच्या संपर्कात रहावे याचा तर चांगलाच अनुभव आहे… तुम्ही personality development .. चे Class घेत असताना… आम्हाला जाणवायला ‌लागला…

    Reply
  31. मला हा ब्लॉग वाचून एक नवीन ऊर्जा मिळाली.मला असे वाटले की हा एक छोटासा किडा जर ही सात टप्पे पार करु शकतो,मग आपण तर करुच शकतो.
    आपल्यात परिवर्तन घडवायचे असेल तर आपल्यात एक गोष्ट असायलाच पाहिजे ती म्हणजे जिद्द.आपण कधीही आपल्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे.आपल्याला असे खुप वेळा दिसते की;लोक आपल्या परिस्थितीला दोष देत असतात पण ती बदलण्यासाठी प्रयत्न करत नाही.तसच जर तो किडा प्रयत्न करुन पाण्यावर आला नसता तर त्याला dragon fly च आयुष्य अनुभवता आल नसत.आपल्यात बद्ल घडवायचा असेल तर आपल्याकडे तीव्र इच्छाशक्ती असायला हवी.परिवर्तन घडवायचे असेल तर आपल्याला हे कळले पाहिजे की कोणाची संगत धरायची व कोणाची नाही.
    जर आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाच म्हणजे एक धेय्य ठेवलं पाहिजे.
    Sir,तुम्ही सांगितलेले हे सात टप्पे जर आम्ही पार करत गेलो तर आमच्यात नक्कीच एक अविश्वस्निय परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.
    Thank you,Sir!

    Reply
  32. सर, या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आमचा एक टप्पा पूर्ण झाला जो की, जीवनात खूप काही मोठं करायचं असेल तर एखाद्या प्रोग्रेसिव्ह समूहाला (Community) जॉईन करावे लागेल तसेच एखाद्या मिशन चा भाग बनावे लागेल.त्यासाठी मी लाइफ शोध फॅमिली याचा भाग बनलेले आहे. या ब्लॉक मधून आपल्याला पडलेले प्रश्न म्हणजे आपण यशस्वी का होत नाही? किंवा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला का मिळत नाही ? याचे उत्तर मिळाले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला परिवर्तन करायलाच पाहिजे. तुम्ही जे उदाहरण दिलं जसं एका किड्याने पाण्यातून बाहेर पडून उडण्याचा निर्णय घेतला ,आणि तो सुंदर ड्रॅगनफ्लाय बनला, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा हळूहळू परिवर्तन करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करू. यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे सात टप्पे सांगितले आहेत ते आमच्या जीवनात खूप महत्त्वाचे ठरतील. आणि सर, तुमच्या प्रत्येक ब्लॉग वाचुन आम्ही प्रभावित होतो आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद तयार होते.
    Thank you Sir 😊.

    Reply
    • जीवनात कोणीही ड्रॅगन फ्लाय सारखं उडू शकतो, परंतु तसं उडण्यासाठी ड्रॅगन फ्लायला जी किंमत मोजावी लागली, ती किंमत मोजण्यासाठी कोणी तयार नसतात, एवढेच अंतर असते यश आणि आपल्यामध्ये.
      ती किंमत मोजायला तुम्ही तयार असाल तर यश तुम्हाला शोधत तुमच्या जवळ येत असते, कारण असे म्हणतात की, यशाला चांगल्या ठिकाणी रहायला आवडत असते. (Success wants to stay in a good place.)

      Reply
  33. अप्रतिम सर स्वप्न पाहणाऱ्या पेक्षा ते स्वप्न साकार करण्यासाठी धरपड करणारा माणूस आयुष्यात यशस्वी होतो . अगदी सोप्या पद्धतीने समजावलं . प्रत्येक वेक्तीच्या आयुष्या मध्ये एक संधी येत असते , पण तो वेक्ती त्या संधी चे कित्पत सोने करतो हे त्या वेक्तीवर अवलंबून असते. काही वेक्ती लोकांनी तयार करण्यात आलेल्या मानसिक बेडीत अडकून पडतात , तर काही वेक्ती ती बेडी तोडून आपली वेगळी ओळख निर्माण करतात 🙏धन्यवाद सर 🙏

    Reply
  34. सर हा तुमचा bolg खूपच छान आहे. विचारतील परिवर्तन मुळे काय बदल होऊ शकतो याचं प्रेरणादयी छान मार्गदर्शन लाभले धन्यवाद सर

    Reply
  35. very good type of story sir….it brought big change in me….I am and I will definitely bring change in my life sir..and thanx for these types of blog👏

    Reply
  36. “परिवर्तन हेच जगात permanent आहे.” – डॉ०बाबासाहेब आंबेडकर.

    आपण आजच्या पेक्ष्या अजून जास्त उंची गाठावी असं जागात प्रत्येकालाच वाटतं या जगात लोकांचे स्वप्नहि खूप मोठे मोठे असतात. पण मग आपण बघतो कि जीवनात प्रत्येक जण यशस्वी का होत नाही…का म्हणलं जात कि फक्त 1 ते 2 च टक्के लोक यशस्वी आहेत. याचं उत्तर आज मला या लेखाच्या माध्यमातुन सापडलं आहे. जीवनात फक्त स्वप्न रंगून उपयोग नाही तर त्यासाठी पहिले पाऊल टाकावे लागते . निर्णय घ्यावा लागतो. जेव्हढा मजबूत निर्णय असेल तेव्हढे यश हे मोठे असणार आहे.
    जीवनात यशस्वी होण्यासाठी पहिली पायरी आहे कि मनात स्वप्न ठेवा कि मला या – या ठिकाणी पोहोचायचं आहे.
    दुसरी पायरी म्हणजे निर्णय. आता बघितलेले स्वप्न सत्यात पण उतरावयच आहे ना!
    तिसरी गोष्ट म्हणजे आता प्रयत्न सुरु करायला पाहिजे कारण म्हंटल जात कि “प्रयत्नार्थी परमेश्वर”
    जर आपण प्रयत्नच नाही करणार तर निर्णय घेऊन उपयोग तरी काय…जस ड्रॅगन फ्लाय तो जेव्हा किडा होता तेव्हा त्याने निर्णय घेतला मग प्रयत्न केला त्यालातर बाकीचे किडे समजावत बसले होते कि जाऊ नको , खूप अवघड आहे .
    मला हीही गोष्ट शिकायला भेटली कि जर स्वप्न आपले आहे तर आपण लोकांच का ऐकायचं “ऐकावे जणांचे करावे मनाचे” असं म्हंटल जात. अगदी तसचं जीवनात आपण केले पाहिजे. कारण जर जीवनात पूढे जायचे आहे तर धाडस हे करावाच लागेल.
    जर छत्रपती शिवाजी महाराजां मध्यें धाडस नसतं तर स्वराज्य निर्माण झालच नसतं.
    म्हणून जीवनात निर्णय घेतल्यावर त्या रस्त्यावर चालण्याच धाडस असलं पाहिजे, नसेल तर तर ते निर्माण करावा लागेल. आज आपण काय आहोत याचा विचार न् करता आपण आपले ध्येय प्राप्त केल्यानंतर काय असू याचाच विचार मनात असला पाहिजे . खरं म्हणजे हा रस्ता सोपा नसनारे. रस्त्यात अडथळे असणार आहे , काटे असणार आहे पण मग या वेळी मनात एक तीव्र इच्छाशक्ति ची गरज असते. मनात इच्छा शक्ती असेल, स्वतःवर विश्वास असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही.
    जीवनात यशस्वी आपल्याला व्हायचं आहे तर त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावा लागणार आहे कोनादुसर्यच्या जबाबदारीवर् आपण यशस्वी नाही होऊ शकत.
    हा ब्लॉग वाचल्यावर् मला कळलं कि खरं परिवर्तन काय असत, खरं परिवर्तन ते असतं जे आपण मागे वळून पाहू तर ते जीवन आपले नव्ह्तेच त्यावर आपला विश्वासच बसणार नाही एव्हढे जीवनात परिवर्तन होऊ शकते .
    मित्रांनो विचार करा ना कि आपला तरी ह्या गोष्टी वर विश्वास बसतो का कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी चहा विकला असेल! म्हणजे बघा किती परिवर्तन झालं त्यांच्या जीवनात आणि आता त्यांच्या जीवनात अशे परिवर्तन झाले आहे कि त्यांना वाटले तरी ते आता चहा विकू नाही शकत. ते तस जीवनात इच्छा असेल तरी आता जगू शकत नाही. यालाच खरं परिवर्तन म्हणतात.
    ह्या लेखातुन मला खऱ्या परिवर्तनाचा अर्थ कळला. आपल्या जीवनात काहीतरी वेगळं करायचं आहे तर काहीतरी वेगळ्या निर्णयापासुन सुरुवात करावा लागेल. परिवर्तन काय सोपी गोष्ट आहे का? त्यासाठी काहीतरी त्याग तर करावाच लागणार आहे . जर मला यशस्वी व्हायचं आहे तर मी एकदम मजेत राहून,निवांत राहून,हसून-खेलुन् , स्वादिष्ट जेवण करून यशस्वी होईल का? मलाही माझं घर सोडावं लागेल . इच्छा नसूनही जवळच्या माणसांपासुन् दूर जावे लागेल. हीच तर मजा आहे खऱ्या परिवर्तनाची.
    तो ड्रगन फ्लाय मध्ये असे परिवर्तन झाले आहे कि तो त्या किड्यासोबत कधी पुन्हा गेला तरी त्याला ते ओळखणार नाही किव्हा त्यांनाच वाटेल कि आपली याच्या सोबत असण्याची योग्यता नाही . तर खरं परिवर्तन हे असतं. आणि अजून एक गोष्ट जी मला ह्या ब्लॉग मधून शिकायला भेटली आणि मला ती मनाला खूप भावली ती म्हणजे आयुष्यात आपल्यात पुढाकार घेण्याचे कौशल्य (leadership quality) असली पाहिजे, नसेल तर त्या कौशल्याला विकसित केले पाहिजे कारण हे कौशल्य जीवनात खूप महत्वाचे आहे कारण गांधीजीनी जर स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार घेतला नसता तर कदचीत त्यांचा इतिहास आपण वाचला नसता,ते या देशाला माहित झाले नसते.

    स्वप्न – निर्णय – जबाबदारी – कृती – आत्मविश्वास – इच्छाशक्ति – लोकांचे निरर्थक गोष्टी नाही ऐकणे – धाडस – पुढाकार.

    अश्या प्रकारच्या अमूल्य गोष्टी आज शिकायला भेटल्या याबद्दल खूप खूप आभारी आहे सर.
    धन्यवाद !!!

    Reply
    • यालाच deep learning म्हणतात, या ब्लॉग मधील सर्व सार काढून मांडल्याबद्दल तुमचे जेव्हडे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. असेच शिकत रहा व जीवनात नेहमी परिवर्तनाच्या दिशेने मार्गक्रमण करा.

      Reply
  37. ● नेहमी प्रयत्नशील रहावे.. प्रयत्न करण्याआधीच त्याच्या परिणामांचा विचार करून माघार घेऊ नये. कारण, ज्यावेळी आपण प्रयत्न करतो त्यावेळी आपण ‘जिंकतो किंवा शिकतो. जिंकलो नाही म्हणून तो प्रयत्न वाया जाता नाही म्हणून प्रयत्न करत रहावे.
    ●ज्यावेळी आपण कोणती चांगली गोष्ट करायला पाऊल पुढे टाकतो त्यावेळी आपल्याला पाठींबा देणारे हात कमी पण मागे खेचणारे हात जास्त असतात व अनेक वेळा आपण या गोष्टी नी खचून जाऊन उचललेले पाऊल परत मागे घेतो आणि आयुष्यात पुढे मिळणाऱ्या असंख्य सुवर्णसंधी व आपल्यातील परिवर्तन गमवून तसेच राहतो. त्यामुळे नकारात्मक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा सकारात्मकतेकडे जास्त लक्ष दयावे
    ● ‘बदल’ हा मानवी जीवनातील अटळ नियम आहे तसेच मानवाचा गुणधर्म आहे. मग बदलायचेच आहे तर तो बदल सकारात्मक, चांगला & योग्य असणे खूप महत्वाचे आहे. (कारण बदलामुळे किडयाचा dragonfly होऊ शकतो , अळीचे फुलपाखरू होऊ शकते तर आपणही नक्कीच योग्य व्यक्ति बनु शकतो व माणूस असून आपण बदलणार नसू तर कीडे, जीव-जंतू आपल्यापेक्षा कितीतरी चांगले)
    ●आव्हाने स्विकारत चांगल्या गोष्टी करून आपला एक आदर्श निर्माण केला पाहिजे व आपल्या कृतीतून इतरांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला पाहिजे
    ● इच्छाशक्ती असणे खूप महत्त्वाचे असते कारण मनावर घेतले तर आपण कोणतेही काम सहज शक्य करत असतो व आपल्यात परिवर्तन आणू शकतो
    ●आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे होऊन आपल्यात सकारात्मा बदल झाल्यानंतरही योग्य लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे जेणेकरून आपण आपल्यामध्ये प्रगती & चांगले परिवर्तन साधु व इच्छा असूनही आपल्या भूतकाळात जाऊ शकणार नाही ..
    या सगळ्या अमूल्य गोष्टी मला “जीवनात संपूर्ण परिवर्तन कसे करावे” या आपल्या blog मधून समजल्या … आणि आपल्या lifeshodh family च्या मार्फत मी ही परिवर्तनाची सुंदर प्रक्रिया पुर्ण करत आहे याचा आनंद आहे ..
    #ThankYouForYourGuidanceSir

    Reply
  38. हा ब्लॉग माझ्यासाठी फक्त वाचण्याच साधन नाहीये. तर अक्षरशः माझ्या जीवनासाठी हा एक मोठा टर्निंग पॉईंट आहे असं मला वाटते. कारण वर दिलेले जे सात टक्के आहे त्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यावर माझ्या जीवनातल्या गाडीच इंधन कमी कमी होत होतं परंतु हा ब्लॉग वाचून त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि तिची एनर्जी मला अति जोराने पुढे push करेल असा विश्वास वाटतोय. या जगातला प्रत्येक माणूस , अगदी भरपूर पैसा असणारे जीवन, आनंददायी जीवन, खूप मोठं नावलौकीक असलेलं जीवन अशा प्रकार चे जीवन जगण्याची स्वप्न प्रत्येक माणूस बघत असतो. परंतु ही स्वप्ने आपण फक्त स्वप्नेच ठेवतो त्यामध्ये त्यांचं रूपांतर कृतीत करण्याचा आपला प्रयत्न हा शून्य असतो त्यामुळे ते स्वप्न फक्त कल्पनेच्या जगा मध्येच वावरत असतं. त्याबद्दलच आव्हान स्वीकारण्याची आपली तयारी नसते त्यामुळे आपल्या स्वप्नपूर्तीचा मार्ग कुठेतरी मुकलेला असतो.
    आपले जर इतरांपेक्षा वेगळी Identity निर्माण करायची झाली तर कार्य सुद्धा इतरांपेक्षा वेगळं करणार हे महत्वाचा आहे. त्यामध्ये ड्रॅगन फ्लाय सारखं आव्हान स्वीकारण्याची आपली तयारी असणं अत्यंत गरजेचे आहे. आव्हानामुळे पुढचा मार्ग कोणता असेल या गोष्टीची स्पष्टता व्हायला लागते आणि त्यातून यशाच्या मार्गाने नक्कीच ध्येयपूर्तीची वाटचाल होण्यास मदत होते. एक वेळ जर आपण आव्हान स्वीकारून त्या अहवालानुसार कार्य करायला लागलो तर नक्कीच आपल्या मागचा इतिहासाचा आपला आहे असं वाटणारच नाही. एवढे बदल त्यामध्ये दिसून येतील हा अनुभव आहे.
    एखादी गोष्ट पूर्ण केल्यानंतर त्यानंतरचा जो आनंद आहे तो एक मनाला झोंबणारा असतो . ज्या गोष्टीची आपण कल्पनाही केलेली नसते त्या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनतात एवढी ताकद फक्त आपल्यामध्ये असलेल्या इच्छाशक्ती आणि आपण स्वीकारलेल्या आव्हानावर अवलंबून असते. ज्याप्रमाणे ड्रॅगन फ्लाय ला पाण्याच्या वर आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला मिळाला मग त्यामध्ये निरभ्र आकाश असो किंवा सुगंधी व नाजूक कमळाचे फुल असोत किंवा पाण्यातील वेगवेगळे वनस्पती असोत त्यांचा आनंद एक मनाला अल्लाहदायक ठरणारा होता तशाच प्रकारचा आनंद आपल्या सुद्धा जीवनामध्ये आव्हानाला सामोरे गेल्यानंतर मिळत असते.
    आपण एखाद्या गोष्टीचं आव्हान स्वीकारायला खचतो त्यामुळे पुढे त्या गोष्टीतून मिळणारा आनंद त्यामधून मिळणारं सुख याची आपल्याला काडीचीही कल्पना नसते. आणि एकदा जर माणूस चांगल्या मार्गाने निघालोय तर त्या मार्गामध्ये त्याला प्रवासी सुद्धा चांगलेच भेटतात आणि त्यांच्या सहकार्याने ,संगतीने, वेगवेगळ्या गोष्टी आव्हान स्वीकारण्याची शक्ती आपल्यामध्ये डायरेक्टली येत असते आणि त्याच शक्तीचा वापर करून जर कार्य केलं तर आपल्या मागचा इतिहास हा आपलाच आहे यावर विश्वासच बसणार नाही.
    या ब्लॉग मधून इतरांपेक्षा वेगळा केल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीची गोड आणि रसाळ फळे मिळतात याची अगदी सखोल शिकवण मिळालेली आहे त्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद.

    Reply
  39. खूपच सुंदर मार्गदर्शन आहे सर अतिशय मनाला भिडणारे आनंददायी जीवन, खूप मोठं नावलौकीक असलेलं जीवन अशा प्रकार चे जीवन जगण्याची स्वप्न प्रत्येक माणूस बघत असतो. परंतु ही स्वप्ने आपण फक्त स्वप्नेच ठेवतो त्यामध्ये त्यांचं रूपांतर कृतीत करण्याचा आपला प्रयत्न हा शून्य असतो त्यामुळे ते स्वप्न फक्त कल्पनेच्या जगा मध्येच वावरत असतं. त्याबद्दलच आव्हान स्वीकारण्याची आपली तयारी नसते त्यामुळे आपल्या स्वप्नपूर्तीचा मार्ग कुठेतरी मुकलेला असतो.
    आपले जर इतरांपेक्षा वेगळी Identity निर्माण करायची झाली तर कार्य सुद्धा इतरांपेक्षा वेगळं करणार हे महत्वाचा आहे. त्यामध्ये ड्रॅगन फ्लाय सारखं आव्हान स्वीकारण्याची आपली तयारी असणं अत्यंत गरजेचे आहे. आव्हानामुळे पुढचा मार्ग कोणता असेल या गोष्टीची स्पष्टता व्हायला लागते आणि त्यातून यशाच्या मार्गाने नक्कीच ध्येयपूर्तीची वाटचाल होण्यास मदत होते. एक वेळ जर आपण आव्हान स्वीकारून त्या अहवालानुसार कार्य करायला लागलो तर नक्कीच आपल्या मागचा इतिहासाचा आपला आहे असं वाटणारच नाही. एवढे बदल त्यामध्ये दिसून येतील हा अनुभव आहे.
    एखादी गोष्ट पूर्ण केल्यानंतर त्यानंतरचा जो आनंद आहे तो एक मनाला झोंबणारा असतो . ज्या गोष्टीची आपण कल्पनाही केलेली नसते त्या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनतात एवढी ताकद फक्त आपल्यामध्ये असलेल्या इच्छाशक्ती आणि आपण स्वीकारलेल्या आव्हानावर अवलंबून असते. ज्याप्रमाणे ड्रॅगन फ्लाय ला पाण्याच्या वर आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला मिळाला मग त्यामध्ये निरभ्र आकाश असो किंवा सुगंधी व नाजूक कमळाचे फुल असोत किंवा पाण्यातील वेगवेगळे वनस्पती असोत त्यांचा आनंद एक मनाला अल्लाहदायक ठरणारा होता तशाच प्रकारचा आनंद आपल्या सुद्धा जीवनामध्ये आव्हानाला सामोरे गेल्यानंतर मिळत असते.
    आपण एखाद्या गोष्टीचं आव्हान स्वीकारायला खचतो त्यामुळे पुढे त्या गोष्टीतून मिळणारा आनंद त्यामधून मिळणारं सुख याची आपल्याला काडीचीही कल्पना नसते. आणि एकदा जर माणूस चांगल्या मार्गाने निघालोय तर त्या मार्गामध्ये त्याला प्रवासी सुद्धा चांगलेच भेटतात आणि त्यांच्या सहकार्याने ,संगतीने, वेगवेगळ्या गोष्टी आव्हान स्वीकारण्याची शक्ती आपल्यामध्ये डायरेक्टली येत असते आणि त्याच शक्तीचा वापर करून जर कार्य केलं तर आपल्या मागचा इतिहास हा आपलाच आहे यावर विश्वासच बसणार नाही.५) खरे परिवर्तन ते आहे जे की, जर मी परत त्या किड्यांच्या वस्तीत गेलो, तर ते आपले सहकारी हे कधीच मानायला तयार होणार नाहीत की, मी त्यांच्यापैकीच एक आहे जो त्यांच्यामधूनच बाहेर पडला आहे.
    (If I went back to that insect habitat, they would never be willing to let their people believe that I was one of them.) हा प्रश्न अगदी मनावर प्रभाव टाकतो धन्यवाद सर. ☺️

    Reply
  40. अप्रतिम ब्लॉग आहे. यामधील लिखाण खरंच मनाला हळहळ व्यक्त करायला लावणार आहे. या ब्लॉग मध्ये जे 7 टप्पे दिलेले आहे त्या सात कप्प्यांमध्ये खरंतर माणसाचं अख जीवन मांडलेला आहे. आपण सध्या जे कोणच जीवन जगतोय त्यामध्ये बदल व्हावा असे प्रत्येकाची अतोनात इच्छा असते आणि ती असायलाही पाहिजे. कारण माणसाच्या विकासाची व्याख्या सांगत असताना अशी सांगितली जाते की माणसांमध्ये परिस्थितीनुसार होणारा चांगला बदल म्हणजे विकास होय . मग हे परिवर्तन कसे करायचे? यासाठी कुठला फॉर्मूला वापरायचा? जिवंन भन्नाट जगायचा आहे. आणि त्यासाठी बदल ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मग बदल होण्यासाठी आपल्या जीवनाची गाडी थांबते कुठे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सदरील ब्लॉग मध्ये अतिशय सहज आणि सोप्या भाषाशैली मध्ये मिळून जातील.
    ज्याप्रमाणे ड्रॅगन फ्लाय हा पूर्वी किड्याचा जीवन जगत होता त्याचप्रमाणे आपलं सुद्धा जीवन असू शकते परंतु त्या किड्याच्या जीवनापासून ड्रॅगन फ्लायने त्यामध्ये बदल करण्यासाठी केलेली मेहनत, हिम्मत, इच्छा ही त्याच्या यशस्वी जीवनाचा पायाच म्हणावा लागेल. आपलं सुद्धा असच असते आपल्याही मनात खूप काही भन्नाट कल्पना असतात आयुष्यामध्ये काहीतरी करून मोठ व्हायचं असतं उंच उंच भरारी घ्यायचं असतं परंतु आपल्या काही अर्थहीन कारणामुळे आपल्या इच्छाशक्तीचा तिथेच कोंडमारा होतो आणि ती त्याच ठिकाणी नष्ट होऊन जाते .
    कुठलेही काम करत असताना आपल्याकडे पहिल्यांदा एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे हे मला जमेल का? माझ्या आधी असं कोणीच नाही केलं? हे करण्यासाठी माझ्याकडे अमुक अमुक साधनांची कमतरता आहे. अशा प्रश्ना मुळे आपण त्या किड्या सारखं ड्रॅगन फ्लाय न होता किडाच राहतो. होईल तसं होईल करून तर बघू अशी भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे ज्यावेळी अशी भावना निर्माण होऊन ती प्रत्यक्ष कृती मध्ये उतरेल त्यावेळी यश नक्की आपल्या पायाशी लोळण घेईल. ज्यावेळी आपण असं काहीतरी वेगळं करून वर आलेला असेल त्यावेळी खऱ्या अर्थाने मनाप्रमाणे जगण्याचं स्वतंत्र आपल्याला मिळेल असं मानता येईल.
    एकदा का आपल्या या पूर्वीच्या जीवनातून आपण पुढे आलो की आपल्याला यश हात धरून त्याच्याकडे खेचून घेऊन जात . ज्यावेळी असं घडेल त्यावेळी आणि आपला मागचा इतिहास आपण काही वर्षांपूर्वी काय होतो हे आपला इतिहास नसून आपला बॅकग्राऊंड नसून इतर कोणाचा तरी आहे असा आपल्याला नक्की वाटेल.
    जीवनामध्ये यशस्वी झाल्यानंतर आपल्या यशाचे रहस्य आपण ज्या ठिकाणी वरून आलो आहोत त्या ठिकाणच्या लोकांना सांगून त्या रहस्याच्या मदतीने त्यांना सुद्धा वर आणण्याची आपली प्रचंड इच्छा असते मात्र ज्यावेळी आपण Sucees होतो त्या यावेळी आपले लोकं आपल्याला त्यांच्यापेक्षा वेगळे समजतात आणि आपण आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु तू आपण पण ज्यावेळी उंच उंच भरारी घेत जातो त्यावेळी आपल्याला लोकांपर्यंत जाण्याची वेळ येत नाही तर लोकच आपली प्रेरणा घेऊन आपल्याकडे येत असतात.
    असे प्रेरणादायी, मौल्यवान विचार या ब्लॉग मधून शिकायला मिळाले. असं परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला एखाद्या कम्युनिटी ची नितांत गरज असते आणि मला वाटते माझ्या परिवर्तनासाठी लाइफ शोध ही कम्युनिटी माझ्यासाठी खूपच चांगली आहे आणि मी मी माझं भाग्य समजतो की मला या कम्युनिटी चा एक मेंबर होता आलं. या कम्युनिटी तून जास्तीत जास्त शिकण्याचा मी प्रयत्न करीत राहीन. आणि असा माईंड ब्लोईंग ब्लॉग आम्हाला वाचण्यासाठी आमच्या परिवर्तनासाठी तुम्ही तयार केला त्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद.

    Reply
  41. आपल्या सर्वांचीच अवस्था त्या पाण्यातल्या किड्याप्रमाणे असते काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असते पण comfort zone सोडायची हिंमत नसते. आपण एकटे थोडीच आहोत आपल्या सारखेच बाकीचे सगळे आहेत अशी भावना बाळगतो. स्वतःच्या उन्नती साठी प्रयत्न न करता दुसऱ्याकडून अपेक्षा करतो आणि यामुळे आपण साधारण आणि कंटाळावान आयुष्य जगतो. पण जेव्हा आपण प्रयत्न करतो आपल्या comfort zone मधून बाहेर येतो निश्चितच आपल्या जवळच्या व्यक्तींनपासून दुरावतो पण हाच संघर्ष अनेकांनसाठी प्रेरणादायी ठरतो. आपल्यासाठी नव्या व भव्य विश्वाची दारे उघडतो.
    जसा त्या किड्यांने प्रयत्न केला आणि त्या तलावातून बाहेर येऊन एका सुंदर विश्वाची अनुभूती घेतली त्यासाठी त्याला त्याच्या जवळच्या लोकांपासून दूर जावे लागले , संघर्ष करावा लागला आणि या सगळ्या चे परिणाम म्हणून त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन झाले.
    आपलेही आयुष्य असेच आहे. जर आपल्याला मनासारखे आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर संघर्ष करावा लागेल . जवळच्या व्यक्तींनपासून‌ दूर जावे लागेल , दुसऱ्यांन कडून अपेक्षा न ठेवता स्वतः प्रयत्न केले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी न घाबरता केल्या तरच आपण यशस्वी होऊ.
    Thank you so much Sir for inspiring blog 😊

    Reply
  42. आपण जेव्हा महान लोकांकडे बघतो जसे, महात्मा गांधी, मदर टेरेसा, A. P. J. अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी, रतन टाटा, धीरूभाई अम्बानी, स्वामी विवेकानंद, नारायण मुर्ती… सिंधुताई सपकाळ.. अश्या महान लोकांकडे बघून वाटते की, देवाने यांना super power देऊन पाठवले असेल का? यांचे नशीब चांगले असेल का?… असे बरेच प्रश्न आपल्या मनात तयार होतात. परंतु हा ब्लॉग वाचून कळले की,तेही साधारण मनुष्य आहेत. त्या तळ्यातल्या जीवजंतू सारखे. फक्त ते स्वप्न बघतात, त्यासाठी निर्णय घेतात, त्यावर ठाम असतात, मेहनत घेतात, त्यांच्या कम्फर्ट झोन सोडतात, आपल्या लोकांपासून, समाजापासून दूर जातात. ते जितके पुढे जातात तितकेच जीवनाचे खरे दर्शन त्यांना होत जाते.
    ज्याप्रमाणे उष्णतेमुळे त्या किड्यांचे अंग सुकते, प्रचंड खाज येते, त्याचप्रमाणे या लोकांनाही काही अडथळे येतात. पण ते अडथळे त्यांना हरवण्यासाठी न येता त्यांचे पंख म्हणजे ताकद /मनोबल वाढविण्यासाठी असतात. ज्या वेळेस त्यांना पंख येतात म्हणजे उडण्यासाठी ते तत्पर होतात. आणि त्यांचे रूपांतर ड्रॅगन फ्लाय मध्ये झालेले असते. त्याचप्रमाणे हे महान व्यक्ति आपल्या लोकांसाठी, समाजासाठी आणि आपल्या देशासाठी किंवा जगासाठी काहीतरी करण्यासाठी धडपडतात. आणि ते कृतीत आणून एक इतिहास घडवतात.
    खरच जसे ड्रॅगन फ्लाय कडे बघून त्या तलावात असलेल्या जीवजंतु ना ही गोष्ट अशक्य वाटते की, हा आपल्यातलाच आहे.
    परंतु, त्या ड्रॅगन फ्लाय ला माहिती आहे की तो त्यांच्यातला आहे. त्यांच्यासाठी काही करू पाहतो आहे. पण इच्छा असूनही तो त्यांचा मध्ये मिसळू शकत नाही. इथेच आपल्याला कळते की, खरे परिवर्तन काय असते….जेव्हा आपण आपल्या इतिहासाला मागे वळून बघू, तेव्हा तो भूतकाळ आपला नव्हे, दुसर्‍या कुणाचा तरी वाटला पाहिजे.
    या blog मधून एवढे कळले की, आपणही ड्रॅगन फ्लाय सारख उडू शकतो, परंतु तसे उडण्यासाठी ड्रॅगन फ्लाय ला जशी किंमत मोजावी लागली( आपल्या लोकांना तसेच , कम्फर्ट झोन सोडण्याची) तशी किंमत मोजण्याची आपलीही तयारी असावी. मग यश आपल्या वाट्याला नक्कीच आलेले असेल.
    आपण खूप lucky आहोत ड्रॅगन फ्लाय चे जिवंत उदाहरण आपण आपले kishan kumre सरांचे पाहतोय. जे आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी शिकवायला आलेले आहेत. गरज आहे फक्त आज आपल्याला त्यांच्यावर आणि स्वतः वर विश्वास ठेवण्याचा….. Thank you so much sir 🙏 🙏

    Reply
  43. सर आज या ब्लॉग मधून हे शकायला मिळाल की जीवनात संपुर्ण परिवर्तन करायचे असेल तर आधी सुरुवात स्वत: पासुन केली पाहिजे तुम्ही जी ड्रॅगन फ्लायची गोष्ट आम्हला सांगितली तर त्यातून हे कळल की किती दिवस हे असच किडयांसारख जगायच आहे Life ही एकदाच मिळते तर आपण त्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेउन जगल पाहिजे बाकीचे समान्य माणस जस जगत असतात मन मरुन, तडजोड करुन तर आपण पण हे असच जगायच का? हा प्रश्न मला पडला तर उत्तर मिळाल “नाही”
    सर मी माझ्या बघते ना की जस पिढयानं- पिढ्या चालत आल आहे की मुलगी एकदा का वयात आली की तिच शिक्षण, स्वप्न, ध्येय हे सगळ बाजुला ठेवून तिच लग्न केल जात आणि जशी तिची आजी,आई,बहीण राहत आहे तसच राहयच म्हणजे तिने फक्त चूल आणि मूल केल पाहिजे का तर ती मुलगी आहे ती स्त्री आहे म्हाणून
    सर तर मला हे अस आयूष्य नाही जगायच म्हणजेच किडयांसारख मला ही त्या ड्रॅगनफ्लाय सारख उंच उडायच आहे मला ही माझी स्वप्न पूर्ण करण्याची आहेत sorry मी स्वप्न नाही बोलणार मी ध्येय बोलणार कारण स्वप्न पूर्ण होत नाही पण ध्येय नक्की पूर्ण होतात ध्येय म्हणल की अशी एक मनात तिव्र इच्छानिर्माण होते की बस आत्ता काहीही हाऊदेत आपल्याला तिथ पोहचायच आहे अस वाटत
    सर मला ही माझ्या ध्येया पर्यंत पोहचायच आहे मला या समान्य माणसासारखे जीवन नाही जगायच तडजोड करुन, मन मरुन मला माझी Life मला हवी तशी जगायची आहे इतरांन पेक्षा वेगळी आणि मला आवडणारी Life मला जगायची आहे
    त्यासाठी तुम्ही सांगितलेले सात गुरूमंत्र/ बोध
    1) समान्य माणसासारखे जीवन जगायचे नसेल तर जीवनात खरच परिवर्तन करायच असेल तर तिव्र इच्छाशक्तीची गरज असणे फार गरजेचे आहे कारण त्या तिव्र इच्छ्शक्तीने आपण पुढे जाण्याचे धाडस करतो. आपल्या ध्येया पर्यंत आपण पोहचू शकतो.
    2)आपले ध्येय पूर्ण झाल्यावर आपण त्या ध्येयापर्यंत पोहचल्यावर मागे भूतकाळ आपण जेव्हा पाहू तो आठवायचा प्रयत्न करु तेव्हा ते जीवन आपले नव्हेच असच आपल्याला वाटणार कारण एवढ परिवर्तन आपल्या जीवनात झाले असेल.
    3)आपल्या जीवनात झालेल्या परिवर्तनामुळे आपण त्या भूतकाळतील कोशात परत जाऊ शकणार नाही आपली किती ही इच्छा असली तरी कारण तो आपला भूतकाळ एका दलदली प्रमाणे होतो ज्यातून आपण भरपुर मेहनत घेउन बाहेर पडलेलो असतो त्याच दलदलीत आपण परत जाण्याचा विचार केला तर आपण तिथेच अडकून बसू
    4) परिवर्तनसाठी खुप मोठी किंमत मोजावी लागणर आहे घरच्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घ्यावे लागतील कारण मला ते आयुष्य नही जगायच जे माझ्या आसपासचे लोक जगत आले आहे #समान्य आयुष्य.
    5) खरे परिवर्तन झाल्यावर जेव्हा आपण त्या समान्य लोकांच्या वस्तीत गेलो तर त्यांच्य विश्वास नाही बसणार की ही मुलगी आपल्यातलीच एक होती म्हणून
    कारण तेवढा बदल झालेला असेल आपल्या Life मध्ये.
    6) एकदा का माझ्या जीवनात परिवर्तन झाल्यावर मला असे वाटेल की मी ज्या लोकतून आले आहे त्या पण लोकांचे जीवनात चांगले परिवर्तन व्हावे
    पण त्या लोकांना माझे म्हणे पटणार नाही , माझ कोणी ऐकणार नाही म्हाणून एक काम करावे लागेल आपली गुणवत्ता आनखी वाढवणे आपली कहाणी लोकंपर्य्ंत पोहचवने एक ना एक दिवस नक्की येईल की आपल्याला बघुन एकादयाची तरी इच्छा होईल आपल्याला पण हिच्यासारख जगता आल पाहिजे.
    7) आपल्या आयुष्यात येणारया आव्हानाला आपण न घाबरता धाडसाने समोरे जावे लागेल. जर का मला माझ्या जीवनात संपुर्णं परिवर्तन करायच असेल तर मला हे धाडस करावच लागेल.
    धन्यवाद सर तुम्ही आम्हला हे जे सात प्रकारचे बोध संगितले.🙏🙏
    आणि या बोधंचा आमच्या life मध्ये आम्ही नक्कीच उपयोग करु 💯🙏

    Reply
  44. How to make a total transformation in life?

    आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असते की आपण पण आहे त्या जीवनापेक्षा उच्चस्तरीय जीवन जगले पाहिजे , आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झाला पाहिजे. आपल्याकडे भावी काळामध्ये प्रचंड पैसा असला पाहिजे ,सत्ता असली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु मिळवण्यासाठी आपल्या मध्ये बदल होणे खूप आवश्यक असते. जगामध्ये 99 टक्के लोक वंशपरंपरागत जीवन जगतात. त्यांची सुद्धा अतोनात इच्छा असते की आपलं जीवन भन्नाट झालं पाहिजे परंतु ते तश्या पद्धतीचे जीवन मिळू शकत नाही. असं कुठलं कारण आहे की ज्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये बदल करू शकत नाही . आपण बदल करू असं ठरवून कार्य करत असताना आपण काही दिवसांनी पुन्हा आपल्या प्राथमिक टप्प्यावर येतो या गोष्टीची काय कारण असेल? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे आपल्या या प्रबोधनशील , प्रभावी लेखनातून अभ्यासायला मिळाले.

    सर तुम्ही सांगितल्या ड्रॅगनफ्लाय या गोष्टीतून माझ्या आयुष्याचा ड्रॅगन फ्लाय तयार झालेला आहे. एका साध्या किड्यान आपल्यातील काहीतरी करण्याची प्रचंड इच्छाशक्ती जागृत केली आणि अगणित यश मिळवलं अगदी त्याच पद्धतीचे जीवन जगण्याची उमेद आपल्या या लेखनातून निर्माण झालेली आहे. खरंच सर आज आपण पण या ब्लॉगच्या माध्यमातून आजची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. आज समाजामध्ये ज्या माणसांनी आपल्या कठोर मेहनतीने अमर्याद जिद्दीने प्रचंड आत्मविश्वासाने यशाची पायरी गाठली आहे त्या माणसांचे जीवन पूर्वीपेक्षा पूर्णतः बदललेलं दिसतं. त्यांचे जीवन अशा साध्या गोष्टी नाही बदलले तर त्यांनी त्या situation मध्ये आपली ताकददार हिम्मत दाखवून , आपल्यातली इच्छाशक्ती जाणून-बुजून जागृत करून त्या किड्या सारखं आपल्या जीवनाचा उद्धार करून टाकलेला आहे.

    जीवनाला एका यशस्वी टप्प्यावर नेण्यासाठी आपल्याला काही गमवावं सुद्धा लागेल जसे त्याने त्याच्या सबंध जीवाभावाचे असलेल्या त्यांना सोडून त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता तसाच निर्णय आपल्यालासुद्धा घेणे आवश्यक आहे काही दिवसासाठी जीवाभावाच्या व्यक्ती पासून लांब यावं लागेल . इतिहास बदलण्यासाठी नवीन इतिहास रचावा लागेल, नवनिर्मिती करावी लागेल त्याशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाही. ज्याप्रमाणे ड्रॅगन फ्लाय ने किड्यातून वर येऊन एक नव विश्व निर्माण केलं त्याच्यासाठी तो जणू काही पुनर्जन्मच होता तस्साच पुनर्जन्म आपल्यालाही करायचा झाल्यास आपल्यामध्ये पहिल्यांदा त्या गोष्टीबद्दल ची तळमळ जागी झाली पाहिजे. काहीतरी भन्नाट करण्याचा विचारांचा खेळ आपल्या माईंड मध्ये रंगला पाहिजे मग त्यातून वर येण्यासाठी एनर्जी मिळते आणि आपला इतिहास हा आपला नसून दुसरा कोणाचा तरी होता असं वाटायला लागलं.

    ड्रॅगन फ्लाय पाण्याच्या वर आल्यानंतर त्याला ज्यावेळी जाणीव झालेली होती की आपण आपल्या सर्व किड्यांना वचन देऊन आलेला होतं की वर गेल्यानंतर वरच्या दुनियेतील चित्र आपल्या पुढे स्पष्ट करण्यासाठी मी पुन्हा परत येईल परंतु असे ड्रॅगन फ्लाय च्या बाबतीमध्ये होऊ शकत नव्हते आणि तसं करण्याचा प्रयत्न तो जरी करत असला तरी त्याला आपला प्राण गमवावा लागला असता . जीवनामध्ये सुद्धा कठोर मेहनत करून, प्रचंड परिश्रमाने ज्या वेळेस माणूस यशाचा टप्पा पार करतो त्यावेळी प्रत्येकालाच वाटत असते की आपण आपल्या समाजाचा आपल्या माणसाचा विकास केला पाहिजे आपण जे ज्ञान घेतला आहे ते ज्ञान आपल्या समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे त्यासाठी मला पुन्हा समाजात जाण्याची गरज आहे असे प्रत्येकाच्या मनातून आवाज येत असतात परंतु त्याने केलेल्या मेहनती मध्ये त्यांनी मिळवलेल्या यशामध्ये एवढी ताकत असते की तो आता त्या level जाऊ शकत नाही. जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी त्या ड्रॅगनफ्लाय सारखं पाण्यात बुडून आपला प्राण गमावण्याचे खूप सारे Chances निर्माण होतात.

    एखादी गोष्ट आपण खूप अभिमानाची करत असतो त्यावेळी खरंच आपण पूर्वी ज्या समाजामध्ये राहत होतो ज्या लोकांमध्ये वावरत होतो तेच लोक आपल्या भन्नाट कामगिरीनंतर आपण मिळवलेल्या यशानंतर ते लोक आपल्याला Accept करत नाही कारण पण आपल्या मध्ये जे काही परिवर्तन झालेलं असतं ते परिवर्तन यांच्यापासून आपल्याला एका उच्च टप्प्यावर पोहोचविला असतं. आणि आपल्यापेक्षा उच्च स्तरीय लोकांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता त्या लोकांमध्ये नसते त्यामुळे ते आपल्याला त्यांच्यापेक्षा वेगळ मानतात.

    आता यामध्ये थोडसं वाईट वाटण्यासारखी अशी गोष्ट आहे की ज्यावेळी आपल्या मध्ये संपूर्ण परिवर्तन होईल आपलं जीवन इतरांपेक्षा Different असेल त्यावेळी आपण आपला आवाज आपण ज्या समाजातून आलेलो आहोत त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं प्रयत्न करत असतो परंतु त्यावेळी कोणी त्या आवाजाला ऐकत नसत अशावेळी आपल्याला आपल्या कार्यामध्ये सातत्य ठेवून गरुडासारखी उंच उंच झेप घेऊन आकाशाला गवसणी घालणं उपयुक्त ठरेल. ज्यावेळी आपली अशी डोळ्याच पारण फेडणारी कामगिरी लोकांना कळेल त्यावेळी लोकांपर्यंत आपल्याला जाण्याची वेळ येणार नाही तर लोकर स्वतःहून आपल्या कामगिरीचं रहस्य जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यात सुद्धा परिवर्तन करतील या आणि एका समाधानकारक जीवनासाठी यापेक्षा वेगळं काय हव आहे . आणि अशी कामगिरी करण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या समाजात जाण्याची गरज नसून त्याच्यासारख्याच भन्नाट यश मिळवलेल्या व्यक्तीची साथ आवश्यक असते कारण संगतीमुळे यश आणि प्रगती खूप प्रचंड वेगाने होत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या विचारांची माणसं जोडणं खूप आवश्यक आहे. समविचारी लोकांमुळे आपल्या विचारांना आदर मिळतो आणि त्यातून नवीन तेजस्वी विचार निर्माण होण्यास सहाय्य होते ज्यावेळी शोधक विचारांची निर्मिती आपल्या माईंड मध्ये होईल त्यावेळी माईंड त्याच विचारांच्या शोधात हरवतं आणि ते यश मिळवूनच परत येत .

    त्यासाठी समविचारी लोक, प्रेरणादायी ऊर्जा दायक ग्रंथ आणि वेगवेगळ्या माहितीचा खजिना मिळवण्यासाठी लाइफ शोध सारख्या प्लॅटफॉर्मची असणे गरजेचा आहे. जीवनात येणारे वेगवेगळे आव्हाने स्वीकारण्याची आपली तयारी असणे गरजेचे आहे. आव्हानांचा स्वीकार केल्यानंतर त्यानंतर त्यावर तोडगा निघतोच , कोणत्याही गोष्टीला पर्याय उपलब्ध असतात एखादा पर्याय संपला तर त्याठिकाणी दुसरा पर्याय तयार होत असतो . त्यामुळे स्वीकारलेल्या आव्हानांचा निराकरण हळू हळू होत असते फक्त ते स्वीकारण्याची हिम्मत आपली असली पाहिजे. अशी हिम्मत निर्माण करण्यासाठी मला वाटते लाइफ शोध सारखी लर्निंग खूप महत्त्वाची आहे. आणि सदर ब्लॉग मधून जीवनात यशस्वी परिवर्तन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले मार्ग किंवा cheak points तुम्ही या ड्रॅगनफ्लाय च्या गोष्टीच्या माध्यमातून सांगितलात त्यामुळे नक्कीच जीवन परिवर्तनशील होईल यात काही शंका नाही. असा पावरफूल विचार आमच्यापर्यंत पोहोचविल्या बद्दल मनापासून धन्यवाद. 🙏

    Reply
  45. सर या किड्याचा जसा ड्रॅगन फ्लाय होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण समोर ठेवलेल्या ध्येयांना सामोरे जाऊन आपल्या जीवनात परिवर्तन कसे करता येईल ते या ब्लॉगच्या सात बोधांच्या माध्यमातून समजले. हा ब्लॅाग आमच्यात नवी ऊर्जा निर्माण
    करून जीवनात नक्कीच परिवर्तन घडून आणेल.
    आपल्यात परिवर्तन घडवायचे असेल तर आपल्यात एक गोष्ट असायलाच पाहिजे ती म्हणजे जिद्द.आपण कधीही आपल्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे.आपल्याला असे खुप वेळा दिसते की;लोक आपल्या परिस्थितीला दोष देत असतात पण ती बदलण्यासाठी प्रयत्न करत नाही.तसच जर तो किडा प्रयत्न करुन पाण्यावर आला नसता तर त्याला dragon fly च आयुष्य अनुभवता आल नसत.आपल्यात बद्ल घडवायचा असेल तर आपल्याकडे तीव्र इच्छाशक्ती असायला हवी.परिवर्तन घडवायचे असेल तर आपल्याला हे कळले पाहिजे की कोणाची संगत धरायची व कोणाची नाही.
    जर आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाच म्हणजे एक धेय्य ठेवलं पाहिजे.
    Sir,तुम्ही सांगितलेले हे सात टप्पे जर आम्ही पार करत गेलो तर आमच्यात नक्कीच एक अविश्वस्निय परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.
    Thank you,Sir!

    Reply
    • आपण आपल्या जीवनाला जसा आकार द्यायचा आहे तसा आकार देऊ शकतो. हे तुझं learning ग्रेट वाटलं. 👍

      Reply
  46. नमस्कार सर,
    या ब्लॉगमध्ये जीवनात संपूर्ण परिवर्तन कसे करावे? या बद्दल चे विचार मांडलेले आहेत.
    या ब्लॉगमध्ये महत्त्वाचे सात टप्पे सांगितले आहेत. जीवन परिवर्तन करणारी एक गोष्ट सांगितलेली आहे. त्या गोष्टीचा आमच्या जीवनावर खूप प्रभाव पडत आहे. एका छोट्या किडयापासून ड्रॅगनफ्लाय बनण्यापर्यंतचा प्रवास कसा आहे ते मांडलेले आहे. आपणही असंच एक पाऊल पुढे टाकून , मेहनत कार्य करून आपले निश्चित केलेले ध्येय गाठू शकतो. आपण जीवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच जीवनात पुढे जाऊ शकतो. आणखी सात बोध सरांनी मांडलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि तशा पद्धतीने आपण आपल्या जीवनात ते apply करायला पाहिजे.
    आणि आपण सात टप्पे पार केले तर आपण जीवनात संपूर्ण परिवर्तन नक्कीच करू शकतो.
    Thank you Sir😊

    Reply
    • हे सात टप्पे follow केले तर कोणाचेही जीवन बदलू शकते हे तुझं learning. Great keep learning, keep growing 👍👍

      Reply
  47. या लाइफ चेंजिंग ब्लॉक मधील प्रत्येक गोष्ट अत्यंत powerful आहे. आपण सर्वांनी मेहनत तर खूप करत असतो परंतु त्या मेहनतीचे फळ आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. जीवनामध्ये खूप बदल करण्याचा प्रयत्न आपण मनातून करत असतो परंतु तसे होताना दिसत नाही. असे का होते? अशा प्रश्नांची ज्यावेळेस मनामध्ये निर्मिती होते त्यावर हा ब्लॉग खूपच प्रभवशील आहे .

    आपला प्रत्येकाचा जन्म काहीतरी वेगळं करण्यासाठी झालेला आहे , निसर्गाने आपल्याला या एवढ्या प्रचंड गर्दी मध्ये आपलं अस्तित्व सुद्धा या पृथ्वीतलावर ठेवलेला आहे हे यासाठी की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्या जीवनाचा उद्देश सुद्धा इतरांपेक्षा वेगळाच आहे. आणि तोच जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी आपण सगळेजण अतिशय मेहनतीने झगडत असतो. काहीतरी जगावेगळं करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकालाच असं वाटते की आपण सुद्धा गरुडासारखी आपल्या कार्यामध्ये उंच उंच भरारी घेतली पाहिजे आणि आपल्या या सुंदर डोळ्यांनी हा सगळा निसर्ग आपल्याला टिपता आला पाहिजे . परंतु या गोष्टी आपल्यापैकी अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोकं साध्य करत असतात , आज जगामध्ये साडेसात कोटी लोकसंख्या असतानासुद्धा त्यातील अगदी काहीच लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अगणित यश मिळवत असतात . मग बाकीच्या लोकांनी सुद्धा खूप मोठे मोठे स्वप्न बघून भन्नाट आयडिया निर्माण करून काय यशस्वी होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर या ब्लोग मध्ये सरांनी अतिशय सोयीस्करपणे दिलेल आहे .

    सामान्य जीवनातून असामान्य तेचा प्रवास करण्याची आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते परंतु अस घडतच नाही या गोष्टीचा कारण मीमांसा केला असतं एक बाब हाती लागते ते म्हणजे आपण फक्त कोणतेही काम करण्याचे किंवा आपल्या मध्ये तयार झालेली भन्नाट आयडिया पुढे साध्य करायचं असं फक्त नामस्मरण करत असतो प्रत्यक्षात याची सुरुवात आपल्या कडून होत नसल्यामुळे आपल्या पुढील सगळ्या कृती ठप्प होतात त्यामूळे आपल्या धेय्य प्राप्तीची गाडी तिथून पुढे सरकतच नाही.

    सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट करण्यासाठी तशी इच्छाशक्ती असावी लागते. एखादं कार्य करण्यासाठी ज्यावेळेस आपल्याकडे इच्छाशक्ती निर्माण होईल त्यावेळी आपलं माईंड आपोआप त्या इच्छाशक्तीने action कडे रवाना होतं आणि त्यातून आपल्या कार्याला सुरुवात होते आणि हळूहळू त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे will power असणे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपण आपल्या माईंड एक आपल्या ध्येय याविषयीचा स्ट्रक्चर निर्माण करणं खूप महत्त्वाचा आहे कारण कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी जर त्या मार्गाचा आपल्याकडे road map असेल तर आपण त्या ठिकाणी अगदी विश्वासाने आणि अचूकतेने पोहोचू शकतो. अगदी त्याच पद्धतीने जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण जे क्षेत्र निवडलेल आहे त्या क्षेत्राचा जर roadmap आपण तयार केलं तर नक्कीच आपला प्रवास यशस्वी होण्याचाच असेल.

    त्यामुळे आपल्या मनात जे काही कल्पना आहेत ते फक्त डोक्यात ठेऊन किंवा त्यावर विचारा करत बसून चालणार नाही तर आहे त्या पोझिशन मध्ये आपण आपल्या कामाला START केली पाहिजे तरच आपण पुढची step गाठू शकतो जर त्या किड्यांना त्याची कम्युनिटी सोडण्याची हिंमत केली नसती आणि वर येण्याची सुरुवात केली नसती तर तो ड्रॅगन फ्लाय कधीच झाला नसता म्हणून जर आयुष्यात खूप मोठं करायचं असेल त्यासाठी आपली माणसं आपला गोतावळा सोडून वेगळे करण्याची हिंमत आपण ठेवली पाहिजे आणि कामाची सुरुवात आहे त्या पोझीशनमध्ये केली पाहिजे. त्या किड्याने कुठलीच समस्या किंवा तक्रार न मानता त्याने त्याच्या कामाला सुरुवात केली म्हणून तो एका सुंदर ड्रॅगनफ्लाय रूपांतरित होऊन त्याच जीवन स्वर्गमय बनवण्याचा तो प्रयास केला.

    एकदा का आपल्या या पूर्वीच्या जीवनातून आपण पुढे आलो की आपल्याला यश हात धरून त्याच्याकडे खेचून घेऊन जात . ज्यावेळी असं घडेल त्यावेळी आणि आपला मागचा इतिहास आपण काही वर्षांपूर्वी काय होतो हे आपला इतिहास नसून आपला बॅकग्राऊंड नसून इतर कोणाचा तरी आहे असा आपल्याला नक्की वाटेल.
    जीवनामध्ये यशस्वी झाल्यानंतर आपल्या यशाचे रहस्य आपण ज्या ठिकाणी वरून आलो आहोत त्या ठिकाणच्या लोकांना सांगून त्या रहस्याच्या मदतीने त्यांना सुद्धा वर आणण्याची आपली प्रचंड इच्छा असते मात्र ज्यावेळी आपण Sucees होतो त्या यावेळी आपले लोकं आपल्याला त्यांच्यापेक्षा वेगळे समजतात आणि आपण आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु तू आपण पण ज्यावेळी उंच उंच भरारी घेत जातो त्यावेळी आपल्याला लोकांपर्यंत जाण्याची वेळ येत नाही तर लोकच आपली प्रेरणा घेऊन आपल्याकडे येत असतात.
    असे प्रेरणादायी, मौल्यवान विचार या ब्लॉग मधून शिकायला मिळाले. असं परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला एखाद्या कम्युनिटी ची नितांत गरज असते आणि मला वाटते माझ्या परिवर्तनासाठी लाइफ शोध ही कम्युनिटी माझ्यासाठी खूपच चांगली आहे आणि मी मी माझं भाग्य समजतो की मला या कम्युनिटी चा एक मेंबर होता आलं. या कम्युनिटी तून जास्तीत जास्त शिकण्याचा मी प्रयत्न करीत राहीन. आणि असा माईंड ब्लोईंग ब्लॉग आम्हाला वाचण्यासाठी आमच्या परिवर्तनासाठी तुम्ही तयार केला त्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद.

    Reply
    • खूप सविस्तर learning लिहून इतरांना प्रेरित करतोस, अभिनंदन, देविदास 🌹🌹☺️

      Reply
  48. Sir, kharch khupch chan aahe hya story madun mla khup kahi shikayla bhetle ki aapn हिम्मत krun pude jayla hve pude jaun aaplyala jr यश संपादन करु तर kharch aapn bhutkalatil aapn स्वताला olkhu shaknar nahi ह्या story madun positive thinking vadli ….amazing sir…. 🙏👌Thank you so much sir…. 🙏

    Reply
  49. मला हा ब्लॉग खूप आवडला, कारण हा ब्लॉग वाचल्यानंतर माझ्या विचारांमध्ये परिवर्तन झाले आहे. जर एखादी गोष्ट आपल्याला करायला आवडत असेल आणि आपण ती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो असा विश्वास असेल तर आपण खूप चांगले भविष्य घडवू शकतो. मी म्हणेल ड्रॅगन फ्लाय सारखं आपणही प्रयत्न करून आपल्यातील कौशल्य जाणून त्या कौशल्यांचा उपयोग केला पाहिजे .ड्रॅगन फ्लाय सारखं विश्वास ठेवून पुढे गेला पाहिजे आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागतं हे मी या ब्लॉगमधून शिकले.

    Reply

Leave a Comment

Translate »
error: Content is protected !!